Thursday , June 4 2026
Breaking News

बेळगाव

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार दिनांक 4 मार्च 2025 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीस सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले आहे.

Read More »

अभिजात मराठी संस्थेच्यावतीने आयोजित समूहगीत सत्रास विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त दाद

  “अभिजात” मराठी संस्थेच्यावतीने दोन दिवसीय ‘आनंद मेळावा’ मराठा मंदिरात संपन्न झाला. यामध्ये नानाविध अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. खास शालेय विद्यार्थ्यांकरिताही बाल संमेलनाचे विशेष सत्र झाले. संगीत, कथाकथन, नाट्यछटा, पथनाट्य, कविता वाचन आदी कार्यक्रम मुलांसाठी आयोजिले होते. समूहगीत प्रशिक्षण विशेष सत्रासाठी संगीत शिक्षक विनायक मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून …

Read More »

दिल्लीच्या तख्तावर सीमावासीयांच्या व्यथा

    सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या ज्वलंत कवितांना उत्स्फूर्त दाद ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे दिमाखात पार पडले. या संमेलनात बेळगाव, खानापूर, बिदर आणि भालकी येथील सीमाभागातील कवींनी मराठी अस्मिता, सीमावासीयांच्या वेदना आणि संघर्षाचा बुलंद आवाज दिल्लीत पोहोचवला. सीमाकवी रवींद्र पाटील यांनी आपल्या “माय”, “झुंज”, …

Read More »

यात्रेवरून परतताना ट्रॅक्टर उलटून दोघांचा मृत्यू; २० हून अधिक जखमी

  बेळगाव: बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात ट्रॅक्टर उलटून भीषण अपघात होऊन दोन जण जागीच ठार तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. बबलादी यात्रा आटोपून घरी परतत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील कप्पळगुद्दी आणि मुन्याळ केनॉळजवळ ही घटना घडली. एका ट्रॅक्टर-ट्रेलरमध्ये २५ हून …

Read More »

बेळगावसह सीमाभागातील मराठी जनतेला महाराष्ट्रात सामावून घ्यावे

  मुंबई : बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभागातील मराठी जनतेला लवकरात लवकर महाराष्ट्रात सामावून घेऊन संयुक्त महाराष्ट्राचे अधुरे राहिलेले स्वप्न पुर्ण करून तेथील माझ्या मराठी बांधवांना न्याय मिळवून द्याव्या हीच खरी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी शहीद झालेल्या हुतात्माना खरी श्रद्धांजली असेल. महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आजपर्यंत बेळगाव सीमा भागातील मराठी जनतेच्या तीन …

Read More »

बेळगाव महापालिकेचा सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर; प्रत्येक प्रभागाच्या विकासासाठी १० कोटी रुपयाची तरतूद

  बेळगाव : बेळगाव महापालिकेचा २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. यामध्ये अर्थस्थायी समितीच्या अध्यक्षा नेत्रावती भागवत यांनी १० लाख ३५ हजार रुपये बचतीचे अंदाजपत्रक सादर केले. तसेच महापालिकेकडे थकीत निधी जमा करून प्रत्येक प्रभागाच्या विकासासाठी १० कोटी रुपये देण्याची घोषणा केली. आज बेळगाव महापालिकेत महापौर सविता …

Read More »

सीमाभागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वैद्यकीय शिबिराला प्रतिसाद

  बेळगाव : शिवसेना सीमाभागात गेली अनेक वर्षे वैद्यकीय शिबीरांचे आयोजन करते, यावर्षीही दिडशेहुन अधिक शिबीरे सीमाभागात राबविण्यात येत आहेत. बेळगाव, बेळगाव तालुका, खानापूर तालुक्यासह इतर भागात या शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या शिबीरामध्ये डोळे तपासणी करून गरज भासल्यास चष्म्यानच वितरण केले जाते. या शिबिराला मन्नूर, बैलूरसह इतर भागात …

Read More »

सीमाप्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमदार जयंत पाटील यांचा पत्रव्यवहार

  बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते व आमदार जयंत पाटील यांना निवेदन सादर केले होते. या निवेदनाची दखल घेत आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सीमावाद प्रकरणी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद …

Read More »

सीमाप्रश्नी महाराष्ट्र शासनाने तज्ञ साक्षीदार बदलला; प्रा. अविनाश कोल्हे यांची नियुक्ती

  बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीसंदर्भात महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. “भाषिक राज्यपुनर्रचना” या मुद्यावर तज्ञ साक्षीदार म्हणून प्रा. प्रकाश पवार यांच्याऐवजी प्रा. अविनाश कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने केंद्र व कर्नाटक शासनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या दावा क्र. ४/२००४ अंतर्गत …

Read More »

कडोली साहित्य संघातर्फे रविवारी मराठी भाषा दिन

    कडोली : येथील मराठी साहित्य संघ आणि मुंबई येथील राज्य मराठी विकास संस्थेतर्फे रविवारी, (ता. 2) सायंकाळी 4-30 वाजता जागतिक मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे. साहित्य संघाच्या कार्यालयात हा कार्यक्रम होईल. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या भाषण, निबंध आणि …

Read More »