Monday , April 20 2026
Breaking News

सीमाप्रश्नी पंतप्रधानांना पत्रं पाठवण्याच्या उपक्रमाला निलजी गावातुन युवकाचा पाठिंबा

Spread the love

बेळगाव (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने पंप्रधान नरेंद्र मोदींना हजारो पत्रं सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ९ ऑगष्ट क्रांती दिनी पाठवण्याचा जो संकल्प केलेला आहे, त्याला सीमाभागातून मोठा पाठिंबा मिळत आहे, आज सीमालढ्यात मोठं योगदान असलेल्या निलजी ता.बेळगाव गावातून हजारोने पत्रं पाठवण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी सुनील अष्टेकर, गोपाळ पाटील, रमेश मोदगेकर, शामराव पाटील, नारायण गोमाणाचे, सी. के. पाटील, वसंत सुतार, राजू तरळे, किरण शिंदोळकर, किरण मोदगेकर, रोहित गोमाणाचे, यल्लापा सुतार, पिराजी मोदगेकर, प्रवीण पाटील, गणेश पाटील, हेमंत वरपे, नारायण अक्षिमणी, किरण पाटील, विठ्ठल गोमाणाचे, कपिल पाटील, कल्लाप्पा मोदगेकर, सुरज मोदगेकर, अरुण पाटील, यल्लाप्पा पाटील, नारायण पाटील (सर), नागो मोदगेकर, गुंडू मोदगेकर, बाळाराम सुतार, एकनाथ मोदगेकर, कल्लाप्पा सूनगार, भावकांना पाटील, बाळाराम पाटील, महिपत पाटील, बाबू पाटील, बसवंत पाटील, भुजंग पाटील, राजू पाटील, भावकांना मोदगेकर, पिंटू सुतार, प्रज्वल सुतार, रोहन मोदगेकर, शुभम मोदगेकर, ज्ञानेश्वर पाटील, सुभाष पाटील, मयूर पाटील, राहुल मोदगेकर, रामचंद्र मोदगेकर, विठ्ठल सुतार आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शिवजयंती आणि अक्षय तृतीया निमित्त कपिलेश्वर मंदिरात हापूस आंब्यांची आकर्षक आरास

Spread the love  बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात शिवजयंती आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *