Wednesday , April 22 2026
Breaking News

बेळगावातील दहा लाखांहून अधिक ग्राहकांना गृहज्योतीचा लाभ : मंत्री सतीश जारकीहोळी

Spread the love

 

बेळगाव : गृहज्योती योजनेसाठी सरकार दरवर्षी बेळगाव जिल्ह्याला 516 कोटी रुपये देणार आहे. हमी योजनेतून दरमहा प्रति कुटुंब ४ ते ५ हजार रुपये खर्च केले जातील. त्याचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी केला पाहिजे. तेव्हाच शासनाच्या हमीभाव योजना प्रभावी होतील, असे मत सार्वजनिक बांधकाम विभाग तथा जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले. ते शनिवारी (५ ऑगस्ट) शहरातील कुमार गंधर्व कलामंदिर येथे 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची हमी देणार्‍या आणि लाभार्थ्यांना शून्य वीजबिल वाटणार्‍या “गृहज्योती” योजनेचा शुभारंभ केल्यानंतर बोलत होते.

निवडणुकीत दिलेल्या हमीनुसार आमच्या सरकारने ‘गृहज्योती’ योजना राबवून आश्वासन दिले आहे.
तीन महिन्यांच्या कालावधीत त्याची अंमलबजावणी सुरू आहे. गृहलक्ष्मी, शक्ती, अन्नभाग्य आणि युवानिधी योजना यासारख्या इतर हमी योजना राबविण्यात येत आहेत.
सरकार एवढ्या मोठ्या रकमेची जुळवाजुळव कशी करेल, अशी भीती विरोधकांना होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याची सुरळीत अंमलबजावणी करून आपले सरकार गरीबाभिमुख असल्याचे सिद्ध केले आहे. त्याचा जनतेने चांगला उपयोग करून घ्यावा, असे मत सार्वजनिक बांधकाम विभागाचे व बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.

गृह ज्योती योजनेंतर्गत 200 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल. बेळगावातील दहा लाखांहून अधिक ग्राहकांना याचा लाभ मिळणार असून आतापर्यंत 80% ग्राहकांनी या योजनेत नोंदणी केली आहे असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *