Monday , June 1 2026
Breaking News

कर्नाटक

खानापूरकडे येणाऱ्या कारचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

  हावेरी : बेळगाव जिल्ह्यातील शिगावजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळल्याने चार तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुदीप कोटी (18) आणि निलप्पा मुलीमणी (23) यांचा जागीच मृत्यू झाला तर शिवनगौडा यल्लनगौडा (20) आणि कल्मेश मानोजी (26) यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मृत हे सावनूर तालुक्यातील …

Read More »

कटलरी दुकानाला शॉर्टसर्किटने आग लागून चार लाखाचे नुकसान

  निपाणी (वार्ता) : येथील बस स्थानकावरील छत्रपती धर्मवीर संभाजीराजे चौकाजवळ असलेल्या एका कटलरी दुकानाला शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी (ता.१२) रात्री साडेनऊ वाजता सुमारास घडली. या घटनेमध्ये निशिकांत बागडे यांच्या दुकानातील प्लास्टिकचे सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. अग्निशामक दलाच्या कार्यतत्परतेमुळे परिसरातील आग …

Read More »

राष्ट्रीय सेवा योजनेमुळे युवकांमध्ये काम करण्याची उर्मी

  धनाजी पाटील; चिखलव्हाळमध्ये शिबिराची सांगता निपाणी (वार्ता) : राष्ट्रीय सेवा योजनांच्या शिबिरांमुळे युवकांमध्ये कार्य करण्याचा उत्साह वाढतो. वेगवेगळ्या सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिल्यावर समाजसेवा करण्याची आवड निर्माण होते. समाजात वेगळ्या प्रकारची जनजागृतीही राष्ट्रीय सेवा योजना करत असते. याचा चिखलव्हाळ गावातील नागरिक आणि शिबिरार्थीनी लाभ झाला आहे, असे मत ग्रामपंचायत …

Read More »

सातवा वेतन आयोग लागू न केल्यास आंदोलन

  सरकारी कर्मचारी संघटनेचा इशारा ; आमदार शशिकला जोल्ले यांना निवेदन निपाणी (वार्ता) : सरकारने तात्काळ सातवा वेतन आयोग लागू करावे, या मागणीसाठी कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे आमदार शशिकला जोल्ले आणि उपतहसीलदार मृत्युंजय डंगी यांना शुक्रवारी (ता.१२) देण्यात आले. निवेदनातील माहिती अशी, सातव्या वेतन आयोगाचा सरकारला सादर केलेला अहवाल …

Read More »

माडीगुंजी गावात डास निर्मूलन औषधाच्या फवारणीची मागणी

  खानापूर : सध्या पावसाळा सुरू आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास वाढली आहे. खानापूर तालुक्यातील माडीगुंजी गावात डास आणि माशांनी अक्षरशः थैमान घातले आहे. डेंग्यू, मलेरियासारखे रोग फैलावत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने वेळीच लक्ष घालून संपूर्ण गावात डास निर्मूलन औषधांची फवारणी करावी, अशी मागणी गावातील युवा कार्यकर्ते आणि नागरिकांनी ग्रामपंचायत पीडीओकडे …

Read More »

शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यास प्राधान्य द्यावे अन्यथा आंदोलन : आबासाहेब दळवी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याची दखल घेऊन ज्या जागा रिक्त आहेत. त्या जागा भरण्यास प्राधान्य द्यावे अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी दिला आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे गुरुवारी …

Read More »

राज्यातील १५ जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

  बंगळुरू : राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये आजपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तर कन्नड, दक्षिण कन्नड, उडुपी, चिक्कमंगळूरू, कोडगु, शिमोगा, दावणगेरे, हसन, यादगिरी, बेळगाव, धारवाड, कलबुर्गी, हावेरी आणि रायचूर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडेल. उत्तर कन्नड, दक्षिण कन्नड, उडुपी, चिक्कमंगळूरू, कोडगु आणि शिमोगा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर …

Read More »

शालेय विद्यार्थ्यांसाठी ओळखपत्रांचे वितरण

  खानापूर : शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी स्वच्छ आणि शिस्तीने राहण्याचे शिकावे असे उद्गार निट्टूर गावचे सुपुत्र शिक्षणप्रेमी श्री. सुरज गणेबैलकर यांनी विद्यार्थ्यांना ओळखपत्र वितरणावेळी काढले. सरकारी शाळांच्या विकासासाठी सध्या शिक्षकांसोबत काही जागरूक पालक सुद्धा प्रयत्नशील आहेत. याचाच एक भाग म्हणून सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा निट्टूर येथे विद्यार्थ्यांसाठी शिक्षण प्रेमी शाळेचे …

Read More »

डेंग्यूमुळे संकेश्वर येथे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू

  संकेश्वर : संकेश्वर येथील एका चिमुरडीचा डेंग्यूच्या आजाराने गुरुवारी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. श्रेया कृष्णा दवदते नावाच्या ९ वर्षीय मुलीचा या डेंग्यू आजाराने मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे, मात्र आरोग्य विभाग आणि बीआयएम रुग्णालयाच्या डॉक्टरांनीच या मुलीच्या मृत्यूचे नेमके कारण न सांगता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. गेल्या काही …

Read More »

सदलगा – दत्तवाड रस्ता बनला प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा!

  सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष! चिकोडी (अण्णासाहेब कदम) : चिकोडी तालुक्यातील कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यांना जोडणारा सदलगा – दत्तवाड रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोक्याचा बनला आहे. या रस्त्यावर किसान ब्रिजपासून दतवाड ब्रिजपर्यंत अनेक ठिकाणी रस्ता दोन्ही बाजूनी खचला असून रस्त्यावर फुटा दीड फुटाचे खड्डे पडले आहेत. गेल्या वर्षभरापासून रस्ता दुरुस्तीसाठी …

Read More »