मुंबई : माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कामकाजावर टीका करत त्यांनी नेतेपदाचा राजीनामा दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेतेपदी माझी नियुक्ती केली होती. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर या पदाला काहीच अर्थ राहिला नाही, असं रामदास कदम म्हणाले. “माझ्यावर अनेकदा …
Read More »कावळेसादच्या उलट्या दिशेने वाहणाऱ्या धबधब्याची पर्यटकांना भुरळ, अंबोलीत पर्यटकांची गर्दी
सिंधुदुर्ग : महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोली जवळील गेळे गावात कावळेसाद पॉईंट या ठिकाणचा उलट्या दिशेने वाहणारा धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे. कावळेसाद हे एक पठार असून पठारावरून वाहत आलेले पाणी जेव्हा कावळेसादच्या दरीमध्ये कोसळतं, तेव्हा ते पाणी दरीतून येणाऱ्या जोराच्या वाऱ्यासोबत पुन्हा वर येतं. हे अनोखं चित्र …
Read More »महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टातली सुनावणी 20 जुलैला
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले. उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला… एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. या सर्व घडामोडीनंतर शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला. एकनाथ शिंदेंच्या बंडाविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. 11 जुलै रोजी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर …
Read More »खासदार संजय मंडलिकांच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे गटात जाण्यासाठी लावला जोर!
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्यासाठी आता खासदारांकडून चाचपणी केली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन शिवसेना खासदार शिंदे कळपात सामील होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, याबाबत दोघांकडूनही जाहीर वाच्यता करण्यात आलेली नाही. कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक सध्या दिल्ली दौर्यावर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हमीदवाडामधील सदाशिवराव मंडलिक कारखाना …
Read More »आजरा तालुक्यात टस्करचा धुमाकूळ सुरूच
आजरा : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात टस्करचा धुमाकूळ सुरूच आहे. शुक्रवारी हत्तीने गवसे गावात उभ्या असलेल्या शेड, एक टेम्पो आणि दोन दुचाकींचे नुकसान केले. मुसळधार पावसामुळे आजरा-आंबोली मार्गावरील वाहतूकही सुमारे दोन तास खोळंबली. टस्कर बाजूला होईपर्यंत गोवा, आंबोली येथून येणारी वाहने अडकून पडली होती. दोन दिवसांपूर्वी टस्कराने शेतकरी महादेव …
Read More »गडकोटांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालयाची किंवा महामंडळाची निर्मिती करा; संभाजीराजेंची मागणी
कोल्हापूर : माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्टद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गडकोटांच्या संवर्धनासाठी स्वंतत्र मंत्रालयाची किंवा महामंडळाची निर्मिती करा, अशी मागणी केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असणारे श्री शिवछत्रपती महाराजांचे गडकोट आज अत्यंत दुरावस्थेत आहेत. दिवसेंदिवस त्यांची अधिकच दुरावस्था होत आहे. …
Read More »अडकूर येथे घर कोसळून ५ लाखांचे नुकसान, सुदैवाने निराधार वृद्धा वाचली
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : अडकूर (ता. चंदगड) येथील श्रीमती सखुबाई मारूती बामणे (वय ६५) या वृद्धेचे घर कोसळून ५ लाखांचे नुकसान झाले तर सुदैवाने हि निराधार वृद्धा या दुर्घटनेत सुदैवाने वाचली. अधिक माहिती अशी की, श्रीमती सखुबाई बामणे यांचे अडकूर बाजारपेठेत राहते घर आहे. पूर्णपणे निराधार असलेल्या सखुबाई या …
Read More »कोरगावकर ट्रस्टच्या वतीने मोफत दहा हजार झाडांची रोप लागवड
संवर्धनासाठी देण्याचा उपक्रम कोल्हापुरातील विविध संस्था संघटनांचा सहभाग कोल्हापूर : मे. अनंतराव गोविंदराव कोरगावकर ट्रस्ट आणि कोरगावकर पेट्रोल पंप यांच्यावतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी मोफत दहा हजार झाडांची रोप लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी रोपे देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याचा रोप वाटप कार्यक्रम आज कोरगावकर पेट्रोल पंप येथे …
Read More »कोल्हापूरच्या दोन शिवसेना खासदारांवरून राजेश क्षीरसागरांचा मोठा दावा, विनायक राऊतांवरही केला गंभीर आरोप
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय प्रत्यारोपांची मालिका सुरुच आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी काल झालेल्या शिवसेना मेळाव्यात शिंदे गटातील बंडखोर माजी आमदार आणि राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर बोचरी टीका केली होती. नाना पटोलेंना घरी जेवायला बोलवून नंतर त्याचे पैसे बंटी पाटलांकडून घेतल्याचे मला समजल्याचे विनायक …
Read More »शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, पहिल्या टप्प्यात 12 मंत्र्यांना दिली जाणार शपथ
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्राला नवीन मंत्रिमंडळ कधी मिळणार? याची प्रतिक्षा होती. अखेर यावर शिक्कामोर्तब झाला. येत्या 20 जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे निश्चित झाले. प्रामुख्याने पहिल्या टप्प्यामध्ये 10 ते 12 मंत्र्यांना शपथ दिली जाऊ शकते. यामध्ये एकनाथ शिंदे गट आणि भाजप अशा दोन्ही गटातील मंत्र्यांचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta