Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

दहावी, बारावीचे अंतिम वेळापत्रक जाहीर

  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा व मुल्यमापन मंडळाने बुधवारी दहावी आणि बारावी वार्षिक परीक्षा २०२४ चे अंतिम वेळापत्रक जाहीर केले. आज प्रकाशित झालेल्या अंतिम वेळापत्रकानुसार, दहावी (एसएसएलसी) परीक्षा २५ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान, तर बारावी (द्वितीय पीयूसी) परीक्षा १ मार्च ते २२ मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षा …

Read More »

महिलेची दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

  रायबाग : रायबाग जवळील पालभावी येथील विवाहित महिलेने आपल्या दोन्ही मुलींना पाठीला बांधून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील सुलतानपूर गावच्या हद्दीत सकाळी 11 वाजता सरस्वती नितीन किरवे (वय 26) हिने आपल्या दोन मुली दीपिका (वय 7) आणि रितिका (वय 4) यांच्यासह …

Read More »

हिट अँड रन कायद्याच्या विरोधात बेळगावात ट्रक चालक-मालकांची निदर्शने

  बेळगाव : केंद्र सरकारच्या फौजदारी संहितेअंतर्गत केलेल्या हिट अँड रन प्रकरणात चालकांना 7 लाखांचा दंड आणि 10 वर्षांची शिक्षा ठोठावन्याची तरतूद असलेला 2023 चा हिट अँड रन केस कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी बेळगाव जिल्हा लॉरी ड्रायव्हर्स असोसिएशनने बेळगावात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून आंदोलन छेडले. केंद्र सरकारने नुकत्याच पारित …

Read More »

हुतात्मादिनी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मुंबई येथे जोरदार निदर्शने

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी १७ जानेवारी आणी १ जून हे दिवस हुतात्मा दिन म्हणून मोठ्या गांभीर्याने पाळले जातात. गेल्या दोन वर्षांपासून मराठी भाषिकांच्यावर मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू असून सीमाप्रश्न न्यायालयात आहे त्यामुळे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या …

Read More »

बेळगाव तालुका समितीच्यावतीने हुतात्मा दिन गांभीर्याने

  बेळगाव : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात राज्यकारभार व्यवस्थित चालण्यासाठी भाषावर प्रांतरचना करण्यात आली, त्यावेळी मुंबई राज्यातला मराठी भूभाग त्यावेळच्या म्हैसूर राज्यात अन्यायाने डांबण्यात आला. १७ जानेवारी १९५६ रोजी ही वार्ता नभोवाणीवरून कळविण्यात आली तेव्हा बेळगावमध्ये झालेल्या पहिल्या आंदोलनात संयुक्त महाराष्ट्रसाठी पहिले पाच हुतात्मे बेळगाव परिसरात झाले आहेत. संयुक्त महाराष्ट्रासाठी …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे हुतात्म्यांना गांभीर्याने अभिवादन!

  बेळगाव : पोलीस संरक्षणात काही कन्नड संघटना मराठी भाषिकांवर अन्याय करत आहेत. पोलीस संरक्षण बाजूला काढले तर त्यांची ही हिंमत होणार नाही. त्यामुळे त्यांनी मराठी माणसाचा नाद करू नये असा इशारा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी दिला. मराठी भाषिकांच्या न्याय्य हक्कासाठी सीमालढ्यात प्राणांची आहुती …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन!

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज १७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ वाजता हुतात्मा कै. नागाप्पा होसूरकर, कुप्पटगिरी यांना खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी हुतात्मा कै. पैलवान मारूती बेन्नाळकर, कै. मधू बांदेकर, कै. महादेव बारागडी, कै. लक्ष्मण गावडे आणि निपाणीतील कै. श्रीमती …

Read More »

केंद्र सरकारचा ‘हिट अँड रन’ कायदा रद्द करा

  निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा संघटना; तहसीलदारामार्फत पंतप्रधानाना निवेदन निपाणी (वार्ता) : वाहनांचा अपघात झाल्यास भारतीय दंड संहितेचे कलम १०६(१-२) १० वर्षे तुरुंगवास आणि ७ लाख रुपये दंड (अजामीनपात्र) अशी शिक्षा देते. जर एखाद्या हिट अँड रन प्रकरणात चालक पोलीस स्टेशन किंवा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे न जाता पकडला गेला. हा …

Read More »

सीमाप्रश्नात युवकांचा निर्धार महत्त्वाचा : प्रा. डॉ. अच्युत माने

  निपाणीत हुतात्म्यांना अभिवादन निपाणी (वार्ता) : सीमाप्रश्नाचा साठ वर्षे लढा सुरू असून हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कर्नाटक-महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यासह राज्यपालांची या प्रश्नावर चर्चा झाली आहे. कर्नाटकाची बाजू भक्कम असून महाराष्ट्रानेही आपली भूमिका ठामपणे बजावली आहे. त्यामुळे आता अखेरच्या टप्प्यात युवकांचा निर्धार महत्त्वाचा आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. …

Read More »

समाजाचे स्वास्थ्य बिघडवणाऱ्या धार्मिक शक्तींवर लक्ष ठेवा

  मुख्यमंत्री सिध्दरामय्या; वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन बंगळूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या काळात समाजाचे स्वास्थ्य बिघडवणाऱ्या धार्मिक शक्तींवर लक्ष ठेवावे आणि खोट्या बातम्या पसरवून त्याचा लाभ उठविणाऱ्या शक्तींवर कठोर कारवाई करावी, अशा कडक सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. शहरातील नृपतुंगा रोडवरील राज्य पोलिस मुख्यालयात आज …

Read More »