Wednesday , April 22 2026
Breaking News

चन्नम्मा यांच्या तिन्ही स्थानांना राष्ट्रीय स्मारक करा : बसवजय मृत्युंजय स्वामीजी

Spread the love

 

बेळगाव : सरकारने राणी चन्नम्मा यांचे लिंगैक्य स्थान, जन्मस्थान आणि संस्थानाचा गांभीर्याने विचार करून ही तिन्ही ठिकाणे राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना कुडलसंगम पंचमसाली पीठाचे जगद्गुरु बसव जय मृत्युंजय स्वामीजी यांनी केली. पंचमसाली पीठाचे जगद्गुरू बसव जय मृत्युंजय स्वामीजी यांनी वीरराणी कित्तुरु चन्नम्मा यांच्या 195 व्या स्मृतिदिनानिमित्त वीरराणी कित्तुरु चन्नम्मा यांचे जन्मस्थान काकती येथे चन्नम्माला पूजन करून लिंगैक्य ज्योती यात्रेला चालना दिली. यावेळी बोलताना बसव जय मृत्युंजय स्वामीजी म्हणाले की, सरकारने चन्नम्मा यांचा स्मृतिदिन राज्यभरात दरवर्षी उत्सव म्हणून साजरा करून त्यांना आदरांजली वाहिली पाहिजे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांचे स्मरण करणे हे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य आहे. यातून तरुणांमध्ये राष्ट्रवाद आणि देशभक्ती बळावेल, असे ते म्हणाले.

सरकारने आपली इच्छाशक्ती दाखवून चन्नम्मा यांच्या जन्मस्थानाच्या खुणा शोधण्यासाठी संशोधन समिती स्थापन करण्याची मागणी केली. चन्नम्मा यांचे जन्मस्थान, लिंगैक्य स्थळ आज त्या-त्या प्रदेशापुरते मर्यादित असल्याची चिंता व्यक्त करून ते म्हणाले की, राष्ट्रीय स्मारक म्हणून त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसार झाला पाहिजे. याबाबत आपण कोणत्याही संघर्षाला तयार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ म्हणाले की, कित्तूर राणी चन्नम्मा या देशाने पाहिलेल्या शूर नेत्या होत्या, चेन्नम्मा ज्योती श्री बसव जय मृत्युंजय स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली होती जी संघर्षातून राज्यात प्रसिद्ध झाली.

कित्तुर उत्सवच्या ज्योतीचे बेळगावात स्वागत

लिंगायत पंचमसाली संघटनेच्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली ७०-८० लोकांनी एकत्र येऊन कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या १९५ व्या स्मरणार्थ चन्नम्माच्या जन्मस्थान काकती येथून ज्योत यात्रा काढली. काकती गावातून निघालेली ज्योत यात्रा चन्नम्मा सर्कल येथे पोहोचली. यावेळी ज्योतीचे स्वागत करून चन्नम्माच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि नंतर बागेवाडीकडे ज्योत निघाली.

यावेळी महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, माजी आमदार संजय पाटील, किरण साधूनावर, महांतेश वाकुंदा, राजशेखर तलवार, वाल्मिकी समाजाचे नेते दिपक गुडुगनट्टी, करावे जिल्हाध्यक्ष आर.के.पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *