Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

तिवोलीवाडा क्रॉस ते रेल्वे ब्रीज रस्त्याचा प्रश्न आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्तक्षेपामुळे मार्गी; काम पुन्हा सुरू

  खानापूर : खानापूर तालुक्यातील तिवोलीवाडा (ख्रिश्चन वाडा) ते रेल्वे ब्रीज या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामास काही दिवसांपासून अडथळा निर्माण झाला होता. रस्ता रुंदीकरण व कामादरम्यान दोन शेतकऱ्यांची शेतजमीन बाधित होत असल्याच्या तक्रारीमुळे रस्त्याचे काम तात्पुरते बंद ठेवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आमदार श्री. विठ्ठलराव हलगेकर यांनी आज स्वतः प्रत्यक्ष घटनास्थळी …

Read More »

खानापूर, बेळगाव सीमावर्ती भागात हत्तींच्या कळपाचा संचार; सतर्कतेचा इशारा

  बेळगाव : खानापूर व बेळगाव तालुक्याच्या सीमावर्ती भागातील काही गावांमध्ये 8 ते 9 हत्तींचा कळप संचार करत असल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आले आहे. नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेच्या दृष्टीने उप वनसंरक्षण अधिकारी, बेळगाव विभाग यांच्या वतीने संबंधित गावांना तातडीचा इशारा देण्यात आला आहे. संबंधित गावे  बाकनुर, बेळवट्टी, बैलूर, कुसमळी, …

Read More »

निपाणी -लखनापूर ओढ्यावर २.७५ कोटी निधीतून पूल बांधकामाच प्रारंभ

  निपाणी (वार्ता) : अनेक वर्षे मागणी असलेल्या निपाणी-लखनापूर रोडवरील केसरकर- वालीकर मळ्याजवळील ओढ्यावर पूल बांधण्याची सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मंत्री सतीश जारहोळी यांनी २.७५ कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला होता. या कामाचा प्रारंभ खासदार प्रियंका जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आला. माजी नगरसेविका अनिता पठाडे चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, …

Read More »

युवक, युवतींनी सैनिक प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा : खासदार प्रियांका जारकीहोळी

  तवंदीत सैनिक भवनाचा पाया खुदाई निपाणी (वार्ता) : आपण खासदार झाल्यानंतर आलेल्या पहिल्या निधीतून सर्वप्रथम सैनिकांच्या भवनासाठी २० लाखाचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी १० लाख रुपये दिले असून लवकरच उर्वरित निधी देणार आहोत. जारकीहोळी फाउंडेशनतर्फे ८ केंद्रामधून तीन भाषांमधून सैनिक भरतीसाठी पूर्णपणे मोफत प्रशिक्षण दिले जाते.त्याचा ग्रामीण भागातील …

Read More »

युवा उद्योजक आणि माजी विद्यार्थ्यांमुळेच गावातील शाळांचा विकास : रणजीत पाटील

  खानापूर : मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन देखील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या युवा उद्योजक आणि माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील शाळेच्या विकासासाठी पुढे येणे आवश्यक असून माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शाळांचा कायापालट झाल्यास गावातील सरकारी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, असे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य रणजीत पाटील यांनी केले आहे. हलगा …

Read More »

शौर्य दिनानिमित्त जत्राटवेसमध्ये भीमा कोरेगाव मधील शहिदांना अभिवादन

  निपाणी (वार्ता) : येथील जत्राटवेसमध्ये महात्मा ज्योतिबा फुले, शाहू, आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक संघटनेतर्फे शौर्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सहकाररत्न उत्तम पाटील यांनी सहभाग घेऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उत्तम पाटील यांनी, शौर्य दिन हा भीमा कोरेगाव विजयस्तंभाशी संबंधित …

Read More »

निपाणीतील शर्यतीत ‘एमटी. बैज्या, आरएक्स बैज्या ‘कृषिधन केसरी’चा मानकरी

  हरण्या- सुंदर यांने पटकवली स्प्लेंडर दुचाकी; शर्यती शौकिनांच्या फिटले डोळ्याचे पारणे निपाणी (वार्ता) : येथील दौलतराव पाटील मळ्याल कृषीधन दूध उत्पादक संस्थेच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी (१ जानेवारी) आयोजित विनालाठी-काठी आंतरराज्य जनरल बैलगाडी शर्यतीत कांचनपूर येथील महेश मेजर यांच्या ‘एमटी. बैजा, आरएक्स बैज्या बैल जोडी शर्यतीचे अंतर १७ …

Read More »

युवा पिढीने शिवरायांची कार्यपद्धती समजून घ्यावी

  सचिन खोपडे; मावळा ग्रुपची गड-किल्ले मोहीम यशस्वी निपाणी (वार्ता) : सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अष्टप्रधान मंडळ तयार करून सुराज्य निर्माण करण्यासह प्रजेवर होणारा अन्याय दूर केला. रयतेचा राजा होताना त्यांनी दिलेला कानमंत्र आजही जोपासला जात आहे. जातीय सलोखा राखत भाषिक मतभेद …

Read More »

मिरज -आदमापूर पायी दिंडीचे आडी येथे स्वागत

  निपाणी (वार्ता) : मिरज येथील सद्गुरू संत बाळूमामा भक्त भजनी मंडळातर्फे मिरज, आप्पाचीवाडी, मेतके मार्गे आदमापूर अशी पायी दिंडी काढण्यात आली. आप्पाचीवाडी येथे जात असताना आडी येथील डोंगराजवळील मल्लिकार्जुन मठामध्ये कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे कार्याध्यक्ष राजू पोवार व पदाधिकाऱ्यांनी या दिंडीचे स्वागत केले. ही दिंडी मिरज येथून सोमवारी (ता.२९) …

Read More »

मनरेगातून महात्मा गांधींचे नाव काढू नका

  मुख्यमंत्री सिद्धरामय्या : व्हीबी-जी राम जी कायद्याची अंमलबजावणी न करण्याची मागणी बंगळूर : मनरेगा योजनेतून महात्मा गांधींचे नाव काढून टाकणाऱ्या विकसित भारत – रोजगार हमी व उपजीविका मिशन (ग्रामीण) (व्हीबी-जी राम जी) या नव्या कायद्याची अंमलबजावणी करू नये, अशी ठाम मागणी करत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र …

Read More »