Saturday , March 15 2025
Breaking News

Belgaum Varta

गुजरात : ट्रक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू

आणंद : गुजरातमधील आणंद जिल्ह्यात बुधवारी भीषण  अपघात झाल्याची घटना घडली आहे. येथील तारापूरजवळ एक ट्रक आणि कारची धडक झाली. यामध्ये एकाच कुटुंबातील 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एका लहान मुलाचा देखील समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. तर जखमींना …

Read More »

DAP खतावरील अनुदानात वाढ, सरकारी तिजोरीवर पडणार १४ हजार ७७५ कोटी रुपयांचा भार

नवी दिल्ली : डाय अमोनियम फॉस्फेट अर्थात डीएपी खतावरील अनुदानात भरीव वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांना यापुढेही 1200 रुपये प्रती पोते या दराने डीएपी मिळणार असल्याचे केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. अनुदानात वाढ करण्याच्या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर 14 हजार 775 कोटी …

Read More »

पर्यावरण दिनानिमित्त येळ्ळूरमध्ये वृक्षारोपण

येळ्ळूर : पर्यावरण दिनानिमित्त आज परमेश्वर मंदिर येळ्ळूर येथे बेलाच्या झाडाचे वृक्षारोपण व झाडे वाटप सामाजिक कार्यकर्ते श्री. विरेश हिरेमठ यांच्यावतीने साजरा करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष श्री. सतीश पाटील होते. सतीश पाटील बोलताना म्हणाले की, विरेश हिरेमठ यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. आज प्रत्येकालच ऑक्सिजनची आवश्यकता आहे …

Read More »

खानापूरात मत्स्य पालन केंद्र बंदच

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या ठिकाणी अनेक खात्याची कार्यालये असुन अनेक कार्यालये जनतेच्या संपर्कात असतात. प्रत्येक खात्याच्या कार्यालयातून जनतेच्या समस्या, विविध योजनाचा लाभ होतो. विविध खात्याचे अधिकारी तालुक्यातील गावोगावी जाऊन संपर्कात राहून जनतेची सेवा करतात.मात्र खानापूर शहरातील असे एक कार्यालय आहे. की खात्याच्या अधिकाऱ्याची तालुक्यातील जनतेला ओळख नाही. या खात्याच्या …

Read More »

माधुरी जाधव यांच्याकडून इस्कॉन मंदिर येथे सॅनिटायझर फवारणी

बेळगाव : कोरोनाच्या काळात गल्लोगल्ली सॅनिटायझर फवारणी करण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेक सामाजिक कार्यकर्ते स्वयंप्रेरणेने पुढे येत आहेत.सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव या अशा सामाजिक कार्यात अग्रेसर असून वाढती मागणी पाहता त्यांनी इस्कॉन मंदिर, टिळकवाडी येथे सॅनिटायझर फवारणी करून मंदिर परिसराचे निर्जंतुकीकरण केले. या कामी त्यांच्या सोबत विनय पाटील, शुभम …

Read More »

गवळीवाड्यात आमदार डॉ. निंबाळकरांनी केले साहित्याचे वाटप

खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) गावापासून जवळ असलेल्या गवळीवाड्यातील कुटुंबाना खानापूर तालुक्याच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी गवळीवाड्याला नुकताच भेट देऊन गवळीवाड्यातील प्रत्येक कुटूंबाला १० किलो तादूळ व इतर साहित्याचे वाटप केले.तसेच गवळीवाड्यातील इतर समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.यावेळी आमदार डॉ. अंजली निंबाळकर, काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष महादेव कोळी, अनिता दंडगल, …

Read More »

शनिवारी-रविवारी विकेंड लॉकडाऊन जाहीर

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी शनिवार दि. १९ रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते सोमवार दि. २१ रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी संपूर्ण कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या कालावधीत जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सगळे व्यवहार बंद राहणार आहेत. सकाळी सहा …

Read More »

पहिल्याच पावसात खानापूर-जांबोटी क्राॅस रस्त्यावर पाणी

खानापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या पहिल्याच पावसात खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवर रस्त्यावर पाणी आल्याने येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशी वर्गाला व वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी संबंधित खात्याच्या अधिकारी वर्गाने याची दखल घेऊन रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याची व्यवस्था करावी. अशी मागणी सर्वथरातून तसेच शहरवासीयातुन होत आहे.जत-जांबोटी महामार्गावर रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम …

Read More »

मराठा आरक्षण : सरकार चर्चा करायला तयार; सतेज पाटील यांचे आवाहन

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वांचीच आग्रहाची मागणी आहे. समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही सर्वांचीच भूमिका आहे. त्याआधी समाजाला ज्या सुविधा मिळायला हव्यात त्याबाबत चर्चा करण्यासाठी संभाजीराजे तुम्ही मुंबईला या, मी तुमची भेट मुख्यमंत्र्यांशी घालून देतो. चर्चेने प्रश्न सोडवू, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी बुधवारी केले. ते मराठा मूक …

Read More »

कोल्हापूर : मराठ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत नेण्याचा प्रयत्न : शाहू छत्रपती महाराज

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी सर्व समाजाला सोबत घेतलं पाहिजे. महाराष्ट्राने एकमुखाने पुढे गेले पाहिजे. त्यासाठी कोल्हापुरात मूक आंदोलन झालं. हा आवाज निश्चित मुंबईपर्यंत जाईल. मराठा समाजाचा आवाज दिल्लीपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्यातील ४८ खासदारांसह राज्य सरकारने हा विषय दिल्लीपर्यंत पोहोचवायला हवा, अशी अपेक्षा शाहू छत्रपती महाराज यांनी कोल्हापुरात व्यक्त …

Read More »