Thursday , December 11 2025
Breaking News

कर्नाटक

देवचंद महाविद्यालयाने सीमाभागातील मराठी भाषिकांचे हित जपले

शिक्षणमंत्री उदय सामंत : देवचंद महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे उद्घाटन निपाणी : कर्नाटकातील मराठी भाषिक जनतेवर अन्याय होत आला आहे. त्याबाबत शासन नेहमीच सीमावासियांच्या पाठीशी आहे. सीमाभागाबाबत असलेला विवादित शब्द महाराष्ट्र शासनाने वगळला आहे. बेळगावजवळील शिनोळी गावात महाराष्ट्र शासनाकडून कौशल्यावर आधारित महाविद्यालयाची लवकरच स्थापना होणार आहे. त्याशिवाय सीमाभागात असलेल्या देवचंद महाविद्यालयासाठी …

Read More »

भूकंपग्रस्त गडिकेश्वरला 8 नोव्हेंबरला केंद्रीय पथक

भूकंपाच्या कारणांचे अध्ययन करणार बंगळूर : उत्तर कर्नाटकात वारंवार होणार्‍या भूकंपाचे कारण शोधण्यात भूगर्भशास्त्रावरील देशातील अग्रगण्य संस्थांचे वरिष्ठ अधिकारी आणि शास्त्रज्ञांचे एक पथक येत्या 8 आणि 9 नोव्हेंबरला गुलबर्ग्याच्या चिंचोळी तालुक्यातील गडिकेश्वराला भेट देतील. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी, नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॉक मेकॅनिक्स, जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ …

Read More »

ग्रामपंचायतीने केला वर्षाचा पाणीपट्टी घरफाळा रद्द!

अक्कोळ ग्रामपंचायतीचा निर्णय : अतिवृष्टी कोरोनामुळे ग्रामस्थांना दिला दिलासा निपाणी : गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे सर्व जण हैराण झाले आहेत. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबियांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे शिवाय दरवर्षी होणार्‍या अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन अक्कोळ येथील ग्रामपंचायतीने बैठक घेऊन वर्षभराचा घरफाळा …

Read More »

जिल्हा पंचायतीचे भिजत घोंगडे, तरीही विधानसभेची तालीम!

पुनर्रचना, आरक्षण रद्द  : नव्या आरक्षणाची प्रतीक्षा निपाणी : येत्या दोन महिन्यात जिल्हा पंचायत, तालुका पंचायत निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मतदारसंघ पुनर्रचना होऊन आरक्षणही जाहीर झाले होते. जाहीर आरक्षणाप्रमाणे निपाणी मतदारसंघात इच्छुकांनी निवडणुकीची तयारीदेखील सुरू केली होती. मात्र उच्च न्यायालयाने मतदारसंघ पुनर्रचना व आरक्षणाची अधिसूचनाच रद्द केल्याने निवडणूक लढविण्याच्या प्रयत्नांवर …

Read More »

दसर्‍यानंतर महाराष्ट्र, केरळ सीमेवरील कोविड निर्बंध शिथील

मुख्यमंत्री बोम्माई : दसर्‍यानंतरच प्राथमिक शाळांबाबत निर्णय बंगळूरू : महाराष्ट्र आणि केरळ राज्यासह सीमावर्ती जिल्ह्यात लादण्यात आलेले कोविड निर्बंध दसरा सणानंतर शिथिल करण्याबाबत सरकार निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी बुधवारी सांगितले. प्राथमिक शाळा सुर करण्याबाबतही त्याचवेळी निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले. मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री …

Read More »

एक रकमी एफआरपी दिल्याशिवाय ऊस तोडू नये

शेतकर्‍यांच्या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांचा आदेश निपाणी : बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कर्नाटक राज्य रयत संघटना, जिल्हाधिकारी आणि बेळगाव सर्व साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. रयत संघटनेच्या पाठपुराव्यामुळे जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी मागील वर्षीची थकबाकी दिल्याशिवाय व यावर्षीची एकरकमी एफआरपी जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करु नये असे आदेश दिले …

Read More »

नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल चुकीची माहिती पसरत आहे : उच्च शिक्षण मंत्री अश्वथनारायण

बेळगाव : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल चुकीची माहिती पसरविण्यात येत असून नवे शिक्षण धोरण सर्वांसाठी फायद्याचे असल्याचे मत कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री अश्वथ नारायण यांनी व्यक्त केले. बेळगावमधील केएलईएस संस्थेच्या कॅम्पसमधील जिरगे हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल चुकीची माहिती पसरविण्यात येत असल्यासंदर्भात …

Read More »

पाटील कुटुंबियांनी जोपासली माणुसकी!

युवानेते उत्तम पाटील : बोरगाव येथे 85 पूरग्रस्तांना 5 लाखांवर धनादेश वितरण निपाणी : कोरोना, महापूर यासह नैसर्गिक संकटामध्ये समाजासाठी काहीतरी केले पाहिजे. आपल्यातील माणुसकीचा उपयोग हा समाज कार्यासाठी झाला पाहिजे, या हेतूने शहरातील पोलीस पाटील असलेल्या शशिकला पाटील यांनी निपाणी मतदार संघातील पूरग्रस्तांना प्रत्येकी 5 हजार रुपयाची मदत देऊन …

Read More »

कोगनोळीत जागर सोहळा उत्साहात

हजारो भविकांची गर्दी : अंबाबाई, बिरदेव पालखी मिरवणूक कोगनोळी : येथील हजारो भविकांचे श्रध्दास्थान आसलेल्या श्री अंबिका देवीचा जागर व नवरात्रोत्सव सोहळा उत्साहात साधेपणाने संपन्न झाला. बुधवार (तारीख 13) जागर सोहळयानिमित्त दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी आठ वाजता देवीची आरती करून सजविलेल्या पालखी छत्रपती शिवाजी महाराज चौक, महादेव गल्ली, …

Read More »

कचरा डेपो प्रकल्पाला मिराशी वाटरे ग्रामस्थांचा विरोध

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मोहिशेत ग्राम पंचायत हद्दीतील मिराशी वाटरे गावाच्या हद्दीत सरकारच्या कचरा प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध आहे. यासंदर्भात मिराशी वाटरे गावाच्या ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी प्रकाश हल्लणावर यांना निवेदन देऊन प्रकल्पाला विरोध केला. यावेळी निवेदनात म्हटले आहे की, …

Read More »