Tuesday , December 16 2025
Breaking News

Belgaum Varta

न्यायालयात आवारातच पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला!

  बेळगाव : कौटुंबिक वादामुळे घटस्फोटासाठी एक जोडपे न्यायालयात आले होते, परंतु पतीने न्यायालयात आवारातच पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. ही घटना बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती शहरात घडली. सौंदत्ती तालुक्यातील करिकट्टी गावातील ऐश्वर्या गणाचारी हिच्यावर बैलहोंगल तालुक्यातील सवंतगी गावातील मुथप्पा गणाचारी याने चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी महिलेवर सौंदत्ती …

Read More »

वडगाव श्री मंगाई देवी यात्रोत्सवाला भक्तिभावाने प्रारंभ…

  बेळगाव : नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या बेळगावच्या वडगाव येथील श्री मंगाई देवीच्या यात्रोत्सवाला आज भाविकांच्या प्रचंड गर्दीत उत्साहात सुरुवात झाली. बेळगाव शहरातील ही सर्वात मोठी यात्रा असल्याने वडगावच्या नागरिकांनी यासाठी जय्यत तयारी केली आहे. मानकरी चव्हाण-पाटील घराण्याकडून सर्व धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले असून, मंगळवारी देवीला गाऱ्हाणे …

Read More »

मराठी भाषा प्रेरणा मंचतर्फे खानापूर तालुक्यातील गुणी विद्यार्थ्यांचा शुक्रवारी गौरव

  ओलमनी शाहू हायस्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन जांबोटी : मराठी भाषा प्रेरणा मंच बेळगाव यांच्या वतीने खानापूर तालुक्यातील मराठी माध्यमातून दहावी उत्तीर्ण झालेल्या पहिल्या 10 विद्यार्थ्यांचा गुणगौरव व रोख पारितोषिक वितरण कार्यक्रम शुक्रवार दिनांक 25 रोजी ओलमणी येथील राजर्षी शाहू हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. मराठी भाषा प्रेरणा मंच बेळगाव च्या …

Read More »

कॉ. कला सातेरी यांना अखेरचा लाल सलाम; मरणोत्तर देहदान

जायंट्स आय फौंडेशनच्या माध्यमातून मरणोत्तर देहदानाचा केला होता संकल्प बेळगाव : गुरुवार पेठ, टिळकवाडी येथील रहिवासी कॉ. सौ. कला नागेश सातेरी (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दि. २२ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती माजी महापौर ऍड. नागेश सातेरी, मुलगा ऍड. अजय सातेरी, मुलगी प्रा. शीला मेणसे, सून सुनिता …

Read More »

माजी महापौर नागेश सातेरी यांना पत्नीवियोग

  बेळगाव : गुरुवार पेठ टिळकवाडी येथील रहिवासी कॉ. सौ. कला नागेश सातेरी (वय 72) यांचे अल्पशा आजाराने आज मंगळवार दि. 22 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती माजी महापौर ऍड. नागेश सातेरी, मुलगा ऍड. अजय सातेरी, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. जायंट्स आय फौडेशनच्या माध्यमातून त्यांचे मरणोत्तर …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

  बंगळूर : मुडा भूखंड वाटपाच्या संदर्भात ईडीने त्यांच्या पत्नी पार्वती यांना बजावलेले समन्स रद्द करण्याचा आदेश कायम ठेवणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्वागत केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा ऐतिहासिक आदेश केंद्र सरकारला चपराक असल्याची त्यांनी निकालावर प्रतिक्रीया दिली. मुडा प्रकरणासंदर्भात माझ्या आणि माझ्या कुटुंबावर बनावट आरोप करणाऱ्या …

Read More »

बेळगावातील तिसरे रेल्वे ओव्हर ब्रिजवरील खड्ड्यांवर अनोखे आंदोलन

  बेळगाव : बेळगाव शहरातील तिसऱ्या रेल्वे गेटजवळ वाढलेल्या खड्ड्यांविरोधात येथील नागरिकांनी रांगोळी काढून अभिनव पद्धतीने निषेध व्यक्त केला. येत्या दोन-तीन दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. बेळगावच्या चौथ्या रेल्वे गेटवर भुयारी मार्ग बांधकामामुळे वाहतूक वळवण्यात आली आहे. यामुळे तिसऱ्या रेल्वे गेटवर वाहतुकीची कोंडी …

Read More »

2006 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी उच्च न्यायालयाचा धक्कादायक निकाल; आरोपी निर्दोष

  मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील लोकल ट्रेनच्या फर्स्टक्लास डब्यांमध्ये 11 जुलै 2006 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा धक्कादायक निकाल आज उच्च न्यायालयाने दिला. या स्फोटात 284 जणांचा मृत्यू आणि 800 पेक्षा अधिक जखमी झालेले होते. या प्रकरणात तपास यंत्रणांनी अटक केलेल्या 4 आरोपींना सत्र न्यायालयाने फाशीची तर उर्वरित …

Read More »

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा

  नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आरोग्याच्या कारणामुळे पद सोडले असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले की, ‘प्रकृतीला प्राधान्य देण्यासाठी वैद्यकीय सल्ल्याचे पालन करत मी संविधानाच्या कलम 67(अ) नुसार तात्काळ भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे.’ जगदीप धनखड यांनी …

Read More »

मुडा प्रकरण : ईडीचा अर्ज ‘सर्वोच्च’ने फेटाळला; मुख्यमंत्री सिद्धरामय्या, त्यांच्या पत्नी पार्वती यांना दिलासा

  बंगळूर : म्हैसूर विकास प्राधिकरण (मुडा) घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती आणि नगरविकास मंत्री भैरथी सुरेश यांना ईडीने बजावलेले समन्स रद्द करण्याचा राज्य उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. त्यामुळे मुडा प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांच्या पत्नी पार्वती यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि …

Read More »