Tuesday , July 28 2026
Breaking News

Belgaum Varta

क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णांची मूर्ती चांगल्या जागी बसवा!

  बेळगाव : मच्छे (ता. बेळगाव) येथे नगरपंचायतीसमोरच्या गावातील सोसायटीच्या जागेत ५ जुलै रोजी क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. ही मूर्ती सदर जागेतून हटवून मोक्याच्या आणि चांगल्या जागेत बसवण्यात यावी, अशी मागणी समस्त मच्छे गावकऱ्यांनी केली आहे. आज नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांसह बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या निरीक्षकांना याबाबत …

Read More »

धबधब्याजवळ अधिकाऱ्यांची ओली पार्टी : उर्वरित चार कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

  बेळगाव : बटावडे धबधब्याजवळील जंगल परिसरात दारूबंदीचे उल्लंघन करून मौजमजा केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध यापूर्वीच तक्रार दाखल करण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांनी अन्य चौघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. पर्यटनास बंदी असतानाही बटावडे धबधब्याजवळील वनपरिक्षेत्रात अधिकारी व डॉक्टरांच्या गटाने ओली पार्टी केल्याप्रकरणी जांबोटी वनपरिक्षेत्रात चार जणांविरुद्ध यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात …

Read More »

पर्यटनास निर्बंध असताना अधिकाऱ्यांनीच केली धबधब्याजवळ ओली पार्टी!

  बेळगाव : अतिवृष्टीमुळे धबधब्याजवळ जाण्यास पर्यटकांना निर्बंध घालण्यात आले असताना अधिकाऱ्यांनीच ओली पार्टी केल्याची घटना जांबोटीजवळच्या बटावडे धबधब्यावर घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, हेस्कॉमचे कांही अधिकारी आणि डॉक्टरांच्या एका गटाने जांबोटीजवळील बटावडे धबधब्याजवळ तंबू ठोकून मोठ्या प्रमाणात पार्टी करून मौजमजा केल्याची घटना सर्वत्र चर्चेत आहे. पावसामुळे धबधबा आणि …

Read More »

मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह 19 नेत्यांना हायकमांडकडून बोलाओ

  बंगळुरू : काँग्रेस आमदारांमधील असंतोषाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने हस्तक्षेप केला आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक नेत्यांना दिल्लीत उपस्थित राहण्याचे आदेश जारी केला आहे. हायकमांडने काँग्रेसच्या १९ नेत्यांना दिल्लीत येण्याची सूचना केली असून या पार्श्वभूमीवर सतीश जारकीहोळी, रामलिंगरेड्डी यांच्यासह अनेक मंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, …

Read More »

विस्तारित कार्यकारिणीमध्ये तरुणांना समाविष्ट करून संघटना बळकट करण्याचा निर्धार!

  खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शिवस्मारक येथे दिनांक 30 जुलै रोजी म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सद्यस्थितीत महाराष्ट्र एकीकरण समिती समोर अनेक आव्हाने आहेत. संघटना बळकट करण्यासाठी नवनिर्वाचित अध्यक्ष व समिती पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागणे …

Read More »

डी. के. शिवकुमार यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

  नवी दिल्ली : उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती मिळवल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना सर्वोच्च न्यायालयात मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयने डी. के. शिवकुमार यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली आणि म्हटले की, ते उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे सीबीआय मागे हटली आहे. उच्च न्यायालयाने …

Read More »

राज्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; हवामान खात्याचा अंदाज

  बंगळुरू : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी असून हवामान सूर्यप्रकाशित आहे. दरम्यान, 3 ऑगस्टनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 3 ऑगस्टनंतर किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण कन्नड, उडुपी, उत्तर कन्नड जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. बेळगाव, बिदर, गदग, हावेरी, धारवाड, …

Read More »

श्री सोन्या मारुती मंदिरातर्फे गो-रक्षकांचा सत्कार

  बेळगाव : शहरातील आरटीओ सर्कल येथील पंचवटी श्री सोन्या मारुती मंदिरातर्फे आयोजित आपल्या देशात मातृ स्वरूप मानल्या जाणाऱ्या गाईंच्या रक्षणकर्त्यांचा सत्कार समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. पंचवटी श्री सोन्या मारुती मंदिर येथे गेल्या शनिवारी दुपारी आयोजित सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार ॲड. अनिल बेनके उपस्थित होते. यावेळी …

Read More »

बेळगावच्या तनिष्का आणि आयुषी राज्यस्तरावर चमकल्या

  बेळगाव : बेळगाव येथील तनिष्का कपिल काळभैरव हिने राशी व्ही रावचा सरळ गेममध्ये सहज पराभव करून बेंगळुरू येथे कॅनरा युनियनने आयोजित केलेल्या राज्य क्रमवारीत टेबल टेनिस स्पर्धेत अंडर-13 मुलींच्या एकेरी विजेतेपदावर कब्जा केला. बेळगाव येथील प्रशिक्षक संगम बैलूर यांच्याकडून प्रशिक्षण घेत असलेल्या तनिष्काने राशीविरुद्धच्या सामन्यात ११-६ आणि ११-५ असे …

Read More »

जयपूर ते मुंबई पॅसेंजरमध्ये गोळीबार चार जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक पोलिसाचा समावेश

  मुंबई : जयपूर ते मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. पालघर रेल्वे स्थानकाजवळ पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली आहे. पॅसेंजरच्या बी-5 बोगीमध्ये हा गोळीबार झाला आहे. गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये एका पोलिसाचाही समावेश आहे. आरपीएफच्या कॉन्स्टेबलनेच हा गोळीबार केल्याची माहिती कळते. …

Read More »