खानापूर : पंच गॅरेंटी हमी योजनेची मासिक बैठक आज रोजी दिनांक 27-1-2026 तालुका पंचायत खानापूर येथे संपन्न झाली. या बैठकीचे अध्यक्ष खानापूर तालुका गॅरेंटी योजना अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी होते. गॅरंटी योजनेच्या बैठकीमध्ये पाच गॅरंटी विषयी त्या त्या खात्याच्या अधिकाऱ्यांची माहिती घेतली गृहज्योती योजनेचे अधिकारी प्रवीण बरगाले यांनी गृहज्योती विषयी …
Read More »हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करावेत
ॲड.निलेश हत्ती; श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे बैठक निपाणी (वार्ता) : देशातील हिंदू बांधव आणि धर्मावर वारंवार अन्याय अत्याचार सुरू आहे. त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्तानतर्फे विविध उपायोजना केल्या जात आहेत. यापुढे काळातील हिंदू बांधव व धर्मावर अन्याय अत्याचार थांबविण्यासाठी हिंदू बांधवांनी एकत्रित यावे, असे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्थानचे चिक्कोडी …
Read More »जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे बोरगाव कृषी पत्तीन संघावर नामनिर्देशक संचालकांची निवड
निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे कृषी पत्तीन संघावर नामनिर्देश संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोले यांच्या प्रयत्नाने बोरगांव येथील विवीधोद्देशिय कृषी पत्तीन संघावर नामनिर्देश संचालकांची निवड झाल्याची माहिती हालशुगर संचालक, नगरसेवक शरद जंगटे दिली. यामध्ये विविधोद्देशिय ग्रामीण …
Read More »तटरक्षक दलाचे डीआयजी तवंदीचे सुपुत्र सुधाकर पाटील यांना ‘राष्ट्रपती पदक’ प्रदान
निपाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा; राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यातील तवंदी गावचे सुपुत्र आणि भारतीय तटरक्षक दलाचे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल (डीआयजी) सुधाकर पाटील यांना त्यांच्या ३१ वर्षांच्या प्रदीर्घ, समर्पित आणि देदीप्यमान सेवेबद्दल महामहिम राष्ट्रपतींच्यातर्फे २६ जानेवारी २०२६ रोजी ७७ व्या प्रजासत्ताक दिनी गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘राष्ट्रपती’ पदक …
Read More »तिरंग्याखाली उमलले देशप्रेम… शिस्त, समर्पण आणि संकल्प
खानापूर : म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय व ताराराणी हायस्कूल येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. २६ जानेवारी हा दिवस भारताने स्वतःचे संविधान स्वीकारून सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून वाटचाल सुरू केल्याची साक्ष देणारा असल्याने या दिवसाचे महत्त्व अधिकच अधोरेखित झाले. राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण संस्थेचे ज्येष्ठ …
Read More »श्री रवळनाथ हायस्कूल शिवठाण येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
खानापूर : श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्था संचलित श्री रवळनाथ हायस्कूल, शिवठाण येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. प्राथमिक व हायस्कूलच्या वतीने गावामध्ये प्रभातफेरी काढण्यात आली. प्रथमता प्राथमिक शाळेतील ध्वजारोहण श्री. विकास मिराशी, तर हायस्कूलचे ध्वजारोहण माजी सैनिक व माजी विद्यार्थी श्री. सुरेश पवार यांच्या हस्ते …
Read More »छत्रपती धर्मवीर संभाजीराजेंच्या पुतळा सुशोविकरणासाठी खासदार प्रियांका जारकीहोळी यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी म्हणून संभाजीराजांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. त्यांनी स्वराज्यासाठी शत्रूंविरुद्ध केलेल्या सर्व १२० लढाया करून जिंकल्या आहेत. भारतीय समुदायाला एकत्र आणणाऱ्या आणि विशेषतः तरुणांना राष्ट्रीय एकता आणि एकतेसाठी प्रेरित करणाऱ्या त्यांच्या महान मूल्यांचा प्रसार करण्यासाठी त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीचे स्मरण त्यांच्या नावावरुन केले …
Read More »शिस्त, शांततेत महालक्ष्मीची त्रैवार्षिक यात्रा पार पाडा
खासदार प्रियांका जारकीहोळी; निपाणी तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांची बैठक निपाणी (वार्ता) : निपाणी येथील ग्रामदैवत महालक्ष्मी देवीच्या नूतन मंदिराचा वास्तुशांती, प्राणप्रतिष्ठापना कळसारोहण आणि रविवारची यात्रा मंगळवारपासून (ता.३ फेब्रुवारी) सुरू होणार आहे. या काळात वीज, पाणी आरोग्य अशा मूलभूत सुविधा राबवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी सज्ज रहावे. भाविकांनीही शिस्त आणि शांततेत हा सोहळा …
Read More »मराठा मंडळ ताराराणी हायकूल खानापूरमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती व शारीरिक शिक्षण दिन साजरा
खानापूर : मराठा मंडळ संचलित ताराराणी हायस्कूल खानापूरमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती व शारीरिक शिक्षण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री राहुल एन. जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सागर देशपांडे ॲडिशनल कमिशनर- केंद्रीय दक्षता आयोग-कर्नाटक व गोवा विभागप्रमुख तसेच श्री शिवाजीराव पाटील, संचालक, मराठा …
Read More »जिल्हा, तालुकास्तरावरील गुणवंतांना लॅपटॉप व ५० हजाराचे प्रोत्साहन
बंगळूर : दहावी (एसएसएलसी) परीक्षा जवळ येत असताना, राज्य सरकारने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठी आणि महत्त्वाकांक्षी घोषणा केली आहे. सरकारी शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन एसएसएलसी निकालात सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने, जिल्हा आणि तालुका पातळीवरील सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta