Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

“पुढच्या वर्षी लवकर या…!” तब्बल 38 तास विसर्जन मिरवणूक

  बेळगाव : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”च्या जयघोषात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. ढोलताशांच्या पारंपारिक वाद्यांचा वापर यामुळे सर्वत्र मराठमोळे वातावरण निर्माण झाले होते. फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाच्या उधळणीमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. लाखो भाविकांना उत्साह देणारी यंदाची गणेश मिरवणूक तब्बल 38 तास चालली. गणेश चतुर्थी …

Read More »

रमेश कत्ती यांच्याकडून ६ पीकेपीएस सदस्यांचे अपहरण?

  बेळगाव : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी बँक) निवडणूक प्रचाराला एक नवीन वळण लागले आहे, माजी खासदार रमेश कत्ती यांनी पीकेपीएस संचालकांचे अपहरण केल्यामुळे, यमकनमर्डी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. हुक्केरी तालुक्यातील पाश्चापूर गावातील पीकेपीएसचे सहा संचालक अल्लाप्पा हिरेकोडी, दुद्दाप्पा शिंत्रे, रफिक मदिहळी, विलास अन्वेकर, शिवलीला वस्त्रद …

Read More »

काँग्रेस आमदार आर. व्ही. देशपांडे यांच्या अश्लाघ्य वक्तव्याचा निषेध : डॉ. सोनाली सरनोबत

  बेळगाव : काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी महिला पत्रकार राधा हिरेगौडर यांच्या प्रश्नाला दिलेले अवमानकारक उत्तर निषेधार्ह असून त्यांनी तात्काळ सार्वजनिकरित्या माफी मागावी, अशी मागणी भाजपा महिला मोर्चा राज्य चिटणीस डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली आहे. प्रसिद्धी पत्रकात त्यांनी नमूद केले आहे की, “उत्तर कन्नड जिल्ह्यात सुबक …

Read More »

आमचे सरकार अलमट्टीची उंची वाढवण्यास वचनबद्ध

  डी. के. शिवकुमार; अलमट्टी धरणात केले गंगा पूजन बंगळूर : आमच्या सरकारला अलमट्टी धरणाची उंची ५१८ मीटरवरून ५२४ मीटरपर्यंत वाढवण्याची प्राथमिकता आणि वचनबद्धता आहे. भूसंपादनासाठी निश्चित केलेली किंमत पुढील आठवड्यात जाहीर केली जाईल,” असे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार म्हणाले. शनिवारी अलमट्टी धरणात कृष्णा नदीत गंगा पूजन केल्यानंतर पत्रकार परिषदेत ते …

Read More »

खानापूर तालुका आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त : श्री. पी. बी. अंबाजी!

  खानापूर : शिक्षक हा समाजाचा कणा असतो. अशा शिक्षकाच्या शैक्षणिक आयुष्यात अनेक चढ उतार येतात पण त्या चढ उतारातून देखील यशाची गुरुकिल्ली साधण्याची धडपड अनेक शिक्षकांच्यात असते. शिक्षकांना आपला विद्यार्थी एक उत्तम व चांगला घडावा हीच आकांक्षा असते. आपण जीवनात शिक्षक म्हणून काम करताना काय सार्थक केले याचा मागोवा …

Read More »

आशिया हॉकी कप 2025 : भारताने चौथ्यांदा कोरले आशिया कपवर नाव!

  नवी दिल्ली : आशिया कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा 4-1 धुव्वा उडवला आणि स्पर्धेच्या जेतेपदावर चौथ्यांदा नाव कोरले. भारतीय संघ या स्पर्धेत अजेय राहिला. भारताने या स्पर्धेत एकही सामना गमवला नाही. सुपर 4 फेरीतील एकमेव सामना दक्षिण कोरियासोबत झाला होता. हा सामना 2-2 असा बरोबरीत सुटला होता. …

Read More »

चापगाव ता. खानापूर येथील युवकाचा पुणे येथे अपघाती मृत्यू

  खानापूर : गेल्या काही वर्षापासून पुणे या ठिकाणी कामानिमित्त स्थायीक असलेल्या चापगाव ता. खानापूर येथील बळीराम यल्लाप्पा कदम यांचा शनिवारी रात्री कात्रज बोगद्याजवळ दुचाकीला अपघात झाला होता. त्याला उपचारासाठी तातडीने पुणे सिल्वर बर्थ हॉस्पिटल नऱ्हे या ठिकाणी दाखल करण्यात आले होते. मात्र त्याच्यावर उपचार झाला नसल्याने रविवारी सायंकाळी 6 …

Read More »

जिल्हा बँक निवडणुक पाठिंब्याचे लक्ष्मण चिंंगळे यांना सर्वाधिकार

  मेंढी व लोकर उत्पादक संघ पदाधिकाऱ्यांचा निर्णय निपाणी (वार्ता) : सध्या होऊ घातलेल्या बेळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निपाणी तालुका लोकर उत्पादक सहकारी संघ व मेंढी संगोपन सहकारी संघाच्या पदाधिकाऱ्यांची येथील शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. त्यामध्ये सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंब्याचे सर्वाधिकार बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय एकमुखाने …

Read More »

लक्ष्मीकांत देशमुख यांना सार्वजनिक वाचनालयाचा पुरस्कार प्रदान

  बेळगाव : “आचार्य अत्रे हे आभाळाएवढे मोठे साहित्यिक होते. ते साहित्य सम्राट होते. अत्रे म्हणजे चिरंतन मूल्ये जपणारा साहित्यिक काव्याचा जनक” असे विचार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांनी बोलताना व्यक्त केले. येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने रविवारी आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार …

Read More »

‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात निपाणीत सार्वजनिक गणेशांचे विसर्जन

  निपाणी (वार्ता) : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही क्षमा असावी, अशी प्रार्थना करत सार्वजनिक गणेश मंडळासह गणेशभक्तांनी शनिवारी (ता. ६) गणरायांना पारंपारिक वाद्यांच्या गजरात “पुढच्या वर्षी लवकर या”च्या घोषणात निरोप दिला. दहा दिवसांच्या कालावधीत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. विसर्जनाच्या दिवशी जल्लोष शिगेला पोहचला असला …

Read More »