Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

विधान परिषद निवडणूक : लक्ष्मण सवदी यांच्यासह सर्व उमेदवार अविरोध

बेंगळुरू : राज्य विधान परिषदेच्या सात जागांसाठी येत्या 3 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत उभे असलेल्या सर्व 7 उमेदवारांची अविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी आणि राज्य विधानसभा सचिव विशालाक्षी यांनी केली आहे. निवडणूक न होताच विधान परिषदेच्या 7 जागांसाठी उमेदवारांची अविरोध निवड झाली आहे. विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या 7 जागांसाठी …

Read More »

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत पवन, धनंजय, श्रेयन, दक्षण, एस. मीनाक्षी मेनन विजेतेपदाचे मानकरी

बेळगाव : कर्नाटक जलतरण संघटना व एनरआरजी केएलई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत विविध प्रकारात जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. तसेच एकूण 46 प्रकारात या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे उद्घाटन समारंभ निवृत्त आय. पी. एस. अधिकारी गोपाळ होसुर, पोलिस आयुक्त डॉ. एम. …

Read More »

धामणे येथे वरातीत डान्स, गाण्यांवरून २ गटांत संघर्ष; ५ जखमी : १० जणांना अटक

बेळगाव : नामफलक आणि वरातीत कन्नड गाणी लावण्याच्या वादातून २ गटांत झालेल्या संघर्षात ५ जण जखमी झाले. ही घटना बेळगाव तालुक्यातील धामणे गावात घडली आहे. यानंतर काही विघ्नसंतोषी लोकांनी या वादाला भाषिक संघर्षाचे स्वरूप देऊन मराठी भाषिकांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. याबाबत समजलेली हकीकत अशी की, धामणे गावात …

Read More »

अनगोळ येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बेळगाव : रघुनाथ पेठ अनगोळ येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. कौटुंबिक कलहातून त्यांनीही आत्महत्या केल्याचे उघडकीस आली आहे. महावीर चींनाप्पा सुपण्णावर (वय 60) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. यावेळी अनगोळ शिवारामध्ये काही शेतकरी सकाळच्या सत्रात शेतीकामे करण्याकरीता जात …

Read More »

कर्नाटकात पुन्हा ’हिजाब’ वाद! स्कार्फ बंदीवरुन मंगळूर विद्यापीठात तणाव

मंगळूर : कर्नाटकात पुन्हा ‘हिजाब’ वाद सुरु झाला आहे. मंगळूर विद्यापीठाने सध्याच्या गणवेश नियमात सुधारणा केली आहे. यानुसार विद्यार्थिनींना विद्यापीठाच्या संपूर्ण कॅम्पसमध्ये आणि वर्गात डोक्यावर स्कार्फ घालण्यावर बंदी घातली आहे. पण या निर्णयाला विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी जोरदार विरोध केला आहे. यामुळे विद्यापीठ कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा नवा …

Read More »

सफाई कर्मचार्‍यांच्या निवासी भागात समस्यांचा डोंगर!

बेळगाव : संपूर्ण बेळगावची स्वच्छता करणार्‍या सफाई कामगारांच्या निवासी भागात समस्यांचा डोंगर उभा राहिला असून हा भाग पायाभूत सुविधांपासून वंचित आहे. यामुळे येथील निवासी मनपा अधिकार्‍यांविरोधात तीव्र संताप व्यक्त करत आहेत. बेळगाव शहर हे स्वच्छ आणि सुंदर बनविणे हि बाब स्वप्नवतच आहे याचेच आणखीन एक उदाहरण म्हणजे स्वच्छता कामगारांचा निवासी …

Read More »

डी. के. शिवकुमारविरुध्द ईडीकडून आरोपपत्र दाखल

मनी लाँड्रिंग प्रकरणी आरोप बंगळूर : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंग विरोधी कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. दिल्ली न्यायालयात प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या (पीएमएलए) विविध कलमांतर्गत फिर्यादी तक्रार दाखल करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. फेडरल प्रोब …

Read More »

विधान परिषद निवडणुकीत विजय भाजपचाच : नलीनकुमार कटील

बेळगाव : राज्यात होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवारांचाच विजय होईल, तसेच बेळगाव भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असा विश्वास भाजप राज्याध्यक्ष नलीनकुमार कटील यांनी व्यक्त केलाय. वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार अर्ज भरण्यासाठी भाजप राज्याध्यक्ष नलीनकुमार कटील बेळगावमध्ये आले होते. नलीनकुमार कटील यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव, विजापूर, बागलकोट …

Read More »

विधान परिषद निवडणुकीसाठी बेळगावमध्ये भाजप मेळावा

बेळगाव : राज्यात होऊ घातलेल्या वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांना मत देऊन विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये भाजप मेळावा देखील आयोजित करण्यात आला होता. वायव्य पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार हनुमंत निराणी आणि शिक्षक मतदारसंघाचे अरुण शहापूर यांचे उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले. यानंतर …

Read More »

मराठा फेडरेशनचा भाजप सरकारला निर्वाणीचा इशारा : श्यामसुंदर गायकवाड

बेळगाव : कर्नाटक राज्यातील मराठा समाजाच्या प्रगतीसाठी गेली वीस वर्ष सातत्याने विविध मागण्या केल्या जात आहेत. प्रत्येक सरकार मराठा समाजाला आश्‍वासने देत आहे. राज्यातील विद्यमान भाजप सरकार मराठा समाजाचा राजकीय वापर करून घेत आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या विविध मागण्यांची पूर्तता केली जावी. यासाठी सरकारला 25 जूनपर्यंत मुदत दिली जात आहे. …

Read More »