Sunday , December 7 2025
Breaking News

कर्नाटक

डीके शिवकुमार जिद्दीला पेटले, सिद्धरामय्या सुद्धा मागे हटेनात!

  बेंगळुरू : देशभरात काँग्रेसची कामगिरी समाधानकारक नसतानाच कर्नाटकमध्ये सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती राहणार, यावरून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यातील संघर्ष चिघळत चालला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या धक्क्यानंतर पक्ष नेतृत्वाचे लक्ष आता सरळ कर्नाटकाकडे वळले असून, दोन्ही गटांनी दिल्ली दरबारात आपापली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. सिद्धरामय्या …

Read More »

काँग्रेस केपीसीसी सदस्यपदी निवडीबद्दल राजेश कदम यांचा माजी नगरसेवक संघटनेतर्फे सत्कार

  निपाणी (वार्ता) : निपाणी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश कदम यांची कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांचा माजी नगरसेवक संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. माजी नगराध्यक्ष विजय शेटके यांनी स्वागत तर माजी नगराध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. माजी सभापती किरण कोकरे यांनी, कदम यांनी मिळालेल्या संधीचा …

Read More »

बिडी येथील नेहरू मेमोरियल पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश

  खानापूर : खानापूर तालुकास्तरीय पदवीपूर्व महाविद्यालयांच्या “सांस्कृतिक स्पर्धा” सरकारी प. पू. महाविद्यालय, मुगळीहाळ‌ येथे थाटात पार पडल्या. या स्पर्धेत बिडी येथील नेहरू मेमोरियल पदवीपूर्व महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थी- -विद्यार्थिनी घवघवीत यश संपादन केले असून ते या प्रमाणे…. मोनो ॲक्टिंग कु. दिपा ईटगी प्रथम, तर प्रीया बाबूगौडर हिने द्वितीय क्रमांक मिळविला …

Read More »

अपघातात जखमी नागुर्डावाडातील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

  खानापूर : जांबोटी-खानापूर मुख्य रस्त्यावर सोमवारी (ता. १७) सकाळी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शिवम संजय कुंभार (वय १७, रा. नागुर्डावाडा, ता. खानापूर) या तरुणाचा मंगळवारी (ता. १८) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नोंद खानापूर पोलिस ठाण्यात झाली. दरम्यान, धडक देणारा वाहनचालक पसार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवम सोमवारी सकाळी …

Read More »

खो- खो ची विजयी झंकार, ताराराणी काॅलेजचा बेळगाव जिल्ह्यातील सर्व प्रतिस्पर्ध्यांवर दणदणीत प्रहार!

  बेळगाव : मराठा मंडळ संचालित ताराराणी पदवी पूर्व महाविद्यालय नेहमीच अभ्यास, कला व क्रीडा क्षेत्रांमध्ये बेळगाव जिल्ह्यात अग्रगण्य कॉलेज राहिले आहे. अभ्यासात अव्वल स्थानी असणाऱ्या येथील विद्यार्थिनी क्रीडाक्षेत्रातही उत्तम नावलौकिक मिळवित आहेत. खानापूर तालुक्याच्या नेतृत्व करणाऱ्या या महाविद्यालयाच्या खो- खो पथकातील खेळाडू कु. नीलम कक्केरकर (कर्णधार), कु. लक्ष्मी हंगिरकर, …

Read More »

डॉ. आंबेडकराच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी नगरपंचायतीकडे जागा देण्याची निवेदनाद्वारे मागणी

  निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील नगरपंचायतीच्या नवीन इमारतीसाठी शासनाकडून ५ कोटीचे अनुदान मंजूर झाले आहे. या निधीतून सुसज्ज कार्यालयाची निर्मिती होणार आहे. त्याच्या समोरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी शासनासह नगरपंचायतीने जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन नगराध्यक्ष व मुख्याधिका-यांना बहुजन समाजातर्फे देण्यात आले. विजयकुमार शिंगे यांनी, …

Read More »

विज्ञान प्रयोगातूनच सिद्ध होते : अभिजीत उदयसिंग सरदेसाई

  कारलगा हायस्कूल कारलगा येथे फिरते विज्ञान प्रयोगालय खानापूर : विज्ञान प्रयोगातूनच सिद्ध होते. सृष्टीतील रहस्य उकलून मानवाच्या प्रगतीचा मार्ग दाखवण्याचे महत्त्वाचे कार्य विज्ञान करते. त्यांनी विज्ञानाचे विविध उपयोग स्पष्ट करत विज्ञान मानवी जीवनाचा उत्क्रांतीत कसा सकारात्मक बदल घडवतो, असे प्रतिपादन कायदे सल्लागार अभिजीत उदयसिंग सरदेसाई यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी …

Read More »

म. मं. ताराराणी काॅलेजचा अभिमान, स्वाती सुनील पाटील हीचा निबंध स्पर्धेत सन्मान

  खानापूर : मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर हे विद्यालय नेहमीच सर्वांगीण विकासाबरोबर विद्यार्थिनींचा स्पर्धात्मक दृष्टिकोन जोपासणारे विद्यालय म्हणून समस्त खानापूर व बेळगाव जिल्ह्याच्या परिचयाचे आहे. मौजे मुगळीहाळ सरकारी कॉलेज मध्ये खानापूर तालुक्यातील पदवीपूर्व महाविद्यालयाच्या सांस्कृतिक स्पर्धा सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर 2025 संपन्न झाल्या. या अंतर्गत इंग्रजी निबंध …

Read More »

भोजमध्ये साडेतीन एकर ऊसाला आग लावून ५ लाखाचे नुकसान

  ट्रान्सफार्मरमुळे लागली आग; हेस्कॉनसह पोलीस ठाण्यातर्फे पंचनामा निपाणी (वार्ता) : सध्या ऊसाचा गळीत हंगाम सुरू असून सकाळी दहा नंतर उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. अशातच भोज येथील ट्रान्सफार्मर मुळे सर्वे क्रमांक २७० मधील साडेतीन एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे दोनशे टन ऊसाचे नुकसान झाले …

Read More »

‘अरिहंत’ ऊस उत्पादकांचे हित जोपासले

  राजू खिचडे ; बोरगावमध्ये अभिनंदन, उत्तम पाटील यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : बोरगावसह परिसरातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ‘अरिहंत’च्या माध्यमातून अभिनंदन आणि उत्तम पाटील यांनी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्नशील आहेत. शेतकऱ्यासाठी नवनवीन योजना राबवून त्यांना अडचणीच्या वेळी मदतीचा हात दिला आहे. यंदाच्या ऊस गळीत हंगामात जैनापुर मधील अरिहंत शुगर इंडस्ट्रीजतर्फे …

Read More »