रायबाग : रायबाग तालुक्यातील अलखनूर गावाजवळील जमखंडी-मिरज राज्य महामार्गावर झालेल्या अपघातात संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला आहे. लॉरी आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील पती, पत्नी आणि मुलगी ठार झाली. गिरेप्पा कुंद्राळी, त्यांची पत्नी मंजुळा कुंद्राळी (२७) आणि मुलगी आराध्या कुंद्राळी (७) अशी मृतांची नावे आहेत. अपघात झाला …
Read More »बीम्स रुग्णालयात नर्सिंग अधिकाऱ्यावर हल्ला; घटनेच्या निषेधार्थ बीम्ससमोर कर्मचाऱ्यांचे आंदोलन
संचालकांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित बेळगाव : बेळगाव येथील बीम्स रुग्णालयात एका मानसिक रुग्ण तरुणीने ड्युटीवरील नर्सिंग अधिकाऱ्याचा हात चावल्याची घटना घडली. त्यानंतर संबंधित तरुणीच्या कुटुंबीयांनी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याने नर्सिंग अधिकारी बसवराज कबडगी गंभीर जखमी झाले. या घटनेच्या निषेधार्थ नर्सिंग कर्मचाऱ्यांनी आज बीम्ससमोर निदर्शने करत हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली. …
Read More »इतिहास संशोधक केतन पुरी यांचा विशेष कार्यक्रम प्रथमच बेळगावात
बेळगाव : इतिहासप्रेमींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी आणि प्रेरणादायी जीवनपटाचा सखोल उलगडा करणारा इतिहास संशोधक केतन पुरी यांचा विशेष कार्यक्रम प्रथमच बेळगावात आयोजित करण्यात आला आहे. येत्या २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता लोकमान्य रंगमंदिर, बेळगाव येथे हा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. …
Read More »एआय-आधारित ‘फेशियल अटेंडन्स’ पुढील वर्षापासून राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांत नवी प्रणाली
बंगळूर : राज्यातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने पुढील शैक्षणिक वर्षापासून एआय-आधारित चेहरापहिचान (फेशियल अटेंडन्स) प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात विभागाने परिपत्रक जारी केले आहे. मोबाइल ऍपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवली जाणार असून, ई-शासन पद्धतीने ही योजना राबवली जाईल. याबाबतची घोषणा …
Read More »परीक्षा ही विद्यार्थांच्या क्षमतांची कसोटी : सीमाकवी रवींद्र पाटील
किणी दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व पारितोषिक वितरण उत्साहात कोवाड (प्रतिनिधी) : “परीक्षा ही केवळ प्रश्नपत्रिकेची नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या क्षमतांची कसोटी असते. गुण मिळविणे महत्त्वाचे आहे; पण आत्मविश्वास, जिद्द आणि संस्कार ही खरी संपत्ती आहे,” असे प्रेरणादायी प्रतिपादन प्रमुख वक्ते सीमाकवी रवींद्र पाटील यांनी केले. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे …
Read More »शब्दगंध कवी मंडळ संघातर्फे २८ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिवस निमित्त कार्यक्रम
बेळगाव : येथील शब्दगंध कवी मंडळ संघाची नुकतीच बैठक पार पडली. यावेळी दरवर्षीप्रमाणे मराठी भाषा गौरव दिवस उत्साहात साजरा करण्यासंदर्भात चर्चा झाली. यावर्षीचा मराठी भाषा गौरव दिवस २८ फेब्रुवारी रोजी विशेष व्याख्यानाचे आयोजन करून साजरा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. ‘मराठी भाषा आणि अभिजातपण’ या विषयावर बोलण्यासाठी मिरज येथील …
Read More »सिद्धरामय्या हेच राज्यातील जनतेला नेतृत्व निर्णयांबाबत संदेश देतील
शिवकुमार यांचे विधान; नेतृत्वाचा निर्णय योग्य वेळी बंगळूर : नेतृत्वाच्या मुद्द्यावर यापूर्वी सांगितल्याप्रमाणे मी, मुख्यमंत्री सिध्दरामय्या आणि पक्षाच्या हायकमांडने एकत्रितपणे निर्णय घेतला आहे. तो निर्णय काय आहे, हे योग्य वेळी जाहीर केले जाईल. हा कोणताही गुप्त व्यवहार नाही. वेळ आल्यावर मुख्यमंत्री स्वतः राज्यातील जनतेला याबाबत संदेश देतील, असे उपमुख्यमंत्री …
Read More »बेळगावमधील सात ग्रामपंचायतींमध्ये पुनर्वसन कार्यकर्त्यांची नियुक्ती
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आणि सरकारी योजनांचा लाभ त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी सात ग्रामपंचायतींमध्ये ‘ग्रामीण पुनर्वसन कार्यकर्त्यांची’ नियुक्ती करण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते आज या कार्यकर्त्यांना अधिकृत नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात नवी उमेद …
Read More »बेळगावात ‘विराट हिंदू संमेलन’ उत्साहात संपन्न
बेळगाव : बेळगाव उपनगरातील हिंदू संमेलन समितीच्या वतीने आयोजित ‘विराट हिंदू संमेलन’ मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडले. धर्म आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी हिंदू समाजाने संघटित होणे काळाची गरज असल्याचे आवाहन या संमेलनाद्वारे करण्यात आले. खडेबाजार येथील संयुक्त महाराष्ट्र चौकात आयोजित या सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संमेलनाचे मुख्य आकर्षण ठरली …
Read More »हजारो भाविकांच्या उपस्थितीत मानकापूरमध्ये मलकारसिद्ध देवाचा पालखी महोत्सव
निपाणी (वार्ता) : माणकापूर येथे श्री मलकारसिद्ध देवाच्या यात्रेनिमित्त मुख्य मंदिरात आयोजित पालखी मिरवणुकीचे उद्घाटन सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी दीपक पाटील (वसगडेकर) आणि सचिन चौगुले यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले. सोमवारी (ता.१६) मुख्य मंदिरात देवाची विधिवत पूजा करून रुद्राभिषेक, बिल्वार्चण, महाअभिषेक व पूजा बांधण्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta