Tuesday , July 28 2026
Breaking News

Belgaum Varta

खानापूर विद्यानगरात विकास कामाला अडथळा आणणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करा; नागरिकांची मागणी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील विद्यानगरातील सर्वे नंबर ९२/२ मध्ये नगरपंचायतीकडून गटारी, रस्ते आदी विकास कामे केली जात आहेत. असे असताना विद्या नगरातील रहिवासी निळू पाटील हे नगरपंचायतीच्या चीफ ऑफिसराना व इजिनिअरना मोबाईल व्दारे विद्या नगरात विकास काम का करता. सर्वे नंबर ९२/२ ही जमिन सरकार जमा झाली आहे. …

Read More »

बेळगावच्या श्री ज्योतिर्लिंग मंदिराला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची खास भेट

  बेळगाव : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूरच्या कार्यालयीन कर्मचारी वर्गाने काल बुधवारी शिवबसवनगर बेळगाव येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिराला खास सदिच्छा भेट देऊन मंदिराचे लाकडी काम आणि शिस्तबद्ध नियोजनाची प्रशंसा केली. शिवबसवनगर येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिराची वास्तू, गाभारा वगैरेचे लाकडी काम, नवरंग आदींची मंदिराला भेट देणाऱ्या भक्तमंडळींकडून मोठ्या प्रमाणात प्रशंसा …

Read More »

पाचवी, आठवीची परीक्षा घेण्यास न्यायालयाचा ग्रीन सिग्नल

  २७ मार्चपासून बोर्डाची परीक्षा; सर्वच विद्यार्थी होणार उत्तीर्ण बंगळूर : उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे. पाचवी आणि आठवीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करणाऱ्या उच्च न्यायालयाच्या एकल सदस्यीय खंडपीठाच्या आदेशाला राज्य सरकारने आव्हान देत विभागीय खंडपीठात अपील दाखल केले होते. १० दिवसांनंतर …

Read More »

दुग्धाभिषेक सोहळ्यास मुख्यमंत्री बोम्माई यांच्याकडून विघ्न!

  बेळगाव : राजकीय स्वार्थ समोर ठेवून राष्ट्रीय पक्षाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरून बेळगावमध्ये दोन राष्ट्रीय पक्षामध्ये श्रेयवादाचे राजकारण केले गेले. या गलिच्छ राजकारणाच्या निषेधार्थ मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने 19 मार्च रोजी राजहंसगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे. या भव्यदिव्य सोहळ्याची जनजागृती आणि जनतेचा प्रतिसाद पाहून आगामी …

Read More »

समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांचा वाढदिवस साजरा

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे धडाडीचे नेते, श्रीरामसेना हिंदुस्थानचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते रमाकांत कोंडुसकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. रमाकांत कोंडुसकर यांनी आजवर केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत अनेक संस्था-संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी व्यक्तिशः भेट घेऊन त्यांचे अभिष्टचिंतन करत पुढील कार्याला …

Read More »

घंटा वाजवत आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पालिका प्रशासनाची भेट

निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरात अजूनही 24 तास पाणी योजना पूर्ण क्षमतेने सुरू नाही. याशिवाय अनेक प्रभागात चार ते सहा दिवसातून एकदा पाणी येत आहे. याशिवाय पाणी येण्यापूर्वी काही वेळ हवा येत असल्याने मीटर फिरून त्याचे बीलही नागरिकांना दिले जात आहे. त्यासंदर्भात नगरपालिकेवर मोर्चा काढून बऱ्याचदा निवेदन दिले होते. …

Read More »

राजगड सज्जनगड मोहिम पूर्ण; मावळा ग्रुपची राजगडला भेट

निपाणी (वार्ता) : येथील मावळा ग्रुपच्या २५० सदस्यांनी राजगडला भेट देऊन या किल्ल्याची माहिती जाणून घेतली. ग्रुपच्या व्दितीय वर्धापन दिनानिमित्त या गडकोट मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. गतवर्षी प्रतापगड व रायगड किल्ल्याला भेट देण्यात आली होती. यावर्षी सज्जनगड व राजगड मोहीम पूर्ण करण्यात आली. राजगडावर सचिन खोपडे यांनी या गडाची …

Read More »

अज्ञात महिलेवर केले महिलांनी अंत्यसंस्कार!

  बेळगाव : एका निराधार महिलेचा काल रात्री सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आणि त्या महिलेचे अंतिम संस्कार करण्यासाठी आमच्याकडून मदत हवी असल्याचा फोन गंगाबाई जगताप यांचा आला. लागलीच सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनच्या सीईओ प्रेमा पाटील, कीर्ती चौगुले आणि प्रज्ञा शिंदे यांच्या मदतीने तिच्यावर अंतिम संस्कार करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी मृतदेह …

Read More »

श्री जोतीबा यात्रेप्रसंगी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी

  बेळगाव : श्री जोतीबा यात्रा काळात सासनकाठी व भक्ताना निवासांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी कंग्राळी खुर्द (ता. जि. बेळगाव) गावच्या ग्रामस्थांच्यावतीने पश्चीम महाराष्टू देवस्थान समितीकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शेकडो वर्षांचा परंपरेप्रमाणे कंग्राळी खुर्द गावची सासनकाठी व भक्त श्री जोतीबा यात्रेला जातात. तेथे गट क्र. 7 …

Read More »

खानापूर नगरपंचायतीच्या बैठकीत बाजारात चारचाकी, अवजड वाहनांना बंदी घालण्यावर वादळी चर्चा

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील शिवस्मारक चौक ते महाजन खूट पर्यंतच्या रस्त्यावर बाजारपेठेत दिवसेदिवस भयानक गर्दी उसळत आहे. अशा बाजारात चारचाकी, अवजड वाहनांना सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत पूर्ण बंदी घालण्यात यावी, अशी जोरदार चर्चा करण्यात आली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष नारायणराव मयेकर होते. व्यासपीठावर उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, …

Read More »