Tuesday , July 28 2026
Breaking News

Belgaum Varta

पालखी सोहळ्याला गालबोट? आळंदीत वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद

  मुंबई : आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी अलंकापूरी सजली आहे. मात्र याच पालखी सोहळ्याला काही प्रमाणात गालबोट लागलं आहे. पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाला आहे. मंदिरातील प्रवेशावरुन हा वाद झाला आहे. इंद्रायणीच्या काठावर हजारो वारकरी दाखल झाले आहेत. याच वारकऱ्यांच्या टाळ …

Read More »

मान्सून कोकणात धडकला, राज्यात पुढील 4 दिवस धो धो पावसाचा इशारा

  पुणे : नैऋत्य मान्सून आज महाराष्ट्रात धडकलाय. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रासह संपूर्ण गोवा मान्सूनने व्यापला आहे. मान्सूच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल वातावरण तयार झालेय, त्यामुळे चार दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. पुढील काही तासांत मान्सून पुढे सरकत मुंबईत दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे राज्यात पुढील चार …

Read More »

भुत्तेवाडी येथे वृद्धाचा खून!

  खानापूर : वृध्दाच्या डोकीत घाव घालून खून केल्याची घटना नंदगड पोलीस स्थानक हद्दीतील भुत्तेवाडी येथे घडली आहे. लक्ष्मण यल्लाप्पा सुतार (वय 75) असे डोकीत घाव घालून खून करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. भुत्तेवाडी गावात सुतार काम करणाऱ्या वृद्धाचा खून केल्याची घटना आज रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. लक्ष्मण यल्लाप्पा …

Read More »

काँग्रेसने जाहीरनाम्यातील वचनपूर्ती केली

  अण्णासाहेब हवले; बोरगावमध्ये महिलांना मोफत बस सेवेचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : राज्यातील काँग्रेस सरकारने निवडणुकीच्या वेळी दिलेल्या जाहीरनाम्यातील वचनांची पूर्ती केली आहे. त्यामुळे महिलांना मोफत बस उपक्रम सुरू झाला आहे. महिलांनी येत्या तीन महिन्यासाठी आधार कार्ड दाखवूनच सर्वत्र प्रवास करायचा आहे. शिवाय पुढील काळात सेवासिंधू कार्यालयातून स्मार्ट कार्ड घेऊन …

Read More »

जांबोटी भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; झाडे कोसळून १२ विद्युत खांब जमिनदोस्त

  खानापूर : खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील जंगल भागात शनिवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्याने झाडे कोसळून जवळपास १२ विद्युत खांब जमिनदोस्त झाले. त्यामुळे जांबोटी भागातील जवळपास २७ खेड्यातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. यावेळी हेस्काॅमच्या कार्यनिर्वाहक अधिकारी कल्पना तिरवीर यांनी बोलताना सांगितले की, खानापूर तालुक्यातील जंगल भागात नेहमी वादळी वाऱ्यासह …

Read More »

महिलांसाठी मोफत बसची योजना उपयुक्त

  तहसीलदार विजय कडगोळ; निपाणीत महिलासाठी मोफत बस योजनेचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : राज्यातील काँग्रेस सरकारने निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी मोफत बस प्रवास योजना महिलांसाठी उपयुक्त ठरेल. त्याचा लाभ महिलावर्गाने घ्यावा अशी आवाहन तहसीलदार विजय कडगोळ यांनी केले. येथील बस स्थानकात रविवारी …

Read More »

कर्नाटकात महिलांसाठी मोफत बस प्रवास “शक्ती” योजनेचा प्रारंभ

  महिला सक्षमीकरणासाठी “शक्ती”चा पाठिंबा’: मंत्री सतीश जारकीहोळी बेळगाव : राज्यभरातील महिलांसाठी मोफत बस प्रवास उपलब्ध करून देणाऱ्या ‘शक्ती’ योजनेचा लाभ घेऊन महिलांचे सक्षमीकरण करावे. सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्ह्याचे प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, शैक्षणिक प्रवास, व्यावसायिक कौशल्य विकास यासारख्या उद्देशांसाठी या योजनेचा वापर करून महिलांना सर्वप्रकारे सक्षम …

Read More »

कर्नाटकसह 5 राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता!

  बेंगळुरू : अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता वाढली आहे. याचा परिणाम म्हणून कर्नाटकसह देशातील 5 राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील काही आंतरदेशीय जिल्ह्यांसह किनारपट्टीवर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ताशी ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात …

Read More »

धारवाडजवळ लॉरी – कार भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

  धारवाड : धारवाडमध्ये राष्ट्रीय महामार्ग 4 वर लॉरी आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. हळीयाळ पुलाजवळ हा अपघात झाला असून दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमींपैकी एकाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 35 वर्षीय बिंदू गौडा आणि 36 वर्षीय बापू गौडा यांचा मृत्यू झाला. अन्य मृत …

Read More »

भारत ३ बाद १६४; पाचव्या दिवशी २८० धावांचे आव्हान

  ओव्हल : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जात आहे. आज चौथ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने 8 गड्यांच्या मोबदल्यात 270 धावा करून आपला दुसरा डाव घोषित केला. त्यामुळे टीम इंडियाला 444 धावांचे लक्ष्य मिळाले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने दुसऱ्या …

Read More »