Friday , April 17 2026
Breaking News

Belgaum Varta

हॉकी बेळगावतर्फे मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराचा उद्या शुभारंभ

  बेळगाव : हॉकी बेळगावतर्फे १ एप्रिल ते ३१ मे पर्यंत मोफत हॉकी उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. टिळकवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस (लेले) मैदानावर दररोज ६.३० ते ८.३० या वेळेत हॉकी सराव शिबिर होणार आहे. ‘जाॕईन स्पोर्टस् फॉर लाइफ’ या ब्रीदवाक्यासह मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण करणे, हा …

Read More »

सीमाभागातील सुपुत्र, रायगडची कर्मभूमी असलेले पत्रकार नरेश पाटील यांची स्व. दीपक दळवी यांना श्रद्धांजली

  बेळगाव (धनंजय पाटील) : सीमाभागात जन्मलेले आणि सध्या रायगड जिल्ह्यात आपली कर्मभूमी घडवलेले पत्रकार नरेश पाटील यांनी बेळगाव येथे अल्पकाळाच्या दौऱ्यात मराठी अस्मितेसाठी आयुष्य वाहून घेतलेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती (MES) चे अध्यक्ष दिवंगत दीपक दळवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. दिवंगत दीपक दळवी हे सीमाभागातील मराठी जनतेच्या हक्कांसाठी …

Read More »

पिढ्यान् पिढ्या बैलगाड्यांतून होतोय ऐन उन्हात ‘भक्तीचा प्रवास’

  जोतिबा यात्रेचे वेगळेपण कायम; बेळगाव मधील भाविकांनी जपली परंपरा निपाणी (वार्ता) : अनेक पिढ्यांपासून चैत्रात होणाऱ्या श्री जोतिबा यात्रेत काळाच्या ओघात अनेक बदल होत गेले. पण एक परंपरा मात्र अखंड राहिली ती म्हणजे श्री जोतिबा देवाच्या दर्शनासाठी बैलगाड्यान येण्याची. बेळगाव परिसरातील अनेक गावातील भाविक पिढ्यान् पिढ्या भक्तिभावाने जपलेली ही …

Read More »

येळ्ळूर विभाग म. ए. समिती व ग्रामस्थांच्या वतीने प्रकाश मरगाळे यांचा उद्या सन्मान

  बेळगाव : उद्या रविवार दि. 05/04/2026 रोजी सायंकाळी ठीक 6.00 वा. चांगलेश्वरी मंदीर येळ्ळूर येथे मध्यवर्ती म. ए. समितीचे नूतन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा येळ्ळूर विभाग म. ए. समिती व ग्रामस्थांच्या गावाच्या वतीने जाहीर सत्कार होणार आहे तरी गावातील आजी -माजी जिल्हा पंचायत सदस्य, आजी -माजी तालुका पंचायत सदस्य, …

Read More »

नाशिकमध्ये मोटार विहिरीत कोसळून सहा विद्यार्थ्यांसह नऊ जणांचा मृत्यू

​ नाशिक : खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आटोपून घरी निघालेल्या कुटुंबीयांची मोटार परिसरातील शेतातील विहिरीत कोसळल्याने नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री दिंडोरी येथे घडली. मृतांमध्ये सहा विद्यार्थी व पालकांचा समावेश आहे. विहीर पाण्याने भरलेली असल्याने बचाव कार्यात अडथळे आले. क्रेनच्या साहाय्याने रात्री ही मोटार बाहेर काढण्यात आली. ​दिंडोरी …

Read More »

दक्षिण भारत जैन सभेच्या वर्धापन दिनी बोरगावच्या मीनाक्षीताई पाटील यांचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : दक्षिण भारत जैन सभेचा १२७ वर्धापन दिन कोल्हापूर येथे पार पडला. त्यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते मीनाक्षीताई पाटील यांचा गौरवशाली सन्मान करण्यात आला. दक्षिण भारत जैन सभा व तिची पहिली शाखा जैन महिला परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. समारंभात अरिहंत उद्योग समूहाच्या मीनाक्षी रावसाहेब …

Read More »

सर्वोत्तम श्राविका पुरस्काराबद्दल मीनाक्षी पाटील यांचा निपाणीत सत्कार समारंभ

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील मीनाक्षी रावसाहेब पाटील यांना नवी दिल्ली येथील भारत वर्षीय दिगंबर जैन महिला महासभेतर्फे ‘सर्वोत्तम श्राविका’ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यानिमित्त त्यांचा निपाणी शहरात विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला. सहकाररत्न उत्तम पाटील, विनयश्री अभिनंदन पाटील त्यांच्या प्रमुख उपस्थितीत निलांबरी तारळे, यशोधन तारळे …

Read More »

दहावीमध्ये तिसऱ्या भाषेला ग्रेड देण्याच्या निर्णयावर राज्यपालांची नाराजी

  पुनर्विचार करण्याची राज्य सरकारला सूचना बंगळूर : राज्यातील दहावीच्या (एसएसएलसी) परीक्षेत हिंदीसह तिसऱ्या भाषेसाठी गुणांऐवजी केवळ ग्रेड देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात त्यांनी सरकारला पत्र लिहून निर्णयाचा पुनर्विचार करण्याची सूचना केली आहे. राज्यपालांनी मुख्य सचिव शालिनी रजनीश यांना पाठवलेल्या …

Read More »

मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्याचा अभिमान; डॉ.रोहन पाष्टे यांचे प्रतिपादन

  मराठी विद्यानिकेतनमध्ये डॉ. रोहन पाष्टे यांची भेट बेळगाव : दि. 2 एप्रिल 2026 रोजी डॉ.रोहन पाष्टे यांनी मराठी विद्यानिकेतन शाळेला भेट दिली. सुरूवातीला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून डॉ. रोहन पाष्टे यांनी अभिवादन केले. शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, सदस्य शिवाजी अतिवाडकर, अरुण देसुरकर यांनी …

Read More »

मनशांतीसाठी दानधर्म, परोपकार आवश्यक : राजेंद्र वडर- पवार यांचे मत

  भिमापुरवाडीत अखंड हरिनाम सप्ताला प्रारंभ निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात प्रत्येकाला कामातून वेळ मिळेनासा झाला आहे. शिवाय कामातील ताणतणावामुळे अनेक व्याधी घडत आहेत. त्यापासून दूर राहण्यासाठी साधू संतांच्या सहवासात काही वेळ घालवणे महत्त्वाचे आहे. त्यांच्याकडून मिळणारी शक्ती वेगळी असून प्रत्येकाने त्यासाठी भक्ती केली पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये देव असून त्याला …

Read More »