Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

डी एम एस पदवीपूर्व महाविद्यालय नंदगड येथे पीयुसी प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न

  खानापूर : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित डी एम एस पदवीपूर्व कॉलेज नंदगडमध्ये पीयुसी प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात बारावी विद्यार्थिनींच्या ईशस्तवन आणि स्वागत गीताने झाली. यानंतर मान्प्रवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन आणि महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले फोटो पूजन करण्यात आले. कर्यक्रमाचे …

Read More »

11 ऑगस्टच्या कन्नडसक्ती मोर्चाला मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : खानापूर तालुका समितीच्या बैठकीत आवाहन

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारणीची महत्त्वपूर्ण बैठक रविवार दि. 3 ऑगस्ट रोजी शिवस्मारक येथे संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव बळवंतराव देसाई हे होते. बैठकीचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले. यावेळी कर्नाटक सरकार कन्नडसक्तीची तीव्र अंमलबजावणी करीत …

Read More »

किरकोळ वादातून खानापूरात चाकू हल्ला; युवकाचा खून

  खानापूर : खानापूर येथील गांधीनगर भागात किरकोळ वादातून चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चाकू हल्ल्यात रमेश (भीमा) बंडीवडर (३०) वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. खानापूर शहरालगत असलेल्या गांधीनगर येथील शनी मंदिर व मारुती मंदिर परिसरात रमेश बंडीवडर आणि यल्लाप्पा बंडीवडर (वय ६२) यांच्यात सुरू …

Read More »

युवा समिती सीमाभागच्या वतीने उद्या खानापूर आमदार विठ्ठल हलगेकर यांची घेणार भेट

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या वतीने कन्नडसक्ती संदर्भात विविध लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने उद्या सोमवार दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११-०० वाजता खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांना निवेदन देण्याचे ठरले आहे, तरी बेळगाव येथून खानापूरला रवाना होण्यासाठी मराठी भाषिकांनी उद्या सकाळी साडेदहा पर्यंत …

Read More »

येळ्ळूर शिवारात हायटेक अंधश्रद्धा! उतार्‍यामध्ये लिंबू-नारळासह चक्क मोबाईल…

  बेळगाव : अलीकडे सर्वत्र अंधश्रद्धा फोफावत चालली आहे. पूर्वीपासूनच रस्त्यावर ठराविक दिवशी उतारे पडलेले पाहाव्यास मिळतात. त्यात नारळ, लिंबू, पाणी, सुपारी, केळी, विविध फळ, हळदीकुंकू, गुलाल, दहिभात, बाहुली, कापड, सुई, खिळे, काळा दोरा, कोंबडा, कोंबडीची लहान पिल्ले त्याचबरोबर कोहळा तर कधी कधी बकऱ्यांचा सुद्धा बळी दिला जातो. हल्ली तर …

Read More »

शाळेच्या आवारातील पाण्याच्या टाकीत कीटकनाशक मिसळल्या प्रकरणी ‘तिघांना’ अटक!

  सौंदत्ती : देशभरात जातीयवादावरून राजकारण चालू असलेले आपल्याला पाहायला मिळते. परंतु सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावात जातीवादाचा कहर झाल्याचे पहावयास मिळाले. सौंदत्ती तालुक्याच्या हुलीकट्टी गावातील एका प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मुस्लिम असल्याने केवळ जाती द्वेष मनात ठेवून त्यांना नोकरी सोडण्यास भाग पाडण्याच्या उद्देशाने शाळेच्या आवारातील पाण्याच्या टाकीत गावातील समाजकंटकांनी कीटकनाशक टाकल्याची …

Read More »

भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू

  लखनौ : उत्तर प्रदेशातील गोंडा येथे रविवारी (3 ऑगस्ट 2025) एक भीषण रस्ता अपघात झाला. इटियाथोक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलवा बहुता मजरा रेहरा येथे बोलेरो गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी कालव्यात कोसळली. या अपघातात गाडीतील 11 भाविकांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये 9 जण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची …

Read More »

ग्रामीण शेतकरी व महिलांच्यावतीने उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

  बेळगाव : शेतकऱ्यांसाठी लिंकविरहित तात्काळ युरिया पुरवठा व्हावा तसेच शेतामध्ये कामासाठी जाणाऱ्या महिलांना सार्वजनिक वाहतूक उपलब्ध व्हावी यासाठी वडगाव, येळ्ळूर, यरमाळ, धामणे याभागातील ग्रामीण शेतकरी व महिला जिल्हा प्रशासनाकडे न्याय मागण्यासाठी उद्या सोमवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना …

Read More »

अमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र; 4 आरोपींना अटक

  बेळगाव : बेळगाव शहरात अमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र करत बेळगाव पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान हेरॉईन व गांजाची तस्करी करणाऱ्या एकूण चार आरोपींना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून 1 लाख 72 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील अमली …

Read More »

न्यू गांधीनगर, अमन नगर येथील उड्डाणपुलाला भीम आर्मी भारत एकता मिशन”चा कडाडून विरोध!

  बेळगाव : येथील न्यू गांधीनगर आणि अमन नगर भागातील प्रस्तावित रेल्वे उड्डाणपुलाला “भीम आर्मी भारत एकता मिशन”च्या नेतृत्वाखाली येथील नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे. उड्डाणपूल झाल्यास न्यू गांधीनगर तसेच अमन नगर परिसरातील शेकडो कुटुंबीयांना आपली घरे गमवावी लागतील अशी भीती व्यक्त करत तात्काळ सदर उड्डाणपूल प्रकल्प रद्द करण्याची मागणी …

Read More »