Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

सामान्य जनताच युवा नेते उत्तम पाटलांना आमदार करेल

  माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी : हदनाळ येथे हळदी कुंकू कार्यक्रम कोगनोळी : सर्वसामान्य जनताच 2023 सालच्या निवडणुकीत युवा नेते उत्तम पाटील यांना आमदार करेल, कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन काम करण्याचे त्यांचे काम कौतुकास्पद आहे, असे मनोगत माजी आमदार प्राध्यापक …

Read More »

चिकोडी जिल्ह्यातून विधानसौधला १० हजार शेतकऱ्यांचा घेराव

राजू पोवार : आंदोलनाची तयारी पूर्ण निपाणी (वार्ता) : येत्या १९ डिसेंबर रोजी बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य रयत संघटने तर्फेआंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी चिकोडी जिल्ह्यातून १० हजार शेतकऱ्यांचा सहभाग राहणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून त्यामध्ये शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन चिकोडी …

Read More »

केंद्र सरकारकडूनच राज्य सरकारचा पर्दाफाश

  सिध्दरामय्यांचा आरोप; एससी, एसटी आरक्षण वाढ प्रकरण बंगळूर : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या वाढत्या आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्रातील भाजप सरकारने राज्यातील भाजपचे रंग उघड केल्याचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, लोकसभेत आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा वाढविण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे सांगून केंद्र सरकारने अनुसूचित जाती-जमातींचे …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारीत बेळगावात

  निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर केंद्रीय नेते करणार राज्याचा दौरा बंगळूर : गुजरात निवडणुकीनंतर भाजप नेत्यांनी आता कर्नाटक निवडणुकीकडे लक्ष दिले आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासह पक्षाचे केंद्रीय नेते, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्याला भेट देऊन भाजपच्या मेळाव्यात भाग घेणार आहेत. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात …

Read More »

शहीद जवान राजेंद्र कुंभार अमर रहे!

  साखरवाडीतील जवान कुंभार यांचा अपघाती मृत्यू : रात्री उशिरा अंत्यसंस्कार निपाणी (वार्ता) : येथील साखरवाडी भागातील जवान राजेंद्र पांडूरंग कुंभार (वय ४५ रा. साखरवाडी, निपाणी) यांचा फिरोजाबाद जवळील तोंदली रेल्वे स्टेशनजवळ अपघाती मृत्यू झाल्याची घटना ८ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता घडली होती. जवानाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच या …

Read More »

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रश्नी सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल

  नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सतीष विडोळकर आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य मिशन यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील १५० गावांनी इतर राज्यात जाण्याच्या भूमिकेला या याचिकेत विरोध करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य विरूद्ध भारत …

Read More »

19 डिसेंबर रोजी शेतकरी संघटना हजारोंच्या संख्येने घालणार सुवर्णसौधला घेराव!

  बेळगाव : येत्या 19 डिसेंबर रोजी बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य रयत संघटन आणि हसीर सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य रयत संघटनेचे कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी दिली. बेळगाव शहरातील शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या आंदोलनाची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांना जास्त खोटे …

Read More »

चंद्रकांत पाटलांवर पुण्यात शाईफेक; शाई फेकणारे तिघे ताब्यात

  पुणे : महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडे दाखवून ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या घरी असताना त्यांच्या अंगावर शाई फेक करण्यात आली. एका कार्यकर्त्याच्या घरुन निघत असताना चंद्रकांत पाटील यांच्यावर अचानक एका व्यक्तिनं शाई फेकली. यावेळी पोलिसांनी त्या व्यक्तिला लगेच ताब्यात घेतलं. चंद्रकांत पाटील …

Read More »

विराटने मोडला रिकी पॉंटिंगचा विक्रम, वनडेत ४० महिन्यांनी केले शतक

  नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत कमाल करून दाखवली. विराटने वनडेमधील ४४वे शतक पूर्ण केले. विराटच्या बॅटमधून ४० महिन्यानंतर वनडेमध्ये शतक आले. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराटने ११३ धावा केल्या. त्याने ९१ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकार मारले. या खेळीत विराटने ईशान किशनसोबत २९० धावांची …

Read More »

लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे वृद्धापकाळाने निधन

  मुंबई : लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांचं निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज दुपारी 12 च्या सुमारास मुंबईतील गिरगावमधील फणसवाडी येथील निवासस्थानी त्यांचे निधन झाले. साठ वर्षांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायनातून रसिकांच्या मनावर …

Read More »