मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल जत तालुक्यातील ४० गावं आणि आज सोलापूर, अक्कलकोटमधील कानडी भाषिकांवरून केलेल्या विधानांमुळे महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. दरम्यान, सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना परखड शब्दात सुनावले आहे. जर ते बेळगाव, कारवार, निपाणी यासह इतर मराठी भाषिक प्रदेश …
Read More »“कुणीही यावं, टपली मारून जावं आणि आम्ही…”, उद्धव ठाकरेंचं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर टीकास्र
मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमाभागातील काही भागावर दावा केल्यावरून सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सांगलीतल्या जत तालुक्यातील ४० गावांवर कर्नाटक सरकारने दावा सांगण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर त्यांच्यावरही बोम्मई यांनी खोचक शब्दांत ट्वीट करत टीका केली. त्यानंतर …
Read More »निपाणी येथे आढळले नवजात अर्भक!
अधिकाऱ्यांनी दाखवली माणुसकी : अर्भक बेळगाव बिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल निपाणी (वार्ता) : शहराच्या पश्चिमेला असलेल्या बदलमुख रस्त्याच्या कडेला गुरुवारी (ता.२४) सकाळी नवजात अर्भक आढळून आले. पुरुष जातीचे अर्भक एका पिशवीत सोडले होते. साक्षीदाराने अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानुसार महिला व बालविकास अधिकारी, डी. बी. सुमित्रा, डॉ. जी. बी. मोरबाळे यांच्या …
Read More »शेतकऱ्यांना त्रास द्याल तर रेल्वे मार्गच बंद करू : के. के. कोप्प वासीयांचा निर्धार
खानापूर (प्रतिनिधी) : के. के. कोप्प या गावी नवीन होणाऱ्या रेल्वे मार्ग विरोधात शेतकऱ्यांची बैठक नुकताच पार पडली. यावेळी शेतकरी वर्गाने, कोणत्याही परिस्थितीत आपली १ इंच जमीन रेल्वेसाठी देणार नाही, अशी भावना व्यक्त केली. स्वतःच्या स्वार्थासाठी गरीब शेतकऱ्यांचा बळी देण्याचा प्रयत्न राजकीय व्यक्तीकडून होत आहे अशा प्रवृत्तीचा निषेध करण्यात …
Read More »लष्करी सेवेत अग्निवीर सुविधांबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
बेळगाव : एकदिवसीय प्रेरक अभ्यास भेटीचा भाग म्हणून गोपालजी पी. यू. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आणि देवेंद्र जिनगौडा हायस्कूल, शिंदोळीच्या विद्यार्थी यांच्यासह गोपाल जिनगौडा फाऊंडेशनचे अध्यक्ष गोपाळ डी. जिनगौडा, सचिव, प्राचार्य, मुख्याध्यापिका आणि कर्मचारी यांनी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट सेंटर बेळगावला कर्नल बिस्वास यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने अलीकडे …
Read More »कर्नाटक आणि पाकिस्तानमध्ये काय फरक, सीएम बोम्मईंवर नीलम गोऱ्हेंचा प्रहार
मुंबई : सांगली जिल्ह्यातील 40 गावांवर दावा सांगितल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील ‘सोलापूर आणि अक्कलकोट प्रदेश कर्नाटकचे असल्याचा वक्तव्य बोम्मई यांनी केले. यावर आता नव्याने राजकीय वाद सुरू झाला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. सोलापूर आणि …
Read More »..म्हणे सोलापूर, अक्क्लकोटही घेऊ : बोम्मई यांचा महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न
बेंगलोर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे एकही गाव कर्नाटकला देणार नाही, असं स्पष्ट केल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा ट्वीट करुन मराठी भाषिक आणि महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. कन्नड भाषिक बहुसंख्य असलेले अक्कलकोट आणि सोलापूर कर्नाटकात विलीन करावेत, अशी मागणी करुन कर्नाटकची एक इंच भूमी …
Read More »जनावरे दगावलेल्या शेतकऱ्यांचे डॉ. सरनोबत यांच्याकडून सांत्वन
खानापूर : खानापूर तालुक्यात लम्पिने धुमाकुळ घातला आहे. लम्पिमुळे तालुक्यात अनेक जनावरे दगावली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. कारलगा येथे लम्पिमुळे सुनील मनोहर पाटील यांच्या बैलाचा मृत्यू झाला आहे. कारलगा येथील सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील यांनी भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्याकडे मदत मागितली त्यांनी तात्काळ पशु …
Read More »ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन? अफवा की सत्य…
मुंबई : : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त काल (दि.२३) रात्री पासून येत आहे. मात्र त्यांच्या कुटूंबिंयाकडून निधनाचे वृताबाबत नकार देण्यात आला आहे. तर दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने अद्याप याची पुष्टी केलेली नाही. तसेच रुग्णालय प्रशासनाकडून अजून याची अधिकृत घोषणा केलेली नाही. या संदर्भात आज सकाळी …
Read More »सीमाप्रश्नी कर्नाटकची लवकरच सर्व पक्षीय बैठक
मुख्यमंत्र्यांचे विरोधी पक्षाना पत्र, सीमा सल्लागार समिती स्थापन्याची सिध्दरामय्यांची सूचना बंगळूर : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी विरोधी पक्ष नेत्यांना एक पत्र लिहून महाराष्ट्र -कर्नाटक सीमा वादासंदर्भातील याचिकेच्या संदर्भात लवकरच सर्वपक्षीय बैठक घेण्याचा विचार करत असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान विरोधीपक्षनेते सिध्दरामय्या यांनी या प्रश्नी सल्लागार समिती स्थापन करण्याचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta