एकाही मराठी भाषिकाचे नाव वगळू देणार नाही; बूथ निहाय यंत्रणा तातडीने उभी करण्याचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे आदेश बेळगाव : विशेष मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेच्या माध्यमातून मराठी भाषिक मतदारांची नावे वगळण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही. प्रत्येक मराठी भाषिक मतदाराचे नाव मतदार यादीत कायम राहावे, यासाठी समितीच्या …
Read More »संततधार पावसाचा कहर; हब्बनहट्टीचे मारुती मंदिर पाण्याखाली
खानापूर : खानापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार व संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील मलप्रभा नदीसह म्हादई, मंगोत्री, काळी, पांढरी आणि मार्कंडेय नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील दोन दिवसांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त …
Read More »कृष्णा–पंचगंगा नदीला पूर; दत्त मंदिर परिसरात सतर्कतेचा इशारा
बेळगाव : महाराष्ट्रातील पश्चिम घाट परिसरासह बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. परिणामी, दोन्ही नद्यांच्या संगमावर असलेले प्रसिद्ध संगमेश्वर मंदिर पूर्णपणे पुराच्या पाण्यात बुडाले असून, परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत तब्बल …
Read More »व्याजाच्या रकमेसाठी जीवे मारण्याची धमकी, दोघे जेरबंद
बेळगाव : बेकायदेशीररीत्या व्याजाचा धंदा करून कर्जदाराकडून मोठ्या प्रमाणात व्याज वसूल करत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघा आरोपींना रायबाग पोलिसांनी रविवारी अटक केली. रोहिदास गल्ली येथील विठ्ठल तुकाराम माने यांनी आरोपींकडून ३.१० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, आतापर्यंत तब्बल १८.६० लाख रुपये व्याजापोटी भरूनही आरोपी आणखी पैशांची मागणी …
Read More »बोरगाव इंदिरा कॅन्टीनचे काम पूर्ण होऊनही उद्घाटनाअभावी नागरिकांमध्ये नाराजी
निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारतर्फे बोरगाव येथे उभारण्यात आलेल्या इंदिरा कॅन्टीनचे काम पूर्ण होऊनही अद्याप कॅन्टीन सुरू झालेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून उद्घाटनाच्या श्रेयवादामुळेच कॅन्टीनच्या प्रारंभाला विलंब होत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सुमारे ८५ लाख खर्च करून इंदिरा कॅन्टीन उभारण्यात आले आहे. …
Read More »26 व्या वर्षीही अखंड अमरनाथ यात्रेला प्रारंभ; कपिलेश्वर मंदिराच्या वतीने यात्रेकरूंचा सत्कार
बेळगाव : मागील 26 वर्षांची अखंड परंपरा जपत यंदाही बेळगाव शहरातून अमरनाथ यात्रेला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. सोमनाथ हलगेकर आणि अमित चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अमरनाथ यात्रेसह बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री, गंगोत्री तसेच पंचकेदार यात्रा आयोजित करण्यात आली आहे. यावर्षीही गतवर्षीप्रमाणे कपिलेश्वर मंदिराचे सेवेकरी मोठ्या संख्येने या पवित्र यात्रेत सहभागी झाले …
Read More »हिरेण्यकेशी नदीच्या पाणी प्रवाहात वाढ; धुपदाळ जलाशयातून पाण्याचा विसर्ग
बेळगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे हिरेण्यकेशी आणि घटप्रभा नद्यांमध्ये पाण्याची आवक वाढली असून, त्याचा परिणाम म्हणून धुपदाळ जलाशय पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे जलाशयातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. रविवारी सकाळी मंत्री जारकीहोळी यांनी घटप्रभा …
Read More »पहिल्या पावसातच बसस्थानक आवारात खड्डे; सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ साचले पाणी
निपाणी (वार्ता) : गेल्या तीन-चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे येथील बस स्थानकावर पडलेल्या खड्ड्यामध्ये पाणी साचून त्याच्या आकारात वाढ झाली आहे. त्यामुळे चालक, वाहकासह प्रवाशांची गैरसोय होत आहे. दरवर्षी पडणाऱ्या खड्ड्यामुळे प्रवाशातून संताप व्यक्त होत आहे. याशिवाय स्थानकातील सार्वजनिक स्वच्छतागृह जवळ पाणी साठल्याने प्रवाशांना ये -जा करणे कठीण झाले …
Read More »दमदार पावसामुळे यमगर्णी, वेदगंगेचे पाणी पात्रबाहेर
कोकण भागातील पावसाने पातळी वाढली; विद्युत मोटारी काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ निपाणी (वार्ता) : दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे वेदगंगा आणि दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या दोन दिवसापासून वाढ झाली आहे. त्यामुळे वेदगंगेचे पाणी पात्रा बाहेर पडले असून गवताचे गड्डे पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहेत. तर नदीकाठच्या विद्युत मोटारी काढण्यासाठी ग्रामपंचायत …
Read More »पृथ्वी सूर्यापासून सोमवारी जाणार सर्वाधिक दूर
‘अपसूर्य’ स्थितीचा अनुभव; डोळ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या निपाणी (वार्ता) : पृथ्वीची सूर्याभोवतीची कक्षा पूर्णपणे गोल नसून ती लंबवर्तुळाकार (इलिप्टिकल) असल्यामुळे पृथ्वी आणि सूर्या मधील अंतर वर्षभरात कमी-अधिक होत असते. साधारणपणे ३ जानेवारीच्या सुमारास हे अंतर सर्वात कमी असते. या स्थितीला उपसूर्य (पेरिहेलियन) असे म्हणतात. त्यानंतर हे अंतर वाढत जाऊन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta