Friday , October 25 2024
Breaking News

हा राष्ट्रीय सुरक्षा दलाचा अपमान, अग्निपथ योजनेवरून संजय राऊतांचं केंद्र सरकारवर टीकास्त्र

Spread the love

मुंबई : केंद्र सरकारने अलीकडेच भारतीय सैन्य भरतीसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार 4 वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती केली जाणार आहे. केंद्र सरकारने या योजनेची घोषणा केल्यानंतर देशभर याचे पडसाद उमटत आहे. या योजनेवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. सैन्य दलात कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती करणं हा राष्ट्रीय सुरक्षा दलाचा अपमान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, मोदी सरकारची अशा प्रकारची प्रत्येक योजना अपयशी ठरली आहे. मोदी सरकारने आता 10 लाख, 20 लाख नोकर्‍या देण्याची घोषणा केली आहे. त्याआधी त्यांनी 2 कोटी, 10 कोटी नोकर्‍या देण्याची घोषणा केली होती. महागाई कमी करण्यासाठी आता त्यांनी अग्निपथ योजनेची घोषणा केली.

About Belgaum Varta

Check Also

अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर : ३८ जणांची नावे

Spread the love  मुंबई : भाजप, शिवसेना शिंदे गटानंतर आज (बुधवार, ता. २३) राष्ट्रवादी अजित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *