Sunday , July 26 2026
Breaking News

कर्नाटकात अतिवृष्टीमुळे २० जणांचा मृत्यू

Spread the love

 

कुमठा : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे, असे महसूल मंत्री कृष्णा भैरे गौडा यांनी सांगितले.
उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमठा येथे बोलताना मंत्री म्हणाले की, मान्सून राज्यात दाखल झाला असून काही जिल्ह्यांमध्ये पावसाची कमतरता आहे. इतर अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात पावसामुळे आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. 40 गुरे मरण पावली. अनेक ठिकाणी घरांची पडझड होऊन पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
काही जिल्ह्यांमध्ये पावसाअभावी उगवलेली पिके सुकून गेली आहेत. पाण्याची समस्या आहे. अशा क्षेत्रासाठी जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करून क्लाऊड सीडिंगबाबत निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

महामार्गालगतच्या ढाबे, हॉटेल, विक्री केंद्रांवर ग्रामपंचायतींकडून शुल्क आकारणी

Spread the love  बंगळूर : ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत कार्यरत असलेल्या तात्पुरत्या ग्रॅनाइट-मार्बल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *