Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

कुंभमेळ्याला जाताना वाहनाचा अपघात; गोकाक येथील ६ जणांचा मृत्यू

  बेळगाव : प्रयागराजला जाणाऱ्या 6 प्रवाशांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. सर्व मृत बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरमधील खिटौला पोलीस ठाण्यांतर्गत ही घटना घडली. वाहन क्रमांक KA-49, M-5054 पहाटे 5 वाजता हा अपघात झाल्याची माहिती आहे. एकूण 8 जणांनी प्रवास केल्याचे सांगण्यात आले, …

Read More »

दुबईत ‘विराट’ वादळ! शतकासह भारताचा शानदार विजय; पाकिस्तानची चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर

  दुबई : भारतने आपल्या पारपंरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत सलग दुसरा विजय साजरा केला. या विजयासह भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीचे तिकीट जवळजवळ निश्चित केले आहे. न्यूझीलंडपाठोपाठ भारताकडूनही झालेल्या पराभवाने यजमान पाकिस्तानचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले आहे. यासह टीम इंडियाने पॉइंट टेबलमध्ये मोठी झेप …

Read More »

मुंबईत धरणे आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही : महाराष्ट्र एकीकरण समितीला उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

  बेळगाव : महायुती सरकार बेळगावसह सीमाभागातील मराठी जनतेच्या पाठीशी ठाम उभे आहे आपल्या मागण्यांसाठी समितीला मुंबईत धरणे आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली. रविवारी दिल्ली मुक्कामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनादरम्यान मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली त्यावेळी …

Read More »

वादग्रस्त सीमा भाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा; अखिल भारतीय साहित्य संमेलनात महत्त्वाचा ठराव

  नवी दिल्ली : गेले तीन दिवस सुरू असलेल्या देशाच्या राजधानीतील 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज रविवारी सायंकाळी शानदार समारोप सोहळा पार पडला. या सोहळ्यात तमाम सीमावासियांचे लक्ष लागलेल्या सीमा प्रश्नाच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. प्रा.मिलिंद जोशी सुचक असलेल्या या ठरावाला साहित्यिक महामंडळाचे उपाध्यक्ष गुरैया स्वामी यांनी …

Read More »

शेतातील आग विझवताना सावगाव येथील शेतकऱ्याचा मृत्यू

  सावगाव : बेळगाव तालुक्यातील सावगाव येथील प्रगतशील शेतकरी जयवंत बाळू कल्लेहोळकर यांच्या शेतात आज दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी ते गेले आणि आग विझवताना त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, दोन बहिणी, भावजय, पुतणे …

Read More »

साठे प्रबोधिनीच्या शिवचरित्र सामान्य ज्ञान स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

  बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था व गुरुवर्य वि.गो.साठे मराठी प्रबोधिनी आयोजित शिवचरित्र सामान्य ज्ञान स्पर्धेला पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ही स्पर्धा मराठी विद्यानिकेतन येथे घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धेला उपस्थित असलेले पालक अमित देसाई, स्वाती ओऊळकर, लक्ष्मी पाटील, डॉ.भरत चौगुले, नंदकुमार किरमाटे, कमल सूर्यवंशी, गायत्री …

Read More »

राजहंसगडला पाणीटंचाईचे सावट; सरकारी योजना कुचकामी…

  बेळगाव : राजहंसगडला पाणीटंचाई होऊ नये म्हणून सरकारने अनेक योजना राबवून कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत, या योजना फक्त कागदावरच राहिल्या प्रत्यक्षात मात्र येथील जनतेला पाणीटंचाईला समोर जावं लागत आहे. राजहंगड येथे पाण्याचा कोणताही स्त्रोत नाही सरकारने येथील जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून जलनिर्मल योजना राबवली या योजनेसाठी तब्बल …

Read More »

उंच भरारी घेण्यास प्रतिभेचे पंख आतून फुटावे लागतात : प्राचार्य अरविंद पाटील

  बेळगुंदी हायस्कूल बेळगुंदी येथे शुभेच्छा बेळगाव : विद्यार्थीदशेतच आपण कष्टाचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. संघर्ष सोबतीला असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे कौशल्य आहेत, योग्यवेळी ती ओळखता न आल्यामुळे आपण मागे राहतो. प्रतिभावंत होणं म्हणजेच आपल्या अंगभूत कौशल्याना योग्यवेळी आकार देणं होय. संगीत, चित्रकला, क्रीडा व बौध्दिक …

Read More »

बेळगावात 9 मार्च रोजी रंगणार आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचे मैदान

  बेळगाव : बेळगावच्या ऐतिहासिक आनंदवाडी कुस्ती आखाड्यात अमेरिका भारत आणि इराणचे मल्ल उतरणार असून 9 मार्च रोजी हे मैदान भरणार आहे. बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या वतीने या आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले असून नुकताच जिल्हा कुस्तीकर संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिका इराण आणि भारताच्या दिग्गज मल्लांना …

Read More »

माजी आमदार व्ही. वाय. चव्हाण यांच्या पत्नी अन्नपूर्णा चव्हाण यांचे निधन

  खानापूर : स्टेशन रोड खानापूर येथील रहिवासी व माजी आमदार कै. व्ही वाय चव्हाण यांच्या पत्नी अन्नपूर्णा विठ्ठलराव चव्हाण (वय 87 वर्ष) यांचे आज रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 6.30 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. अंत्यसंस्कार आज सायंकाळी 4.00 वाजता खानापूर येथील हिंदू स्मशानभूमीत होणार …

Read More »