खानापूर : खानापूर तालुक्यातील जळगे येथील मलप्रभा नदीच्या काठावर असलेल्या ऊस पिकाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून अंदाजे १२०० टन ऊस भस्मसात झाल्याची घटना सोमवारी घडली. या आगीत परिसरातील शेतकऱ्यांचे ४० लाख रुपयांपेक्षा अधिक आर्थिक नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजातून समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले, …
Read More »जिल्हाधिकाऱ्यांवरील हक्कभंग प्रस्तावासंदर्भात खासदार इराण्णा कडाडींनी घेतली लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांची भेट
बेळगाव : महाराष्ट्र -कर्नाटक सीमा प्रश्न तज्ञ कमिटीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांनी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध केलेल्या हक्कभंग तक्रारीच्या पार्श्वभूमीवर, राज्यसभा खासदार इराण्णा कडाडी यांनी आज नवी दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही खासदाराच्या विशेषाधिकाराचे उल्लंघन केलेले नाही, तर केवळ शांतता राखण्यासाठी कायदेशीर पाऊल उचलले …
Read More »मनरेगातून गांधीजींचे नाव हटवू नका; बेळगावात कृषी समाजाचा एल्गार
बेळगाव : ग्रामीण भारताची जीवनवाहिनी असलेल्या ‘मनरेगा’ योजनेत बदल करून महात्मा गांधीजींचे नाव हटवण्याच्या आणि ‘व्हीबी-जी रामजी’ विधेयक लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात सोमवारी भारतीय कृषक समाजातर्फे तीव्र निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारने हिवाळी अधिवेशनात ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने’त सुधारणा करणारे विधेयक आणले आहे. भारतीय कृषक …
Read More »‘महाराष्ट्र भवना’ला विरोध करण्यासाठी करवेचा थयथयाट
बेळगाव : बेळगावमध्ये सीमावर्ती मराठी भाषिकांच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्र भवन’ उभारणीच्या हालचालींना कर्नाटक रक्षण वेदिकेने पुन्हा आडकाठी करत थयथयाट सुरु केला आहे. महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या प्रयत्नांमुळे भाषिक सलोखा बिघडेल, असा दावा करत वेदिकेने जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत या भवनाला …
Read More »खानापूर पोलिस स्थानकाकडून गुन्हेगारांना अभय : खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
खानापूर : खानापूर पोलिस स्थानकात चाललेल्या गैरकारभारामुळे गुन्हेगारांना अभय तर सामान्य नागरिकांना त्रास अशी काहीशी स्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप खानापूर ब्लॉक काँग्रेसने केला असून यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ब्लॉक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. खानापूर पोलीस स्थानकात चालू असलेल्या अनागोंदी कारभाराबाबत ब्लॉक काँग्रेसकडे अनेक …
Read More »हट्टीहोळी गल्ली येथे 4 दुचाकी अज्ञातांनी पेटविल्या…
बेळगाव : शहरातील हट्टीहोळी गल्ली परिसरात अनोळखींनी दुचाकी पेटविल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. शनिवारी मध्यरात्री सुमारास ही घटना घडल्याचे समोर आले असून, या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हट्टीहोळी गल्लीतील एका निवासी भागात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काही …
Read More »मराठी विद्यानिकेतनतर्फे डॉ. शिवाजीदादा कागणीकर यांच्या सत्कार सोहळ्याचे व ‘परिवर्तनाचा वाटसरू’ या बाल एकांकीकेचे आयोजन
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित मराठी विद्यानिकेतन बेळगावच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर शिवाजीदादा कागणीकर यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन मंगळवार दिनांक ३० डिसेंबर रोजी ज्योती महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी ४.३० वा. करण्यात आले आहे. यानिमित्ताने त्यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘परिवर्तनाचा वाटसरू’ या बालकांकिकेचे सादरीकरण करण्यात येणार आहे. डॉक्टर …
Read More »कृष्णा देवगाडी ठरला ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’चा मानकरी
बेळगाव : दि. 20 व 21 डिसेंबर 2025 रोजी येथील के.पी.टी.सी.एल. समुदाय भवन, शिवबसव नगर येथे बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेच्या वतीने 6 वी राष्ट्रीय कराटे स्पर्धा यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये पंजाब, हरियाणा, दिल्ली, तामिळनाडू, महाराष्ट्र, गोवा आदी विविध राज्यांतील 1200 हून अधिक कराटेपटूंनी सहभाग नोंदवला …
Read More »मराठा समाजाच्या विकासासाठी मंजुनाथ भारती स्वामीजी आज खानापूरात मार्गदर्शन करणार!
खानापूर : मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण चिंतन बैठक आयोजित करण्यात आली आहे. परमपूज्य वेदांताचार्य मराठा जगद्गुरू श्री. मंजुनाथ भारती स्वामीजी, गोसाई मठ, भवानी पीठ, गविपूरम (बेंगलोर) यांच्या दिव्य सान्निध्यात चिंतन बैठक आज सोमवार दि. 29 रोजी दुपारी 3.30 वाजता, खानापूर शहरातील मलप्रभा नदीकाठी असलेल्या हरे कृष्ण …
Read More »येळ्ळूर समितीचे दोन्ही गट एक करा अन्यथा पर्याय निवडू; समितीच्या युवा कार्यकर्त्यांचा इशारा
बेळगाव : येळ्ळूरमध्ये म. ए. समितीचे दोन गट कार्यरत आहेत ते दोन्ही गट एक करा अन्यथा आम्ही समिती सोडून आमचा पर्याय निवडू असा थेट इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीतील युवा वर्गाने नेत्यांना दिला आहे. येळ्ळूरमध्ये सध्या समितीचे दोन गट सक्रिय आहेत. यामुळे येळ्ळूर मधील समितीच्या युवा कार्यकर्त्यांना मोठा प्रश्न निर्माण झालाय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta