Friday , March 14 2025
Breaking News

Belgaum Varta

राज्यात 1 जूननंतर लॉकडाऊन संपणार की, वाढणार?

मुंबई : कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. अशातच राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येचा आलेख आता उतरणीला लागल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या राज्यात 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. परंतु, 1 जूननंतर लॉकडाऊन वाढणार …

Read More »

श्री महालक्ष्मी ग्रुपच्यावतीने कोरोना केअर सेंटरचे उद्घाटन

खानापूर : श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक श्री. विठ्ठल हलगेकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या महालक्ष्मी सौंसर्गिक रोग व आपत्ती निवारण समितीच्या वतीने शांतिनिकेतनमध्ये कोरोना केअर सेंटरची सुरुवात करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन सोमवार दिनांक २४ मे रोजी अवरोली माठादिष श्री चन्नबसव देवरू व रामदासजी महाराज तोपिनकट्टी यांच्या सानिध्यात झाले. अध्यक्षस्थानी विठ्ठल …

Read More »

बेळगाव जिल्हा रुग्णालयात आता पोलिस तैनात

बेळगाव : बेळगाव जिल्हा रुग्णालयात (बिम्स) कोरोना रुग्णासोबत येणाऱ्या इतरांना / अटेंडरना आत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तरीही संबंधीत या आदेशाला जुमानत नसल्याने रविवारपासून जिल्हा रुग्णालयातील विविध विभागात पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांसोबत त्यांची देखभाल करण्यासाठी आलेल्यांनाही कोरोनाची बाधा होत असल्याने संबंधितांना आपत्कालीन विभाग, मेडिकल वार्ड आणि …

Read More »

ॲम्ब्युलन्ससाठी दर निश्चित : ज्यादा दर आकारल्यास कारवाई

बेंगळुरू : कोरोना प्रादुर्भाव काळात खाजगी ॲम्ब्युलन्स चालकांनी ज्यादा दर आकारण्यात यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे. तसेच खाजगी ॲम्ब्युलन्ससाठी ठराविक दरपत्रक जाहीर केले असून त्यानुसारच दर आकारावा अशी सूचना करण्यात आली आहे.कोरोना प्रादुर्भाव काळात रुग्ण संख्येत सध्या झपाट्याने वाढ होत असल्याने ॲम्ब्युलन्सना मागणी वाढली आहे ॲम्ब्युलन्सची सेवा …

Read More »

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या पालकांनी घाबरु नये : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात येऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा अधिक धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्ससोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांनाही …

Read More »

मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजेंच्या महाराष्ट्र दौऱ्याला कोल्हापुरातून सुरुवात

कोल्हापूर – मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकाचे दर्शन घेऊन महाराष्ट्र राज्याचा दौरा सुरू केला आहे. यावेळी वेगवेगळ्या समाजातील पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे सर्वच आंबेडकरवादी संघटनेसह बारा बलुतेदार यांनीही मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पाठिंबा दिला. …

Read More »

कोल्हापुरात लॉकडाऊन शिथिल; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन रात्री संपताच आज सकाळी सात ते अकरा दरम्यान ग्राहकांनी खरेदीसाठी झुंबड उडवली. भाजीपाल्यासह धान्य, आंबे, चक्क वडापाव घेण्यासाठी सुद्धा ग्राहकांनी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी रास्त धान्य भाव दुकानांसमोर रांगा लावल्या होत्या. एकंदरीतच कडक लॉकडाऊन शिथिल झाल्याचा परिणाम आज सकाळी दिसून आला. शहरातील मुख्य बाजार …

Read More »

राज्यात लस, ब्लॅक फंगसच्या औषधांचा तुटवडा : आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर

बेंगळुरू : राज्यात लस, ब्लॅक फंगसच्या औषधांचा तुटवडा आहे हे सत्य आहे. ही समस्या सोडवण्यासाठी केंद्रीयमंत्री सदानंदगौडा यांच्या संपर्कात आहोत. केंद्राकडे २० हजार व्हायल्स इंजेक्शन्सची मागणी केली असून केंद्राने ११५० व्हायल्सचा पुरवठा केला आहे अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.बंगळुरात पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले, प्राथमिक …

Read More »

‘यास’ चक्रीवादळ पुढच्या 24 तासात बंगालला धडकणार

रत्नागिरी : ‘तौक्ते’ चक्रीवादाळानंतर आता समुद्रकिनारी भागात ‘यास’ चक्रीवादळ येऊन धडकले आहे. बंगालच्या उपसागरात गुरुवारी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील चोवीस तासांमध्ये त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची संकेत हवामान खात्याने दिले आहेत. 25 मे पर्यंत ‘यास’ चक्रीवादळाची तीव्रता वाढून ते अतितीव्र चक्रीवादळात रुपांतरीत होणार आहे. म्हणजेच येथे …

Read More »

कर्मचार्‍यांच्या मृत्यूनंतरही 60 वर्षे पूर्ण वेतन, घर आणि मुलांचे शिक्षण विनामूल्य, सर्व खर्च टाटा उचलणार!!

नवी दिल्ली – कोरोनाने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. कोरोनामुळे देशात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. यात अनेकांनी आपले आई-वडील, आजी-आजोबा तर कुणी आपले भाऊ-बहीण गमावले आहेत. अनेक मुलं अनाथ झाली आहेत. अशात त्यांना दिलासा देण्यासाठी कॉरपोरेट कंपन्या विविध प्रकारचे प्रयत्न करत आहेत. यातच टाटा स्टीलने अशा लोकांसाठी मोठी घोषणा …

Read More »