बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील चिकबुदनूर गावात मोबाईल फोनच्या किरकोळ वादातून एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मुरगोड पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपीला अटक केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली. मृताचे नाव फकीरप्पा मल्लप्पा हिडकण्णावर (वय ४०) …
Read More »गुणवंत विद्यार्थिनीचे आयआयटीचे स्वप्न साकार करण्यासाठी संजीवीनी फौंडेशन कटिबद्ध
बेळगाव : ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण गुणवंत विद्यार्थिनी कु. अश्विनी पुजारी हिच्या उच्च शिक्षणासाठी संजीवीनी फौंडेशनतर्फे यंदाही शैक्षणिक मदत देण्यात आली आहे. निपाणी तालुक्यातील ढोणेवाडी येथील अश्विनी हिच्या पीयूसी द्वितीय वर्षाचे शैक्षणिक शुल्क फौंडेशनतर्फे भरून तिच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देण्यात आले आहे. संजीवीनी फौंडेशनने गतवर्षी अश्विनी हिची शैक्षणिक …
Read More »मराठीतील मतदार फेरनिरीक्षण अर्जाबाबत केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश
बेळगाव : विशेष मतदार यादी फेरनिरीक्षण (SIR) प्रक्रियेसाठी मराठी भाषेतील गणना (Enumeration) अर्ज उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केलेल्या तक्रारीची केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाने गंभीर दखल घेतली असून, या संदर्भात कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष श्री. …
Read More »सिद्धरामय्या यांच्याशी कोणतेही मतभेद नाहीत : मंत्री सतीश जारकीहोळी
बंगळुरू/बेळगाव : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी कोणतेही मतभेद नसून आम्ही पूर्वीप्रमाणेच आजही एकत्र काम करत आहोत, असे स्पष्ट करत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. बंगळुरू येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जारकीहोळी म्हणाले की, सिद्धरामय्या आणि त्यांच्या गटात मतभेद असल्याच्या चर्चा …
Read More »मतदार नोंदणीसाठी नागरिकांनी पुढे यावे : डॉ. अंजली निंबाळकर
बेळगाव : प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार यादीत आपले नाव नोंदवून लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन केपीसीसीच्या कित्तूर कर्नाटक प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनी केले. बेळगाव येथील जिल्हा काँग्रेस समिती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार नोंदणी मोहिमेचा आढावा घेतला. जिल्ह्यात आतापर्यंत …
Read More »रामदेव गल्लीत सराफी दुकानात चोरीचा प्रयत्न; पोलिसांकडून तपास सुरू
बेळगाव : शहरातील खडेबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामदेव गल्ली येथे असलेल्या एका नामांकित सराफी दुकानात शुक्रवारी पहाटे चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यवर्ती बाजारपेठेतील ‘व्ही. पी. वेर्णेकर अँड सन्स’ या सराफी दुकानासमोर पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास एका …
Read More »मतदार यादीत नाव नसल्याने नागरिकत्व संपत नाही : सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
नवी दिल्ली : मतदार यादीत एखाद्या व्यक्तीचे नाव नसल्याने किंवा नाव वगळण्यात आल्याने तिचे भारतीय नागरिकत्व आपोआप संपुष्टात येत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे. नागरिकत्व निश्चित करण्यासाठी कायद्यानुसार स्वतंत्र प्रक्रिया असून ती निवडणूक आयोगाच्या अधिकारक्षेत्रात येत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. पश्चिम बंगालमधील विशेष मतदार यादी …
Read More »केनवडे पी. एम. श्री. केंद्रशाळेत इको क्लबतर्फे वृक्षसंवर्धनाचा जागर
निपाणी (वार्ता) : केनवडे येथील पी.एम.श्री. केंद्रशाळेत इको क्लब अंतर्गत वृक्षारोपण, वाचन प्रेरणा आणि पर्यावरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विजयकुमार पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य जीवन साळोखे गट शिक्षणाधिकारी सारिका कासोटे, पर्यावरणप्रेमी शिक्षक व भूमी वात्सल्य सोशल फाउंडेशनचे संस्थापक नामदेवराव चौगुले उपस्थित होते. …
Read More »नैतिक मूल्ये हेच विद्यार्थ्यांचे खरे धन सुसंस्कारित पिढी घडविण्याचे डॉ. खंडके यांच्या आवाहन
निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित अक्कोळ येथील पार्श्वमती विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासह चारित्र्य संवर्धनाच्या उद्देशाने नैतिक मूल्ये हेच विद्यार्थ्यांचे खरे धन या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून निपाणीतील डॉ. ऐश्वर्या खांडके यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी नैतिक मूल्यांचे महत्त्व समजावून सांगितले.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. राकेश तावदारे …
Read More »रासाई शेंडूर येथील विद्यासागर हायस्कूलला महाराष्ट्र शासनाकडून १५ लाखाचा निधी मंजूर
निपाणी (वार्ता) : रासाई-शेंडूर येथील विद्यासागर हायस्कूलच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीमधून पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी संरक्षण भिंत, खेळाचे मैदान आणि वाचनालय उभारण्यासाठी मंजूर झाला आहे. त्यासाठी बोरगाव येथील अरिहंत बँकेचे अध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील आणि सहकाररत्न उत्तम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta