कुर्ली हायस्कूलमध्ये विज्ञान वाचन गोष्टी स्पर्धा निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांमधील जिज्ञासू वृत्ती जोपासण्यासाठी व त्यांच्यातील कल्पकतेला वाव देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम आवश्यक आहेत. विज्ञान स्पर्धा व कृतियुक्त शिक्षणामुळे विज्ञानाबद्दल गोडी निर्माण होवून कल्पकतेला चालना मिळते, असे मत गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात …
Read More »महाराष्ट्र एकीकरण समिती येळ्ळूरच्यावतीने दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली!
येळ्ळूर : ‘महाराष्ट्र एकीकरण समिती येळ्ळर’च्यावतीने सीमासत्याग्रही कै. सुभाष यल्लोजी कदम, पैलवान कै. गोविंद वासुदेव कुगजी, हाडाचे वैद्य कै. परशराम ओमाण्णा धामणेकर, निवृत्त शिक्षक कै. चांगदेव भरमाजी उडकेकर, मारुती नागोजी उघाडे, कै. लक्ष्मीबाई गुंडू गोरल, कै. राजाराम सुबराव पाटील, कै. अनंत यल्लापा पाटील, भारतीय सैनिक कै. राहुल आनंदा गोरल …
Read More »“महाराष्ट्र राज्य” फलक येळ्ळूर : आज चौथ्या खटल्याचा निकाल
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील येळ्ळूर गावातील ‘महाराष्ट्र राज्य’ फलक हटवल्याच्या पार्श्वभूमीवर येळ्ळूर गावात अशांतता निर्माण झाली होती, याप्रकरणी मराठी भाषिकांवर दाखल केलेल्या खटल्यांपैकी खटला क्रमांक १२५ चा निकाल आज ११ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. या खटल्यातील सर्व ३२ संशयितांचा जबाब नोंदवण्यात आला असून, त्यांच्या वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद …
Read More »सीमाभागात मुख्यमंत्री सहायता निधीची अंमलबजावणी सोपी करावी
रमाकांत कोंडुसकर यांनी घेतली रामेश्वर नाईक यांची भेट बेळगाव : मुख्यमंत्री सहायता निधीची अंमलबजावणी सीमाभागात अधिक सोपी करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षप्रमुख श्री. रामेश्वर नाईक यांच्याकडे समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या चर्चेत सीमाभागातील रुग्णांना तातडीने आणि सुलभतेने मदत मिळावी यासाठी प्रणाली सुधारण्याबाबत विचारविनिमय …
Read More »सीमाप्रश्नासंदर्भात उच्चाधिकार समितीची लवकरच बैठक; तज्ञ समितीच्या बैठकीत निर्णय
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या दाव्याला जलद गती मिळावी यासाठी प्रयत्न करणार बेळगाव : महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या दाव्याला जलद गती मिळावी. याचिका मुख्य पटलावर घेण्यात यावी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती देऊन तात्काळ उच्चाधिकार समितीची बैठक घेण्याचा निर्णय मुंबईत मंत्रालयात आयोजित तज्ञ समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या …
Read More »गाळेधारकांच्या नोटीसा मागे न घेतल्यास आंदोलन; नगरपालिका गाळेधारकांचा इशारा
नगरपालिकेच्या नोटीसीमुळे गाळेधारकांमध्ये भीतीचे वातावरण निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेतर्फे शहरातील गाळेधारकांना नोटीस बजावण्यात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राप्त आदेशानुसार गाळे रिकामी करून नगरपालिकेच्या ताब्यात देण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यानंतर या गाळ्यांचा फेरलिलाव केला जाणार असल्याचे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.गाळेधारकांनी प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त …
Read More »मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढलेल्या ऑटो चालकाची आत्महत्या
बेळगाव : बुधवारी बेळगावातील किल्ला तलावात एका ऑटो चालकाने उडी मारून जीवन संपवले. मृत व्यक्तीची ओळख बेळगावच्या कंग्राळी येथील किरण मनगुतकर (५४) अशी झाली आहे.किरण मनगुतकर यांनी एक वर्षापूर्वी मुलीचे लग्न केले होते. ते अत्यंत प्रामाणिक होते आणि सर्वांशी त्यांचे संबंध चांगले होते. त्यांच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण हे …
Read More »सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने सवलती द्याव्यात; रमाकांत कोंडुसकर यांची मागणी
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील ८६५ गावांमध्ये राहणाऱ्या मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये खुली करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. उच्च शिक्षणात मिळणाऱ्या सवलतींप्रमाणेच प्राथमिक विद्यार्थ्यांनाही संधी मिळावी, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तज्ञ समितीच्या बैठकीदरम्यान …
Read More »शांताई विद्या आधारची गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कास मदत
बेळगाव : गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यास मदत करणाऱ्या शांताई विद्या आधार या गटाने आपले कर्तव्य पुन्हा एकदा पार पाडताना नवज्योत टेक्नॉलॉजीसच्या मदतीने शास्त्रीनगर येथील ज्ञान मंदिर शाळेतील दोन गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क अदा केले. ज्ञान मंदिर शाळेतील एका छोट्या कार्यक्रमात शांताई विद्या आधारचे सदस्य ॲलन विजय …
Read More »आशादीपतर्फे आई-वडिलांचा आधार नसलेल्या मुलाला शिक्षणासाठी आधार
येळ्ळूर : महावीर नगर उद्यामबाग येथे भाड्याच्या घरामध्ये आजी सोबत राहणाऱ्या व आई-वडील असून देखील गेल्या चार वर्षापासून आजीकडे सोडून गेलेल्या मुलाला आशादिप वेल्फेअर सोसायटीतर्फे 5000 व शैक्षणिक साहित्य बरोबरच अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. वास्तविक पाहता या मुलाचा सांभाळ करण्यासाठी त्याच्या आजी ऑफिसमध्ये फरशी पुसण्याच्या कामापासून घरोघरी जाऊन भांडी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta