बेळगाव : चंदगड तालुक्यातील कानडी या छोट्याशा खेडेगावामध्ये राहणारा एक नामवंत कवी, गायक, लेखक, अभिनेता कै. श्रीपती संभाजी कांबळे यांचे आकस्मित निधन झाले. ते हयात असताना कुणालाही माहीत नव्हत की त्याचे कुटुंब कसे होते. जेव्हा त्यांच निधन झालं तेव्हा मात्र सर्वाना धक्का बसला तो म्हणजे त्याच्या घरची हलकीची परिस्थिती …
Read More »दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत, पक्ष मजबूत करण्यासाठी काम करायचे आहे : मुख्यमंत्री सिद्धरामय्या
बेंगळूरु : गेल्या महिन्याभरापासून माझ्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात तीव्र मतभेदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावरून राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. मात्र आमच्या कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत आणि या पुढेही राहणार नाहीत. भाजप आणि जेडीएसच्या कटकारस्थानांना आम्ही दोघे मिळून समर्थपणे तोंड देऊ अशी माहिती, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी …
Read More »थायलंड – पटाया येथे मी. आशिया 2025 आणि मी. वर्ल्ड 2025 स्पर्धेत बेळगावचा दबदबा
बेळगाव : थायलंडच्या पटाया शहरात सुरू असलेल्या मी. आशिया – 2025 आणि मी. वर्ल्ड -2025 या आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धांमध्ये आज पुन्हा एकदा बेळगावच्या खेळाडूंनी आपली दमदार छाप उमटवत अभिमान वाढवला आहे. बेळगावचे श्री विनोद पुंडलिक मेत्री यांनी सिनियर मी. वर्ल्ड – 2025 स्पर्धेच्या 60 किलो वजनी गटात सुवर्ण …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक सोमवारी
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक सोमवार दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजी राजा शिवछत्रपती स्मारक येथे सकाळी ठीक ११ वाजता बोलावण्यात आलेली आहे. सदर बैठकीत कर्नाटक राज्याच्या बेळगांव येथे ८ डिसेंबर २०२५ रोजी होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली होणार्याला महामेळाव्याला पाठींबा …
Read More »विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन करणाऱ्या “त्या” प्राध्यापकाला श्रीराम सेना हिंदुस्थानकडून चोप
बेळगाव : बेळगाव शहरातील एका नामांकित महाविद्यालयामध्ये एचओडी म्हणून कार्यरत असणाऱ्या एका प्राध्यापकाकडून एका विद्यार्थिनीचा छळ सुरु होता. सदर प्रकरणाची तक्रार श्रीराम सेना हिंदूस्थानकडे आल्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘त्या’ प्राध्यापकाला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी विद्यार्थिनीची तक्रार दाखल करुन घेऊन त्या प्राध्यापकावर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी श्रीराम …
Read More »निवृत्त सैनिकाला पोलिसांकडून बुटांनी मारहाण; नंदगड येथील घटना
खानापूर : हेल्मेट नसल्याच्या क्षुल्लक कारणावरून निवृत्त सैनिकाला पोलिसांकडून बुटांनी मारहाण केल्याची निंदनीय घटना खानापूर तालुक्यातील नंदगड येथे घडली आहे, त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जनतेत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिसांनीच नियम धाब्यावर बसवत वयोवृद्ध निवृत्त सैनिकावर अमानुष्यवृत्ती अत्याचार केल्याची …
Read More »“सीमाप्रश्न संपलेला विषय” खासदार शेट्टर बरळले!
बेळगाव : सीमाप्रश्न संपलेला विषय आहे. महाजन अहवालच अंतिम असल्याची गरळ खासदार जगदीश शेट्टर यांनी ओकली असून या वक्तव्यामुळे मराठी भाषिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की, बेळगावचे जिल्ह्याचे विभाजन गरजेचे आहे. विभाजन झाल्याने विकास कामांना गती मिळेल. सीमाप्रश्नी विचारले असता म्हणाले, सीमाप्रश्न …
Read More »भारताला शांतता, स्वसंरक्षण कसे करायचे याचे चांगले ज्ञान : पंतप्रधान नरेंद्र मोदी
लक्षकंठ गीता पारायण कार्यक्रमात सहभाग बंगळूर : भारताला शांतता कशी राखायची आणि स्वतःचे रक्षण कसे करायचे हे माहित आहे, असे पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता. २८) सांगितले. युद्धभूमीवर भगवद्गीतेचा उपदेश देणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचा उल्लेख करत पंतप्रधानानी, शांतता राखण्यासाठी आणि सत्याचे समर्थन करण्यासाठी अत्याचाऱ्यांना नष्ट …
Read More »आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांकडून डॉक्टरांची झाडाझडती, निलंबनाचे आदेश…
कोल्हापूर : काल ठाकरे शिवसेने नेते कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयातील अव्यवस्थेवर बोट ठेवल्यानंतर आज आरोग्य तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रुग्णालयाला अचानक भेट देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. महिनाभराहून अधिक काळ शस्त्रक्रिया रखडणार असतील तर लोकांनी काय रस्त्यातच मरावेत का, असा उद्विग्न प्रश्न पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. कामचुकार वैद्यकीय …
Read More »धुळ- खड्ड्यामध्ये हरवला बोरगाव सर्कल!
कर्नाटक -महाराष्ट्राला जोडणारा सर्कल दुर्लक्षित ; दिवसभर वाहतुकीची कोंडी निपाणी (वार्ता) : कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणारा बोरगाव सर्कल आणि रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पण अलीकडच्या काळात वाहनधारकांची संख्या वाढल्याने या सर्कल रस्त्यावरील खडी निघाली असून वाहनांचा वर्दळी धूळ आणि मातीचा त्रास होत आहे. शिवाय वाहतुकीमुळे दिवसभर कोंडी होत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta