Monday , April 20 2026
Breaking News

गांधी कुटुंबाचा सल्ला, पाठिंबा घेण्यास लाज वाटत नाही

Spread the love

 

मल्लिकार्जुन खर्गे, रिमोट कंट्रोलच्या चर्चेवर प्रतिक्रीया

बंगळूर : मी पक्षाध्यक्ष झालो तर गांधी कुटुंबाचा सल्ला आणि पाठिंबा घेण्यास मागेपुढे पाहणार नाही. त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी संघर्ष केला आणि पक्षाचा कारभार चालवण्यासाठी आपली शक्ती पणाला लावली, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवार येथे सांगितले.
एआयसीसी अध्यक्ष झाल्यानंतर खर्गे गांधी घराण्याचा रिमोट कंट्रोल बनतील का, या चर्चेला उत्तर देताना ज्येष्ठ नेते म्हणाले, की १७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पक्षाच्या सर्वोच्च पदाच्या निवडणुकीत मी ‘प्रतिनिधींचे उमेदवार’ आहे. ते असे बोलतात कारण त्यांच्याकडे बोलण्यासारखे दुसरे काही नसते. भाजप अशा प्रचारात गुंततो आणि इतरही त्याचाच पाठपुरावा करतात. सोनिया गांधी यांनी २० वर्षे पक्षात काम केले आहे. राहुल गांधी अध्यक्षही होते. त्यांनी पक्षासाठी अथक परिश्रम केले आहेत आणि पक्ष वाढीसाठी आपली शक्ती पणाला लावली आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, जवाहरलाल नेहरूंपासून ते इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधींपर्यंत नेहरू-गांधी परिवाराने या देशासाठी अपार योगदान आणि त्याग केला आहे. ते म्हणाले, गांधींच्या विरोधात अशा गोष्टी बोलणे योग्य नाही, कारण आम्ही (काँग्रेस) काही निवडणुका हरलो आहोत.
‘त्यांनी (गांधी कुटुंबाने) या देशासाठी चांगले काम केले आहे. त्यांच्या सल्ल्याचा पक्षाला फायदा होईल. त्यामुळे मी त्यांचा सल्ला आणि पाठिंबा नक्कीच घेईन. त्यात मला लाज वाटत नाही. तुमचा (माध्यमांचा) सल्ला काही उपयोगाचा असेल तर मी तोही घेईन. त्यांनी या पक्षासाठी काम केले आहे आणि त्यांचा सल्ला घेणे माझे कर्तव्य आहे,” असे खर्गे म्हणाले.
देशाच्या कानाकोपऱ्यात पक्षासाठी कोण कुठे आहे आणि कोण काय करू शकतो हे सोनिया आणि राहुल गांधींना माहीत आहे. पक्षात एकसंध राहण्यासाठी काय करावे हे मला शिकावे लागेल आणि मी ते करेन, असे ते म्हणाले.
पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खर्गे हे तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांच्या विरोधात लढत आहेत, ज्याचा निकाल १९ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.
मला कोणत्याही वादात पडायचे नाही, ते (शशी थरूर) त्यांचे मत बोलत आहेत. मला त्याच्या कल्पनांवर वाद घालायचा नाही. मी माझे विचार मांडत आहे. हा आमचा पक्ष किंवा कौटुंबिक विषय आहे. त्यांना काय हवे ते सांगण्याचा अधिकार आहे. मलाही तसाच अधिकार आहे. हा पक्षातील एक मैत्रीपूर्ण संघर्ष आहे, असे थरूर यांनी त्यांच्या संदेशाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.
एआयसीसी अध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या खर्गे यांना पक्षाचे काही नेते उघडपणे पाठिंबा देत असल्याबद्दल शशी थरूर यांनी नाराजी व्यक्त करून ही अनधिकृत निवडणूक असल्याचे म्हटले आहे. त्यावर खर्गे म्हणाले, मी निवडणूक प्रतिनिधींशी संपर्क साधत आहे, माझे प्रचार व्यवस्थापक संघटन करत आहेत, मी लोकप्रतिनिधींशी संपर्क साधत आहे. वरिष्ठ नेते आणि लोकप्रतिनिधींचे उमेदवार मला प्रायोजित करत आहेत.
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याची भूमिका गांधी कुटुंबीयांनी घेतल्यानंतर विविध राज्यातील ज्येष्ठ नेते आणि लोकप्रतिनिधींनी माझी पक्ष संघटनेतील प्रदीर्घ सेवा लक्षात घेऊन निवडणूक लढविण्यास सांगितले.
कर्नाटकात होणार्‍या निवडणुका आणि काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवडीनंतर झालेल्या प्रश्नाला उत्तर देताना खर्गे म्हणाले, ‘राज्यातील नेते एका कारणासाठी झगडत आहेत आणि मेहनत घेत आहेत. माझा सामूहिक नेतृत्वावर, सामूहिक सल्ल्यावर विश्वास आहे. ते म्हणाले की कर्नाटकात काँग्रेस एकसंध आहे आणि राज्यात (२०२३ च्या विधानसभा निवडणुकीनंतर) सरकार स्थापन करेल.

About Belgaum Varta

Check Also

योगेश गौडा खून प्रकरण: विनय कुलकर्णींसह १६ दोषीना आज शिक्षा होणार जाहीर

Spread the love  बंगळूर : २०१६ मध्ये घडलेल्या भाजप नेते योगेश गौडा यांच्या खून प्रकरणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *