Monday , April 20 2026
Breaking News

बेळगाव

दोन दिवसांत मिळणार आंतरराज्य प्रवासाला हिरवा कंदील!

कोरोनामुळे आंतरराज्य वाहतुकीला मिळाला होता ब्रेक : कर्नाटक महाराष्ट्राकडून चर्चा सुरू निपाणी : कोरोनामुळे लॉकडाऊन काळात आंतरराज्य वाहतुकीला ब्रेक मिळाला होता. मात्र शासनाच्या परवानगीने पुन्हा वाहतूक सुरू झाली होती. मात्र मध्यंतरी पुन्हा कर्नाटक महाराष्ट्राच्या बस वाहतूक वरून वादंग झाला. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. शिवाय महाराष्ट्रातील बस …

Read More »

भाजी मार्केटचे वेळापत्रक पुन्हा पूर्ववत

बेळगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती बेळगाव आणि कृषी अधिकार्‍यांनी कोरोना काळामध्ये बदललेले भाजीमार्केटचे वेळापत्रक आता पुनश्च पूर्वीप्रमाणे करण्यात आले असून शेतकर्‍यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीने एका पत्रकाद्वारे केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती बेळगाव आणि कृषी अधिकार्‍यांनी कोरोना काळामध्ये भाजीमार्केटचे वेळापत्रक बदलले होते. मात्र …

Read More »

‘भारत बंद’ला प्रत्येकाने पाठिंबा द्यावा : कोडीहळ्ळी चंद्रशेखर

बेंगळुरू : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. अनेक शेतकरी संघटनांनी हे आंदोलन छेडले असून प्रत्येकाने भारत बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहन रयत संघटनेचे राज्य अध्यक्ष कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी केले आहे. केंद्राच्या कृषी सुधारणा कायद्याच्या विरोधात 27 सप्टेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला …

Read More »

बेळगावात शेतकर्‍यांची विविध मागण्यांसाठी निदर्शने

बेळगाव : साखर आयुक्तालयाचे स्थलांतर बेळगावात करावे, ऊस बिलाची बाकी रक्कम तातडीने द्यावी आणि शेतकर्‍यांच्या विविध मागण्या मान्य कराव्यात यासाठी शनिवारी शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरू सेने यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी निदर्शकांनी साखर आयुक्तालयाचे स्थलांतर बेळगावात करावे, ऊस बिलाची बाकी …

Read More »

सोयाबीन दर घसरणीच्या विरोधार्थ बैलहोंगलमध्ये जेडीएसची निदर्शने

बैलहोंगल : सोयाबीनचे दर जलदगतीने घसरत चालले आहेत. याविरोधात आज बैलहोंगल येथे राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधार्थ निषेध करत जेडीएस जिल्हाध्यक्ष शंकर मूडलगी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. बैलहोंगल शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा चौक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत पदयात्रा काढून निषेध मोर्चा काढण्यात आला. जेडीएसचे बैलहोंगल जिल्हाध्यक्ष शंकर मूडलगी यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

कॅन्टोन्मेंट बैठक : ऑनलाईन बिलात 5 टक्के सवलत

बेळगाव : शंभर टक्के महसूल वसुलीसाठी ऑनलाईन बिल भरणा करणार्‍या नागरिकांना बिलात 5 टक्के सवलत देण्याचा निर्णय बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मासिक बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ब्रिगेडियर रोहित चौधरी हे होते. कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाच्या सभागृहात काल गुरुवारी झालेल्या या बैठकीच्या प्रारंभी दिवंगत केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांना …

Read More »

मळेकरणी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी

उचगाव : उचगाव येथील अमरज्योत शिक्षण सेवा मंडळ संचलित मळेकरणी हायस्कूलमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना, कोविड-19 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी शुक्रवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी करण्यात आली. सध्या या परिसरात विद्यार्थ्यांना ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी अशा प्रकारचा वायरस असल्याने विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून शिक्षण खात्याने व शासनाने …

Read More »

कोल्हापूरच्या माहिती उपसंचालकपदी डॉ. संभाजी खराट रुजू

प्रशासकीय कामकाज अधिक लोकाभिमुख करा : डॉ. संभाजी खराट कोल्हापूर (जिमाका) : प्रशासकीय कामकाज अभ्यासपूर्ण व अधिक लोकाभिमुख करा, अशा सूचना कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांनी केल्या. कोल्हापूर विभागाच्या माहिती उपसंचालक पदाचा कार्यभार आज डॉ. संभाजी खराट यांनी स्विकारला, यावेळी आयोजित बैठकीत त्यांनी कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेतला. …

Read More »

बेळगाव-खानापूर-रामनगर महामार्गावर लवकरच तिन्ही भाषेत फलक

खानापूर (वार्ता) : बेळगाव ते खानापूर आणि अनमोडपर्यंतच्या रस्त्यावर तिन्ही भाषेतील फलक लावण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन धारवाड येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक श्रीकांत पोतदार यांनी दिले आहे. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पदाधिकार्‍यांनी गुरुवारी पोतदार यांची भेट घेऊन खानापूर ते रामनगर रस्त्याचे काम आणि फलक …

Read More »

राष्ट्र आणि धर्माचा आदर राखा : कीर्तनकार श्री. चारुदत्त आफळेजी

बेळगाव : राष्ट्र-धर्म प्रथम हा विचार सदैव लक्षात ठेवा आणि राष्ट्र विचारांनी प्रेरीत मित्रांचे संगठण बनवा, असा विचार सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार श्री. चारुदत्त आफळेजींनी मांडला. अंदमानमधील विवेकानंद केंद्रातर्फे चालविल्या जाणार्‍या 1400 विद्यार्थ्यांच्या विद्यालयात दि. 23 सप्टेंबर रोजी ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. विद्यालयाचे प्राचार्य श्री.एस.विजयकुमार, उपप्राचार्या अर्चना गुप्ता, पूर्णवेळ …

Read More »