Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

उत्तराखंडच्या उत्तरकाशीत ढगफुटी; 50 पेक्षा जास्त लोक बेपत्ता!

  उत्तरकाशी : उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी येथे मंगळवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. येथे भारतीय लष्कराच्या तळापासून साधारण 4 किमी दूर असणाऱ्या धराली गावात ढगफुटी झाली आहे. या ढगफुटीमुळे धराली गावात मोठा विध्वंस झाला आहे. घडफुटी झाल्यानंतर त्या भागात मोठा पूर आला असून तब्बल 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत …

Read More »

कन्नडसक्ती विरोधी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा

  खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने जांबोटीत जनजागृती, पत्रकांचेही वाटप जांबोटी : कर्नाटक सरकारने बेळगाव सह संपूर्ण सीमा भागात सक्तीने कन्नड सक्ती लागू करण्याचे धोरण अवलंबले आहे यामुळे मराठी भाषिकांचे घटनात्मक अधिकार हिरावून घेतले जात आहेत. भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार मराठी भाषिकांना कानडी बरोबर मराठीमधूनही सरकारी परिपत्रके उपलब्ध करून द्यावीत …

Read More »

माधुरी हत्ती लवकरच नांदणी मठात येईल याचा विश्वास : ललित गांधी

  मुंबई : कोल्हापूरच नव्हे तर पंचक्रोशीतील तमाम जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेल्या महादेवी हत्तीचे लवकरच नांदणी मठात पुनरागमन होईल असा विश्वास जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केला. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नांदणी येथील बाराशे वर्षाची परंपरा असलेल्या जैन …

Read More »

येळ्ळूरमध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश दंडगी यांचा सत्कार

  येळ्ळूर : येळ्ळूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सलग 18 वर्षे वैद्याधिकारी म्हणून सेवा बजावल्याबद्दल तसेच त्यांची तालुका आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल येळ्ळूर ग्रामस्थ, गावातील डॉक्टर संघटना, नेताजी को-ऑपरेटिव्ह सोसायटी, तसेच येळ्ळूर मराठी साहित्य संघाच्या वतीने त्यांचा नेताजी सोसायटीच्या सभागृहात सत्कार करण्यात आला. डॉक्टर संघटना येळ्ळूर आणि गावातील सामाजिक कार्यकर्याच्या …

Read More »

अल्पवयीन मुलांकडे वाहन आढळल्यास पालकांवर होणार कारवाई : पोलीस आयुक्त भुषण बोरसे

  बेळगाव : बेळगाव शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत चालली आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य देत शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांच्या प्राचार्य व प्रशासकांची एक बैठक सोमवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी झालेल्या घेण्यात आली. या बैठकीदरम्यान बोलताना पोलीस आयुक्त भूषण बोरसे म्हणाले की, अल्पवयीन विद्यार्थ्याकडून दुचाकी व चार …

Read More »

महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डिसेंबर-जानेवारीमध्ये होणार

  मुंबई : महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका दिवाळीनंतर म्हणजेच डिसेंबर-जानेवारीमध्ये होणार आहेत अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. राज्य निवडणूक आयोग मार्फत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विभागीय बैठक घेण्यात आली. यात नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. …

Read More »

जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

  नवी दिल्ली : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन झाल आहे. दिल्लीतील आरएम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली, ते 79 वर्षांचे होते. गोवा, मेघालय, ओडिशा आणि जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून त्यांनी आपली कार्यभार सांभाळला. …

Read More »

नंदगड येथे सात वर्षीय बालकाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू

  खानापूर : सर्पदंशाने सात वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कुंभार गल्ली नंदगड येथे घडली आहे. वेदांत असे या दुर्दैवी बालकांचे नाव आहे. वेदांत हा घरात झोपला असता अंथरुणातच त्याला सर्पदंश झाला. ही बाब कुटुंबीयांना समजताच वेदांतच्या कुटुंबीयांनी त्याला तात्काळ उपचारासाठी बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचाराचा …

Read More »

मराठीच्या रक्षणासाठी सर्वांनी कार्यरत राहिले पाहिजे : खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई

  खानापूर : सरकारी मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी सर्वच भागात विशेष मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. यामध्ये पालक व शाळा सुधारणा कमिटीने सहभागी होऊन मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी जबाबदारी घ्यावी, असे प्रतिपादन खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे गर्लगुंजी, बरगाव, …

Read More »

मानसिक त्रासाला कंटाळून महिलेची हालात्रीत आत्महत्या!

  खानापूर : मानसिक त्रासाला कंटाळून महिलेने हालात्री नाल्यात उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी (ता. ५) सकाळी उघडकीस आली. लक्ष्मी नारायण पाटील (वय ६५, रा. हारूरी) असे या महिलेचे नाव आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, लक्ष्मी यांची  गेल्या अनेक वर्षांपासून मानसिक स्थिती ठिक नव्हती. त्यांच्यावर उपचारदेखील सुरू होते. आज …

Read More »