Tuesday , April 1 2025
Breaking News

कर्नाटक

पिसाळलेला कुत्रा चावल्याने दोन मुली जखमी

  खानापूर : तालुक्यातील बीडी गावात घरासमोर खेळत असलेल्या दोन मुलींवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. गावातील आराध्या काळे नावाच्या 10 वर्षीय मुलीवर प्रथम हल्ला केलेल्या कुत्र्याने तिला खाली पाडले आणि तिच्या कानाला चावा घेतला. त्यानंतर आणखी एक मुलगी निदा समशेर (10) हिच्यावरही हल्ला करून जखमी करून …

Read More »

भाजपचे 18 आमदार निलंबित..

    बेंगळुरू : कर्नाटक विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर यांनी विधानसभेतील भाजपच्या 18 आमदारांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे. सभापतींच्या खंडपीठाचा अनादर केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या 18 आमदारांना तत्काळ 6 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यांना तातडीने विधानसभा सोडण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या आहेत. लोकशाही व्यवस्थेत सभापतींच्या खंडपीठाचा आदर केला …

Read More »

ग्राहकाना वीज दरवाढीचा शॉक; प्रति युनिट ३६ पैसे दरवाढ

  पुढील दोन वर्षात अनुक्रमे ३५ व ३४ पैसे दरवाढीस मंजूरी बंगळूर : बस भाडे आणि मेट्रो भाडे यासह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्यानंतर कर्नाटक वीज आयोगाने (केईआरसी) ग्राहकांना विजेचा शॉक दिला आहे. वीजदरात प्रति युनिट ३६ पैसे वाढ करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. सुधारित दर एक एप्रिलपासून लागू …

Read More »

कर्नाटक बंद पुकारण्याची गरज नव्हती : डी. के. शिवकुमार

  बेंगळुरू : कर्नाटक राज्यातील विविध कन्नड संघटनांनी 22 मार्च रोजी कर्नाटक बंदची हाक देण्याची गरज नव्हती. त्यांच्या मागण्यांबाबत ते सरकारशी चर्चा करू शकले असते. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी विधान परिषदेत सांगितले की, बंदच्या हाकेच्या पार्श्वभूमीवर काय पावले उचलली जातील याबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली जाईल. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते …

Read More »

हलगा ग्राम पंचायत अध्यक्षपदी सुनील पाटील; रणजीत पाटील गटाचा एकतर्फी विजय

  खानापूर : हलगा पंचायतीच्या अध्यक्षपदी सुनील मारुती पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोण अध्यक्ष होणार याबाबत सुरू असलेल्या चर्चेला विराम मिळाला आहे. अध्यक्षपदाची निवड जाहीर होताच फटाक्याची आतिषबाजी करून गुलाल उधळून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. तत्कालीन ग्राम पंचायत अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्यावर अविश्वास …

Read More »

कुमारस्वामींच्या फार्महाऊसचे अतिक्रमण हटवण्याची तयारी

  उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई बंगळूर : केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यावर यापूर्वी रामनगरातील बिडदी येथील जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप होता. अतिक्रमण हटवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महसूल विभाग आता अतिक्रमण हटाव कारवाई सुरू करत आहे. महसूल विभाग अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू करत आहे. राज्य सरकारने एखाद्या …

Read More »

मुस्लिमांना सरकारी कंत्राटामध्ये आरक्षणाचे विधेयक विधानसभेत सादर

  बंगळूर : सरकारी कंत्राटी कामांमध्ये मुस्लिमांना चार टक्के आरक्षण आणि मागासवर्गीयांना वस्तू आणि सेवांमध्ये आरक्षण देणारे विधेयक आज विधानसभेत मांडण्यात आले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार, सार्वजनिक वस्तू आणि सरकारी कंत्राटांमध्ये मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांना आरक्षण देण्यासाठी कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी आज विधानसभेत विधेयक …

Read More »

ओलमणी येथील राजर्षी शाहू हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा व पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न

  खानापूर : राजर्षी शाहू हायस्कूल, ओलमणी येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा व पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात उपलब्ध ध्येय निश्चित करून दुसरे यांच्याबरोबर न जाता आपलं स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःची निर्णय घेण्यासाठी सक्षमता बाळगावी असे मत प्रमुख वक्त्या म्हणून सौ. अनिता दत्ता कणबर्गी यांनी यावेळी …

Read More »

खानापूर : हलशीवाडी येथे खांब बदलण्याचे काम सुरू; ग्रामस्थांमधून समाधान

  खानापूर : हलशीवाडी येथील लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्या व धोकादायक खांबे हटवावेत अशी मागणी निवेदनाद्वारे हेस्कॉमकडे करण्यात आली होती याची दखल घेत सोमवारपासून खांब बदलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. हलशीवाडी येथे अनेक वर्षांपूर्वी वीज खांबे उभारून वीज वाहिन्या घालण्यात आल्या आहेत. मात्र …

Read More »

गोरक्षण सेवा समिती निपाणीची मोठी कारवाई; कत्तलीपासून दहा नंदी (गोवंश) यांना जीवदान

  निपाणी : श्री विरुपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी स्थापन केलेल्या गोरक्षण सेवा समिती यांच्या वतीने महाराष्ट्र मधून कर्नाटक मध्ये कत्तलीसाठी जाणाऱ्या दहा गोवंश यांना जीवदान देण्यात आले. पेठ वडगाव येथून कत्तलीसाठी दहा बैल घेवून जाणार आहेत, अशी माहिती गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांना मानद पशुकल्यान …

Read More »