Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

एमएसस्सीत पल्लवी शेडबाळ चन्नम्मा विद्यापीठात तिसरी

बेळगाव : मराठा मंडळ संस्थेच्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयातील एमएससी आणि एमकॉम पीजी सेंटरची विद्यार्थिनी पल्लवी तिपन्ना शेडबाळ हिने राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगाव येथे एमएससीमध्ये तृतीय क्रमांक पटकाविला आहे. बेळगावच्या इतिहासात या पद्धतीने चन्नम्मा विद्यापिठात एखाद्या विद्यार्थी विद्यार्थिनीने रँक मिळविण्याची ही पहिलीच वेळ आहे. पल्लवी शेडबाळ हिने रसायन …

Read More »

शहापूरच्या मुक्तीधाम स्मशानभूमीतील पत्रे धोकादायक स्थितीत, मनपाचे अक्षम्य दुर्लक्ष

बेळगाव : महानगरपालिकेच्या वतीने शहर आणि उपनगरात विविध विकास कामे केली जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने शहरातील स्मशानभूमीच्या सुधारणांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असल्याची माहिती महापालिकेचे अधिकारी देत असतात. प्रत्यक्षात सदाशिवनगर स्मशानभूमी वगळता शहरातील अन्य स्मशानभूमीच्या सुधारणेकडे महापालिकेने साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून उपनगर परिसरातील …

Read More »

युवकाच्या खुनानंतर गौंडवाड गावात दगडफेक व जाळपोळ

बेळगाव : गौंडवाड ता. बेळगाव येथील एका युवकाच्या खुनानंतर संतप्त जमावाने शनिवारी रात्री दगडफेक, जाळपोळ केल्याची घटना घडली असून या घटनेने संपूर्ण गाव दहशतीच्या सावटाखाली आहे. जमावाने सुमारे 8 हून अधिक वाहने पेटविली असून गवत गंजींनाही आगी लावण्याचा प्रकार घडला आहे. गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सतीश राजेंद्र पाटील …

Read More »

बारावीच्या कला शाखेत महेश बामणे शहरात प्रथम तर जिल्ह्यात तृतीय

बेळगाव : लिंगराज पी यु कॉलेजचा विद्यार्थी महेश मदन बामणे याने बारावीच्या परीक्षेत कला शाखेमध्ये घवघवीत यश संपादित केले असून त्याला ६०० पैकी ५७७ गुण मिळाले आहेत. तो बेळगाव शहरातुन पहिला आला असून जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने अर्थशास्त्रमध्ये १०० पैकी १०० गुण घेतले असून भूगोल मध्ये ९९ गुण घेतले …

Read More »

बारावी परीक्षेत गोगटे कॉलेजचा 88 टक्के निकाल

बेळगाव : टिळकवाडी येथील कर्नाटक लाॅ सोसायटीच्या केएलएस गोगटे पदवीपूर्व वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने यंदाच्या पदवीपूर्व द्वितीय वर्ष परीक्षेत स्पृहणीय यश मिळवले असून महाविद्यालयाचा निकाल 88 टक्के लागला आहे. गोगटे महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील 58 विद्यार्थ्यांनी त्याचप्रमाणे विज्ञान शाखेतील 12 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण संपादन केले आहेत. महाविद्यालयाच्या वाणिज्य आणि …

Read More »

मराठा मंडळ कॉलेजचा 64 टक्के निकाल

बेळगाव : बेळगाव शहरातील मराठा मंडळ प्री -युनिव्हर्सिटी कॉलेजचा यंदाचा पदवीपूर्व द्वितीय वर्ष परीक्षेचा निकाल 64 टक्के लागला असून या कॉलेजमधील 533 पैकी 338 विद्यार्थी -विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी 38 विद्यार्थी हे विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मराठा मंडळ प्री -युनिव्हर्सिटी कॉलेजमधील आदिती एस. पाटील ही 576 गुण मिळवून …

Read More »

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची 20 ला बैठक

बेळगाव : मराठी परिपत्रकासाठी 27 जूनला होणाऱ्या मोर्चाबाबत जागृतीसाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक सोमवारी (ता.20) रोजी दुपारी दोनला तुकाराम महाराज संस्कृतीक भवन, ओरिएंटल स्कूल येथे होणार आहे. मराठीतून कागदपत्रे देण्यास टाळाटाळ होत असल्याने मध्यवर्ती समितीतर्फे भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. मोर्चाबाबत विचारविनिमय करण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीला समिती …

Read More »

बारावी परीक्षेचा निकाल 61.88 टक्के

दक्षिण कन्नड प्रथम; बेळगावचा निकाल 59.88 टक्के बेंगळुरू : कर्नाटक राज्य पदवीपूर्व शिक्षण मंडळाने घेतलेल्या 2021-22च्या पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. निकालात दक्षिण कन्नड जिल्हा शेकडा 88.02 सह राज्यात प्रथम आला असून त्याच्याच शेजारचा उडुपी जिल्हा द्वितीय आला आहे. विजापूर जिल्हा तिसर्‍या स्थानावर आहे. गेल्या एप्रिल 23 …

Read More »

महिला विद्यालय शाळेचे प्रभाताई देशपांडे स्कूल असे नामकरण संपन्न

बेळगाव : “जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी तुमच्या मनाची एकाग्रता, धाडस आणि आत्मविश्वास या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच पण त्याबरोबरच तुम्हाला नैतिक मूल्यांची सुद्धा गरज आहे. या प्रभाताई देशपांडे यांच्या महिला विद्यालय शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर त्यांच्या बालपणीच नैतिक मूल्याची बिजे पेरणी गेली असल्याने या शाळेचा एकही विद्यार्थी जीवनात वाया जाणार …

Read More »

केंद्राने ‘अग्निपथ’ रद्द करून आंदोलनकर्त्यांशी चर्चा करावी : विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या

हुबळी : केंद्र सरकारने अग्निपथ योजना रद्द करून आंदोलनकर्त्यांशी चर्चा करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केली. हुबळी येथे शनिवारी पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, केंद्राच्या अग्निपथ योजनेला काँग्रेसचा विरोध आहे. 4 वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची काय परिस्थिती होईल याचा विचार केंद्राने केला आहे का? या योजनेच्या …

Read More »