Friday , March 6 2026
Breaking News

Belgaum Varta

गवाळी गावचे एकत्रितपणे स्थलांतर करा : ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील नेरसा ग्रामपंचायतच्या अखत्यारीत येणारे गवाळी हे जेमतेम हजार लोकसंख्या असलेले गाव. खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्य निसर्गाच्या कुशीत वसलेले हे गाव मूलभूत नागरिक सुविधांपासून वर्षानुवर्षे वंचित आहे. जवळपास 200 कुटुंब असणारे गवाळी हे गाव सर्व मूलभूत सोयी सुविधा पुरवून एकाच ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी …

Read More »

सरकारने शिक्षकांची तातडीने नेमणूक करण्यास प्राधान्य द्यावे : रणजीत पाटील

  खानापूर : ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या चांगल्या प्रमाणात आहे. मात्र शाळांमध्ये असलेल्या शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने शिक्षकांची तातडीने नेमणूक करण्यास प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य रणजीत पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे गुरुवारी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून खानापूर …

Read More »

गुरुपौर्णिमेनिमित्त संत मीरा शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत गुरुपौर्णिमा निमित्त शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेच्या माधव सभागृहात आयोजित समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीनिवास जी आय, जनकल्याण ट्रस्टचे सचिव सुधीर गाडगीळ, शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव या मान्यवरांच्या हस्ते …

Read More »

सूर्या सॉ मिल मालकाचा मृतदेह मलप्रभा नदीत सापडला!

  खानापूर : खानापूर येथील मारवाडी समाजातील प्रतिष्ठित नागरिक सूर्या सॉ मिलचे दयालाल कर्षन पटेल (वय 65) यांचा मृतदेह कुप्पटगिरी नजीक मलप्रभा नदीपात्रात बांबूच्या झुडूपात अडकलेला आढळला. दयालाल कर्षन पटेल हे मंगळवार दिनांक 8 जुलैपासून बेपत्ता होते. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला होता. मंगळवारी सायंकाळी मलप्रभा नदीच्या घाटावर त्यांचे चप्पल …

Read More »

गोवा येथील अपघातात खानापूरच्या तरुणाचा मृत्यू

  खानापूर : गोव्यातील फोंडा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार झाले तर दोघे जखमी झाले. मृतांपैकी एक खानापूर तालुक्यातील तरुण आहे. गुरुवारी दुपारी फोंडा येथील बेतोडा परिसरात एक भीषण अपघात घडला. या घटनेत खानापूर तालुक्यातील लोंढा पिंपळे येथील आदित्य देसाई (२२) हा तरुण जागीच ठार झाला. …

Read More »

देशपांडे गल्लीतील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी

  बेळगाव : बेळगाव शहरातील देशपांडे गल्ली येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात काल गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष पूजा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. भक्तिमय वातावरणात सर्वांनी एकत्र येऊन सामूहिक आरती केली. या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून स्वामी समर्थांच्या …

Read More »

सौंदत्ती रेणुका देवी मंदिराच्या दानपेटीत तीन कोटी ८१ लाख जमा

  बेळगाव : सौंदत्ती रेणुका देवी मंदिराची दानपेटी उघडण्यात आली असून, एप्रिल ते जून येथील महिन्याच्या कालावधीत देणगी स्वरूपात ३ कोटी ८१ लाख रुपये देणगी जमा झाली आहे. सलग दोन दिवस देणगीची मोजदाद करण्यात आली. मंदिराला देणगीच्या स्वरूपात ३ कोटी ३९ लाख ४० हजार ८३१ रुपये जमा झाले आहेत. यांसह …

Read More »

आषाढी दिंडीसह चव्हाट गल्ली 5 नंबर मराठी शाळेत गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

  बेळगाव : आज दिनांक 10 जुलै रोजी गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून चव्हाट गल्ली येथील मराठी शाळा नं. 5 आणि माजी विद्यार्थी संघाच्या वतीने गुरुवंदना कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाला सर्व पालक आणि विद्यार्थी पारंपारिक वेशभूषेत हजर होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी गल्लीमध्ये आषाढी …

Read More »

फेमा प्रकरणात कर्नाटकातील काँग्रेस आमदारावर ईडीचे छापे

  बंगळूर : परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) अंतर्गत प्रकरणांच्या संदर्भात कर्नाटकातील काँग्रेस आमदार एस. एन. सुब्बारेड्डी यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी अचानक छापे टाकले. सूत्रांनी सांगितले की, बंगळुरमधील किमान पाच परिसरांची झडती घेण्यात येत आहे, ज्यामध्ये चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील बागेपल्ली येथील काँग्रेस आमदार सुब्बारेड्डी यांच्या घरांचाही समावेश आहे. सूत्रांनी …

Read More »

पाच वर्षे राज्याचा मीच मुख्यमंत्री; सिद्धरामय्या यांनी केला पुनरूच्चार

  बंगळूर : राज्यात मुख्यमंत्रीपद रिक्त नाही. त्यामुळे सत्तेच्या वाटपाचा मुद्दा हायकमांडसमोर उपस्थित झालेला नाही. मी ५ वर्षे मुख्यमंत्री म्हणून सत्तेत राहणार, असा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नवी दिल्लीत गुरुवारी बोलताना पुनरूच्चार केला. कर्नाटक राज्याच्या राजकारणातील नेतृत्व बदलाबाबत काही आमदारांच्या विविध व्याख्या आणि जाहीर विधानांमध्ये, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सर्व अटकळांना खोडून …

Read More »