Monday , June 1 2026
Breaking News

उच्चाधिकार समितीची बैठक घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांना धैर्यशील माने यांचे पत्र

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक – महाराष्ट्र सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील दावा क्रमांक ४/२००४ मूळ दाव्याची सुनावणी २१ जानेवारी २०२६ रोजी होणार असून या पार्श्वभूमीवर न्यायालयासाठी पूर्वतयारी करणे गरजेचे आहे यासाठी उच्चाधिकार समितीची तात्काळ बैठक बोलवावी, अशी मागणी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न तज्ञ कमिटी अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

२१ जानेवारी २०२६ पासून होणाऱ्या सलग सुनावणीपूर्वी सीमाप्रश्नी कायदेशीर रणनीती आखणे, साक्षीदारांची शपथपत्रे त्याबरोबर पुरावे यांची पूर्वतयारी आणि वरिष्ठ वकिलांच्या सल्लामसलती करण्यासाठी उच्चाधिकार समितीची तात्काळ बैठक होणे गरजेचे असल्याचे २७ डिसेंबर २०२५ रोजी धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. २०१४ नंतर सीमा प्रश्नाचे न्यायालयीन लढ्याला पुन्हा एकदा गती मिळालेली आहे. लढा सध्या निर्णायक टप्प्यावर आलेला आहे. अशावेळी महाराष्ट्र शासनाची तयारी कशा पद्धतीने आहे याकडे सीमा भागातील मराठी भाषिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बालवीर विद्यानिकेतनमध्ये विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

Spread the love  बेळगाव : बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन शाळेत नवीन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *