Monday , December 8 2025
Breaking News

देश/विदेश

नोटबंदीचा निर्णय घटनाबाह्य नाही! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; सर्व याचिका फेटाळल्या

  नवी दिल्ली : केंद्र सरकारनं 2016 मध्ये घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल दिला. यावेळी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयानं 2016 ची नोटाबंदी वैध ठरवली आहे. यासोबतच न्यायालयानं सर्व 58 याचिकाही फेटाळून लावल्या आहेत. 4 न्यायाधीशांनी बहुमतानं निर्णय दिला आहे. …

Read More »

मेक्सिकोमधील कारागृहात गोळीबार, 14 जणांचा मृत्यू, तर 24 कैदी फरार

  मेक्सिको : पुन्हा एकदा गोळीबारानं जगातील महासत्ता म्हणून ओळखली जाणारी अमेरिका हादरली आहे. उत्तर अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये एका कारागृहात अज्ञात बंदूकधारकांनी गोळीबार केला आहे. या घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 10 सुरक्षारंक्षांसह 4 कैद्यांचा समावेश आहे. वृत्तसंस्था एएफपीच्या म्हणण्यानुसार, रविवारी उत्तर मेक्सिकन शहरातील सिओडाड जुआरेजमधील एका तुरुंगावर अज्ञात …

Read More »

वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा चटका; एलपीजी गॅस सिलेंडर दरात वाढ

  नवी दिल्ली : नव्या वर्षाची सुरुवात महागाईच्या चटक्याने झाली आहे. इंधन कंपन्यांनी आज एलपीजी गॅस सिलेंडरचे दर जाहीर केले आहेत. प्रति सिलेंडरमागे 25 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ व्यावसायिक वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलेंडरसाठी लागू करण्यात आली आहे. तर, घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झाला …

Read More »

नवीन वर्षाचं दणक्यात स्वागत, रोषणाई अन् आतिषबाजीनं उजळला देश

नवी दिल्ली : 31 डिसेंबरच्या रात्री घडाळ्याच्या काट्याने बाराचा आकडा गाठल्याबरोबर देशभरात नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आलं. जल्लोषात, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये भारतीयांनी नवीन वर्षाचे स्वागत केले. जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी आणि महाराष्ट्र ते पश्चिम बंगाल संपूर्ण देशभरात नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटनस्थळावर गर्दी झाली आहे. त्याशिवाय अनेक …

Read More »

सीमेवरील एक इंचही जमीन कोणी हडप करू शकत नाही

  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा; आयटीबीपीच्या कार्यालयाचे उद्घाटन बंगळूर : चीनच्या सीमेवरील भारताची जमीन हडपण्याचे धाडस कोणीही करू शकत नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी प्रतिपादन केले. त्याचे श्रेय त्यांनी इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) च्या जवानांना दिले. मला भारत-चीन सीमेची कमीत कमी काळजी वाटते. कारण मला माहित आहे …

Read More »

चालकाला हार्टअटॅक, समोरुन येणाऱ्या कारला जोरदार धडक; ९ ठार, २८ जखमी

गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात भीषण अपघात सूरत : गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. बसने कारला दिलेल्या धडकेत नऊ प्रवासी ठार झाले असून, २८ जण जखमी झाले आहेत. प्रवाशांनी भरलेली बस सूरतमधील प्रमुख स्वामी महाराज शताब्दी महोत्सव कार्यक्रमातून परतत होती. यावेळी नवसारी राष्ट्रीय महामार्गावर बसने कारला धडक दिली. चालकाला ह्रदयविकाराचा …

Read More »

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात

  नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला असून, यामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून ऋषभ घरी येत असताना त्याच्या कारला हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रूरकीच्या नारसन सीमेवर हम्मदपुर झाल जवळील एका वळणावर ऋषभच्या कारचा अपघात झाला. …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे निधन

  वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांचे निधन …

Read More »

एनआयएची केरळमधील पीएफआयशी संबंधित तब्बल 58 ठिकाणांवर छापेमारी

  तिरुअनंतपुरम : राष्ट्रीय तपास यंत्रणेने आज पहाटे केरळमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) शी संबंधित तब्बल 58 ठिकाणांवर छापेमारी केली आहे. एनआयएचे वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार पीएफआयचे नेते अन्य नावावर पीएफआय सुरू करण्याच्या प्रयत्नात होते, त्यासंदर्भात कारवाई करण्यात आली आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएची छापेमारी पहाटे साडेचारपासून सुरू आहे. …

Read More »

देशात मोदींचं नाही तर अदानी अन् अंबानींचं सरकार : राहुल गांधी

  नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आज दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. आज काँग्रेसची भारत जोडो यात्रा दिल्लीत पोहोचली. ल यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं की, संपूर्ण देशाला माहित आहे की देशातलं हे सरकार नरेंद्र मोदींचे सरकार नाही, हे अंबानी अदानींचे …

Read More »