Wednesday , July 29 2026
Breaking News

Belgaum Varta

महिलांनी टेन्शन फ्री जगावे : डॉ. स्मृती हावळ

संकेश्वर (प्रतिनिधी) : आजच्या स्पर्धात्मक युगात महिलांंचे टेन्शनमुळे जगणे मुश्किल झाले आहे. मानसिक दबावाखाली महिलांंचा दिनक्रम चालला आहे. त्यामुळे महिलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होताना दिसत असल्याचे बेळगांव केएलई वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहप्राध्यापिका डॉ. स्मृती हावळ यांनी सांगितले. त्या निडसोसी पाॅलिटेक्नीक काॅलेजमध्ये आयोजित लेडिज फोरम उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. …

Read More »

प्रजासत्ताक दिनी खानापूरातून मोटरसायकल रॅलीचे आयोजन

खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड ता. खानापूर येथे प्रजास्ताक दिनादिवशी क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांना फाशी देण्यात आली होती. या बलिदानादिवशी गेली दहा वर्षे युवा नेते पंडित ओगले याच्या नेतृत्वाखाली हिंदु युवकांची खानापूर येथील स्वामी समर्थ मंदिरापासून मोटरसायकल रॅलीचे आयोजन सालाबादप्रमाणे बुधवारी दि. २६ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजन करण्यात आले …

Read More »

संकेश्वरात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पतंजली योग समितीच्या वतीने श्री महालक्ष्मी समुदाय भवनमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन सविता कुंभार यांनी केले. यावेळी बोलताना योग शिक्षक पुष्पराज माने म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या देशभक्तीला अनुसरून केंद्र सरकारने नेतजींची जयंती पराक्रम …

Read More »

स्वातंत्र्य सैनिक संघटनेतर्फे सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

बेळगाव: येथील जिल्हा स्वातंत्र्य सैनिक आणि उत्तराधिकारी संघ यांच्यावतीने 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष शतायुषी स्वातंत्र्य सैनिक राजेंद्र कलघटगी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमात विवेकानंद पोटे, किरण बेकवाड यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस …

Read More »

नेताजी मल्टीपर्पज सोसायटीच्यावतीने नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी

2022 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन येळ्ळूर : शिवाजी रोड येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीमध्ये थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नेताजी मल्टीपर्पज सोसायटीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेताजी मल्टीपर्पज सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून येळ्ळूर …

Read More »

‘एनडीं’चे आयुष्य वंचितांच्या न्याय हक्कासाठी खर्ची : एस. एन. पाटील

  बेळगाव : दिवंगत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी आपले सारे आयुष्य सामाजिक, शैक्षणिक, सहकार आणि वंचितांच्या न्याय हक्कासाठी समर्पित केले. त्यांनी अनेक आंदोलने चळवळी केल्या. अन्यायाच्या विरोधात लढून महाराष्ट्राला वेगळी दिशा दाखविली. त्याचबरोबर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न संबंधीच्या प्रत्येक लढ्याचे नेतृत्व केले, म्हणूनच त्यांची सीमा चळवळीचे ‘भीष्माचार्य’ अशी ओळख होती, …

Read More »

खानापूर तालुक्यात ऊसाची उचल उशीरामुळे ऊसाला तुरे

खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी परिसरासह नागुर्डा, तसेच पश्चिम भागात अवकाळी पावसामुळे एक महिना ऊसाची उचल उशीरा झाली. त्याचा परिणाम झाल्याने सध्या तालुक्याच्या गर्लगुंजी परिसरासह नागुर्डा, तसेच पश्चिम भागातील शिवारात ऊसाला तुरे सुटले आहेत. जानेवारी महिना संपत आला. तसा ऊसाची उचल करणे गरजेची होती. अवकाळी पावसामुळे तसेच साखर कारखान्याच्या …

Read More »

खानापूर अंगणवाडी सेविकांची निवड यादी तब्बल 6 महिन्यानंतर जाहिर

खानापूर (वार्ता) : गेल्या कित्येक वर्षानंतर खानापूर तालुक्यातील 15 अंगणवाडीत नेमणुकीचे आदेश देण्यात आले. तेव्हापासून तालुक्यातील महिलावर्गातुन समाधान पसरले होते. अनेक महिलांनी पैसे खर्च करून अर्ज केले. गेल्या सहा महिन्यापासून नोकरीची अपेक्षा करणार्‍या अंगणवाडी शिक्षिकाची यादी तब्बल सहा महिण्यानंतर जाहिर झाली आहे. तेव्हा कुणाला आक्षेप नोंदवायचा असल्यास 27 जानेवारीच्या आत …

Read More »

रेल्वे ओव्हर ब्रिजवरील रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

बेळगाव (वार्ता) : जुन्या धारवाड रोड येथील रेल्वे गेटच्या ठिकाणी तीन वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे ओव्हर ब्रिजवरील रस्त्याची दिवसेंदिवस दुर्दशा होत असून त्यावरून वाहने चालविणे धोकादायक बनत चालले आहे. जुन्या धारवाड रोड येथील रेल्वे गेटच्या ठिकाणी 24 जानेवारी 2017 रोजी बांधकामाला सुरुवात करण्यात आलेला हा रेल्वे ओव्हर …

Read More »

विकेंड कर्फ्यु हटताच; खासबाग येथील आठवडा बाजारात गर्दी!

बेळगाव (वार्ता) : देशातील कर्नाटकसह पाच राज्यात कोरोना संक्रमणाचा वेग वाढत असतानाही राज्य सरकारने शनिवार व रविवारी लागू करण्यात आलेला विकेंड कर्फ्यु मागे घेतला आहे. परिणामी शहरातील खासबागच्या रविवारच्या आठवडी बाजारात आज रविवारी पुन्हा एकदा खरेदीसाठी प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळाली. कोरोनाला निमंत्रण देणारी ही गर्दी चिंतेचा विषय बनली आहे. …

Read More »