Monday , June 1 2026
Breaking News

Belgaum Varta

मजुरांच्या टंचाईमुळे ‘हार्वेस्टर’लाच पसंती; गहू, हरभरा काढणीची लगबग

  मजुरांना ३०० रुपये मजुरी देऊनही मनुष्यबळाची कमतरता निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण परिसरात सध्या हरभरा, गहू काढणीच्या कामांना वेग आला आहे. वाढता उन्हाचा तडाखा आणि मजुरांची तीव्र टंचाई यामुळे शेतकरी पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक हार्वेस्टर यंत्राद्वारे काढणी करण्याला प्राधान्य देत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे वेळ आणि श्रमाची बचत …

Read More »

हुन्नरगी येथील बिनदाती घोडा- बैलगाडी शर्यतीत संज्योत सुतळे यांची गाडी प्रथम

    निपाणी (वार्ता) : हुन्नरगी येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मी-नारायण यात्रेनिमित्त आयोजित बिन दाती घोडा-बैलगाडी शर्यतीमध्ये हुन्नरगी येथील संज्योत सुतळे यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावला. तर अभिषेक मुरदंडे- हुन्नरगी, ज्योतिबा प्रसन्न- वाघापूर यांच्या गाड्यांनी द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे मिळवली. नवतर बिन दाती घोडागाडी शर्यतीत किशोर पुजारी -कोडोली, धीरज कोळी-कागल …

Read More »

सीमाप्रश्नाच्या खटल्याच्या सुनावणीसाठी मराठी पत्रकार संघाचे जनआंदोलन

  बेळगाव : दीर्घकाळ प्रलंबित असलेला कर्नाटक – महाराष्ट्र सीमावाद 2004 साली महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला. आज 22 वर्षे झाली तरी देखील या खटल्यावर सलग सुनावणी होऊ शकली नाही. सदर सुनावणी तात्काळ आणि जलद गतीने करावी, अशी विनंती बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सरन्यायाधीशांना करण्यात येणार आहे. …

Read More »

ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

    बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून रसायनशास्त्राचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि केमिकल इंजिनीअरिंग विभागाचे डीन प्रा. प्रवीण घोरपडे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. आर. के. पाटील, उपाध्यक्ष श्री. आर. एस. …

Read More »

ज्योती सेंट्रल स्कूलच्या बालवाटिकेचा पदवीदान समारंभ (ग्रॅज्युएशन डे)

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलच्या बालवाटिकेचा पदवीदान समारंभ (ग्रॅज्युएशन डे) नुकताच अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. या सोहळ्यात यु.के.जी. मधील चिमुकल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. व्यासपीठावर संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रो. आर. एस्. पाटील, सचिव प्रो. नितीन घोरपडे, प्राचार्या सौ. सोनाली …

Read More »

बेळगावात ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली उद्योजकाला कोटींचा गंडा

  बेळगाव : बेळगावमध्ये एका वृद्ध उद्योजकाला सायबर फसवणूक करणाऱ्यांनी लक्ष्य केले. त्यांनी त्याला मनी लॉंड्रिंग प्रकरणात अडकण्याची भीती दाखवून तब्बल १५ कोटी ४५ लाख रुपये उकळवले. आरोपींनी स्वतःला सीबीआय अधिकारी म्हणून दाखवून व्हिडिओ कॉलवरून ‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी दिली आणि उद्योजकाकडून रक्कम हप्त्यांमध्ये घेतली. बेळगाव सायबर क्राईम पोलिसांच्या तपासात समोर …

Read More »

उद्या कुद्रेमानी येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हनुमान जन्मोत्सव सोहळा

  कुद्रेमानी (प्रतिनिधी) : कुद्रेमानी येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण व अखंड हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे ४० वे पुष्प भक्तिभावाच्या वातावरणात साजरे होणार आहे. हा पवित्र सोहळा चैत्र शुद्ध द्वादशी ते चैत्र कृष्ण प्रतिपदा या कालावधीत सोमवार दि. ३० मार्च २०२६ ते शुक्रवार दि. ३ एप्रिल २०२६ दरम्यान …

Read More »

सायबर स्कॅमर्सपासून सावध राहून आर्थिक नुकसान टाळा; पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

  बेळगाव : “आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगारांपासून सुरक्षित राहणे हा आपल्या सजगतेचा भाग आहे. कोणत्याही आमिषाला किंवा भीतीला बळी न पडता, ज्येष्ठ नागरिकांनी सावध राहून आपली ऑनलाईन फसवणूक आणि आर्थिक नुकसान टाळावे,” असे आवाहन बेळगावचे पोलीस आयुक्त श्री. भूषण गुलाबराव बोरसे (IPS) यांनी केले. शनिवारी, २८ मार्च रोजी टिळकवाडी …

Read More »

सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सह्यांची मोहिम; खानापूर तालुका समितीची बैठक मंगळवारी

    खानापूर : दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नाचा दावा (क्रमांक ४/२००४) दि. २९ मार्च २००४ रोजी राज्यघटनेच्या अनुच्छेद १३१ (ब) अन्वये सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. पण २२ वर्षे झाली तरी त्याची सुनावणी सलग होऊ शकली नाही. सदर सुनावणी लवकरात लवकर जलद गतीने करावी, अशी विनंती बेळगांव …

Read More »

सीमा भागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाबाबत उद्या घेणार महाराष्ट्र सरकारची भेट

  निपाणी ( वार्ता) : भाषावार प्रांतरचना झाल्यापासून आजपर्यंत सीमा भागात कन्नड मराठी भाषिक एकत्रितपणे राहत आहेत. तरीही कर्नाटक सरकार वेगवेगळ्या मार्गाने सीमा भागातील मराठी बांधवावर अन्याय करीत आहे. याशिवाय कन्नड सक्तीची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मध्यस्थी करून सीमा भागातील मराठी बांधवांना न्याय देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील नेते मंडळींची …

Read More »