Tuesday , March 3 2026
Breaking News

कर्नाटक

आसन व्यवस्थेअभावी, महाराष्ट्रातील प्रवासी प्लॅटफॉर्मवर

  प्रवाशातून संताप ; निपाणी आगार दुजाभाव करत असल्याचा आरोप निपाणी (वार्ता) : कर्नाटक, महाराष्ट्र आणि कोकणाचे प्रवेशद्वार म्हणून निपाणी आगाराची ओळख आहे. पण त्या ठिकाणी कर्नाटकासह महाराष्ट्रातील प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी आसन व्यवस्था असल्याने बसची वाट पहात प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर ताटकळत उभे राहावे लागते. महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांना आसन व्यवस्थाच नसल्याने त्यांना …

Read More »

शिमोग्यात १६ वर्षीय विद्यार्थ्याची हत्या

  क्रिकेट सामन्यातील वादातून घटना, सात अल्पवयीन ताब्यात बंगळूर : शिमोगा येथे सुलेबैलू सरकारी शाळेबाहेर १६ वर्षीय विद्यार्थ्याची हत्या झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. घटनेनंतर शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ऊरगदूर येथील सरकारी माध्यमिक शाळेतील एसएसएलसीचा विद्यार्थी संकेत (वय …

Read More »

धारवाडमध्ये सरकारी भरतीसाठी विद्यार्थ्यांचे भव्य आंदोलन; हजारोंचा सहभाग

  बंगळूर : राज्य सरकारच्या विविध विभागांतील रिक्त पदे तातडीने भरावीत, या मागणीसाठी धारवाडमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी भव्य मोर्चा काढत आंदोलन केले. श्रीनगर परिसरातून सुरू झालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने नोकरीसाठी इच्छुक युवक-युवती सहभागी झाले. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला अधिकृत परवानगी नव्हती. तरीही सकाळपासूनच मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार एकत्र …

Read More »

स्वावलंबनामुळे उद्योजकतेला चालना मिळेल : डॉ. बी. जी. पाटील

  बागेवाडी; महाविद्यालयात राष्ट्रीय पातळीवरील परिषद निपाणी (वार्ता) : विकसित भारत हा केवळ आर्थिक वाढीचा घटक नसून तो सामाजिक, सांस्कृतिक आणि मानवी मूल्यांचा एक व्यापक प्रकार आहे. भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. उत्पादन क्षेत्र, शेती, सेवा आणि डिजिटल अर्थव्यवस्थेच्या विकासासह २०४७ पर्यंत शक्तिशाली देश बनू शकतो. …

Read More »

सिदनाळ बंधाऱ्यासह नदी काठावर मगरीच्या वावराने नागरिकातून भिती

  निपाणी (वार्ता) : सिदनाळ (ता. निपाणी) येथील वेदगंगा नदीकाठासह बंधारा परिसरात मगरीचा वावर वाढल्याने प्रवास करणाऱ्यासह शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मगरीचा वन खात्याने तात्काळ बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी नागरीकातून होत आहे. वेदगंगा नदीवर अकोळ -सिदनाळ रस्त्यावर असलेल्या सिदनाळ बंधाऱ्यावर रात्री मगर फिरत …

Read More »

ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटिबद्ध

  खासदार प्रियांका जारकीहोळी; कुर्लीत पाया खोदाई समारंभ निपाणी (वार्ता) : चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात नागरी सुविधा पुरविण्यासाठी काँगेसतर्फे प्रयत्न सुरू आहेत. रस्ते, पिण्याचे पाणी, भवन, शाळा खोल्या सभामंडप अशा कामांना चालना देत आहोत. ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मत खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी व्यक्त केले. कुर्ली येथे खासदार …

Read More »

भाजप नेते प्रमोद कोचेरी यांची भाजपच्या राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड

  खानापूर : निस्वार्थी भावनेने तळागाळातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणतेही पद नसताना विशेष प्रयत्न करणारे नेते म्हणून ओळखले जाणारे भारतीय जनता पार्टीचे बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष आणि खानापूर भाजपमधील ज्येष्ठ नेते कार्यसम्राट प्रमोद कोचेरी यांची भाजप पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांनी पक्षासाठी दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण केलेल्या …

Read More »

इंदिरा किटव्दारे लवकरच जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

  बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे; बोरगाव संघामध्ये धान्य वितरणाचा प्रारंभ निपाणी (वार्ता)सर्वसामान्य कुटुंबीयांना शुद्ध आणि सात्विक अन्न मिळावे,या उद्देशाने राज्यातील काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने अन्नभाग्य योजना प्रभावीपणे राबवली आहे. पंचहमी योजनमुळे अनेकांचे जीवन सुखकार झाले आहे. आता लवकरच इंदिरा किटच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूचे वितरण लाभाथ्यर्थ्यांना सरकार करणार असल्याचे बुडा अध्यक्ष लक्ष्मण …

Read More »

तंत्रज्ञानाच्या युगात तरुण शास्त्रज्ञांची भूमिका महत्त्वाची

  प्रा. डॉ. गजानन राशिंगकर; बागेवाडी महाविद्यालयात विज्ञान चर्चासत्र निपाणी (वार्ता) : नवनवीन तंत्रज्ञानामुळे जग मुठीत आले आहे. पण त्याचा वापर करण्याची आपली जबाबदारीही वाढली आहे. भारत कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवतंत्रज्ञान, नॅनोटेक्नॉलॉजीसारख्या क्षेत्रात प्रगती करत आहे. त्यातून तरुण शास्त्रज्ञांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकीय ज्ञानापुरते मर्यादित न राहता प्रायोगिक …

Read More »

परिस्थितीनुसार कविता जन्म घेते

  प्रा. डॉ. अच्युत माने; ‘भूतकाळ’ काव्य संग्रहाचे निपाणीत प्रकाशन निपाणी (वार्ता) : कवी हा जन्मताच कवी नसतो तो परिस्थितीनुसार निर्माण होतो. समाजातील चांगल्या वाईट घटनेवर आपल्या आयुष्यातील सुखदुःखातील घटनेवर कवी कविता लिहित असतो. कविता ही प्रकट व्हावी लागते. ती जन्मावी लागते, असे मत प्रा. डॉ.अच्युत माने यांनी व्यक्त केले. …

Read More »