Saturday , April 18 2026
Breaking News

देश/विदेश

पोलीओ प्रमाणेच कोविडवरही भारत लवकरच मात करु शकेल :- एम व्यंकय्या नायडू

नवी दिल्ली : आज राष्ट्रीय लसीकरण दिवस आहे. लशींचं महत्त्व आणि लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १६ मार्च हा दिवस लसीकरण दिवस म्हणून पाळला जातो. याचं औचित्य साधून आजपासूनच १२ ते १४ वर्ष वयोगटातल्या मुला-मुलींसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरु केल्याबद्दल उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी समाधान व्यक्त केलं आहे. १८० कोटीपेक्षा …

Read More »

गांधी कुटुंबाने काँग्रेसचं नेतृत्व सोडावं : कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली : गांधी घराण्याने पद सोडावे आणि दुसर्‍या नेत्याला संधी द्यावी. पक्षाला पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे माहीत नसतील तर कल्पनेत जगणे सोडावं, अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षनेतृत्वावर हल्लाबोल केला. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेस कार्यकारिणीची (उथउ) रविवारी बैठक झाली. या बैठकीत …

Read More »

मगोपचं पाठिंब्याचं पत्र, गोव्यात भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा

मगोपचं पाठिंब्याचं पत्र, गोव्यात भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा विजयानंतर भाजपच्या पत्रकार परिषदेत सदानंद शेट तानावडेकडून मतदारांचे आभार पणजी : गोव्यात सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपला गोवा विधानसभेत 20 जागा मिळाल्या आहेत, तसंच अपक्ष आमदारांनीही आपला पाठिंबा भाजपला जाहीर केला आहे. त्यामुळे भाजप गोव्यात सरकार स्थापन करणार हे निश्चित झालं आहे. …

Read More »

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग पराभूत, दिग्गज नेते पिछाडीवर

अमृतसर : पंजाब विधानसभा निवडणूक निकाल आता स्पष्ट होत आहेत. आम आदम पार्टीने दिल्ली पाठोपाठ पंजाबचा गड जिंकला आहे. येथे तब्बल 89 मतदारसंघांमध्ये आपचे उमेदवार आघाडीवर आहेत. तसेच काँग्रेस आणि अकाली दलाचे दिग्गज उमेदवार पिछाडीवर पडले आहेत. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे पटियाला मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. पटियाला मतदारसंघातून त्यांनी …

Read More »

उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा योगी सरकार

सपाची कडवी झुंज, पण एकत्र न लढल्याचा फटका! लखनौ : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कडवी झुंज देऊनही भाजप सत्तेत वापसी करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दुपारी 12 पर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपने उत्तर प्रदेशातील 403 जागापैंकी 273 जागांवर आघाडी घेतली आहे. दुसरीकडे समाजवादी पक्ष 119 …

Read More »

पणजीत भाजपने गड राखला; उत्पल पर्रीकर पराभूत

पणजी: पणजी मतदारसंघात उत्पल पर्रीकर आणि बाबूश मोन्सेरात यांच्यातील लढतीकडे संपूर्ण गोव्याचे लक्ष लागले होते. भाजपने पणजीतून तिकीट नाकारल्याने उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष निवडणूक लढवली. मात्र त्यांना भाजपला टक्कर देण्यात अपयश आले आहे. उत्पल पर्रीकर यांचा 713 मतांनी पराभव झाला आहे. पणजीत बाबूश मोन्सेरात यांनी भाजपचा गड राखला. पणजीत भाजप समर्थक …

Read More »

सरकार स्थापनेसाठी मगोपची मदत घेणार : मुख्यमंत्री

सरकार स्थापनेसाठी मगोपची मदत घेणार : मुख्यमंत्री प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा प्रमोद सावंतांना विश्वास पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले होते. दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, आज मी पंतप्रधान मोदींना भेटलो, निवडणूकीच्या निकालाबाबत …

Read More »

पेशावरमध्ये मशिदीत आत्मघाती हल्ला, ३० ठार, ५६ जखमी

पेशावर : पाकिस्तानातील पेशावर शहरातील शिया मशिदीत शुक्रवारच्या नमाज पठणावेळी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ३० जण ठार आणि ५० हून अधिक जखमी झाले आहेत. मशिदीत नमाज पठणावेळी मोठी गर्दी होती. याच दरम्यान बॉम्बस्फोट झाला. बचावकार्य करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पेशावरमधील किस्सा ख्वानी बाजार भागातील जामिया मशिदीमध्ये शुक्रवारची नमाज अदा करत …

Read More »

नवाब मलिक यांच्या ईडी कोठडीत ७ मार्चपर्यंत वाढ

मुंबई : मनी लाँडरिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या ईडी कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्यांची ईडी कोठडी ७ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांची चौकशी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांच्या कोठडीत वाढ केली आहे. मलिक यांची आज ईडी कोठडी संपल्याने न्यायाधीश राहुल रोकडे …

Read More »

गेल्या 24 तासात 1300 भारतीयांची युक्रेनमधून सूटका

नवी दिल्ली : युक्रेनमधील बिघडलेली परिस्थिती लक्षात घेता तेथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढले जात आहे. परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत युक्रेनमध्ये अडकलेल्या भागातून 1300 हून अधिक लोकांना मायदेशी आणण्यात आले. रशियाच्या लष्करी हल्ल्यानंतर युक्रेनमधील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. अशा परिस्थितीत तेथे अडकलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला लवकरात लवकर …

Read More »