Sunday , July 26 2026
Breaking News

Belgaum Varta

व्ही बी एस एस गर्ल्स हायस्कूल बेळगुंदी येथे जायन्ट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन च्या वतीने विद्यार्थिनींना गणवेश वितरण

  बेळगाव : विश्व भारत सेवा संचलित व्ही बी एस एस गर्ल्स हायस्कूल बेळगुंदी शाळेत जायन्ट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन च्या वतीने विद्यार्थिनींना गणवेश वितरण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्ही.बी.एस.एस संस्थेचे अध्यक्ष विजयराव नंदीहळ्ळी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून जायन्ट्स ग्रुप ऑफ बेळगावचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण शिंदे, संजय …

Read More »

कन्नड सक्तीविरोधी महामोर्चासाठी येळ्ळूरमध्ये मशाल मोर्चा; शेकडो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग

  येळ्ळूर : येळ्ळूर म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली मशाल मिरवणूक काढून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीवतीने सोमवार दि. 22 जून रोजी कन्नड सक्ती विरोधात महामोर्चाची जनजागृती करण्यात आली. प्रारंभी सेक्रेटरी प्रकाश अष्टेकर यांनी, मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारने असंविधानिक अत्याचार केले आहेत. कायद्यानुसार कन्नड भाषेबरोबर मराठी भाषेलाही घटनात्मक हक्क मिळावेत. अन्यथा मराठी …

Read More »

राज्यात ‘नो बॅग डे’ उपक्रम सुरूच; तिसऱ्या शनिवारी पुस्तके नव्हे, अनुभवातून शिक्षण

  बेळगाव : शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वाढते ओझे कमी व्हावे, शिक्षण अधिक आनंददायी व अनुभवाधारित व्हावे तसेच विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, कल्पकता आणि सामाजिक जाणीवा विकसित व्हाव्यात या उद्देशाने शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने यंदाही ‘नो बॅग डे’ उपक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी …

Read More »

व्यसनामुळे कुटुंबासह समाजाचे नुकसान

  कुर्ली हायस्कूलमध्ये प्रबोधनपर व्याख्यान निपाणी (वार्ता) : मादक पदार्थांचे सेवन हे केवळ व्यक्तीचेच नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाचेही नुकसान करणारे आहे. तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्य, गांजा, अमली पदार्थासारख्या व्यसनांमुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक हानी होते. सध्या व्यसनमुक्त युवक हीच सक्षम समाजाची ताकद असल्याचे मत निपाणी ग्रामीण पोलीस …

Read More »

तुरमुरीतील कचरा डेपो हटविण्याची मागणी; ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  बेळगाव : ग्रामीण भागातील तुरमुरी गावात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कचरा डेपोमुळे नागरिकांना गंभीर त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून हा डेपो तातडीने अन्यत्र हलविण्याची मागणी केली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, जिल्हा प्रशासनाने यापूर्वी कचरा डेपो स्थलांतरित करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच …

Read More »

कन्नड सक्तीविरोधी आंदोलनाला विरोध; ‘करवे’चे पोलीस आयुक्तांना निवेदन

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने २२ आणि २७ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक रक्षण वेदिकेच्या (करवे) शिवरामेगौडा गटासह काही कन्नड संघटनांच्या प्रतिनिधींनी शहर पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करून या आंदोलनाला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे. करवेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रस्तावित आंदोलनाबाबत …

Read More »

राकसकोप-हिडकल जलाशयातील पाणीसाठा तळाला; बेळगाववर भीषण पाणीसंकटाचे गडद सावट

  बेळगाव : “पाणी जपून वापरा…” हा सल्ला आता केवळ प्रशासनाचे आवाहन राहिलेला नाही, तर येणाऱ्या भीषण पाणीसंकटाचा इशारा ठरत आहे. शहराला जीवनदायी ठरणाऱ्या राकसकोप-हिडकल जलाशयातील पाणीसाठा झपाट्याने घटत असल्याने बेळगावकरांना आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने नागरिकांना पाण्याचा प्रत्येक थेंब …

Read More »

नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर 28 केंद्रांभोवती जमावबंदी; नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

  बेळगाव : वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट (NEET) परीक्षा रविवार, 21 जून रोजी शहर व उपनगरातील 28 परीक्षा केंद्रांवर होणार आहे. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी तथा पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी परीक्षा केंद्रांच्या परिसरात जमावबंदी लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. नीट …

Read More »

राज्यातील वीज खाजगीकरण प्रक्रिया रद्द करा; ‘रयत’तर्फे तहसीलदारांना निवेदन

अन्यथा राजू पोवार यांचा आंदोलनाचा इशारा निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारने राज्यातील वीज वितरण प्रणाली खाजगी कंपन्यांच्या हाती सोपवण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे नागरिक, शेतकरी, रोजंदारी मजूर आणि वीज ग्राहकांमध्ये गंभीर चिंता निर्माण झाली आहे. वीज ही सर्वसामान्य माणसाची मूलभूत गरज असू तिचे नियंत्रण खाजगी कंपन्यांना देणे हे जनहिताच्या विरोधात आहे. त्यामुळे …

Read More »

अर्धा जून न उलटला तरीही शेतकऱ्यांचे डोळे वरूनराजाकडे

  मृग नक्षत्र कोरडे गेल्याने हंगाम वाया जाण्याची भीती निपाणी (वार्ता) : मृगातील पाऊस पडल्यावर पेरणीची लगबग सुरू होते. मात्र यंदा मृग नक्षत्र लागून आठवडा उलटला तरी पेरणी योग्य पाऊस न पडल्याने शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पडलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची टोकनी केली आहे. पण त्यानंतर …

Read More »