Sunday , May 3 2026
Breaking News

देश/विदेश

राजस्थानात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे थैमान; १३ जणांचा मृत्यू

  जयपूर : उत्तर भारत आणि पाकिस्तान-पंजाब सीमेवर तयार झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम राजस्थानात दिसत आहे. राजस्थानात गेल्या चार दिवसांपासून वादळी वारे, गारपीठासह मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. फतेपूर शहरात ४ दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे पूरसदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. मागील ४ दिवसांमध्‍ये शहरामध्ये १०६ मिमी पावसाची नाेंद झाली आहे.तर आज ( दि. …

Read More »

दिल्लीत नीती आयोगाची बैठक; सर्व राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार, केजरीवालांसह, ममता बॅनर्जी आणि नितीश कुमारांचा बैठकीवर बहिष्कार

  नवी दिल्ली : नीती आयोगाची बैठक दिल्लीत आज होणार आहे. या बैठकीसाठी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्र शासित प्रदेशाचे राज्यपाल सहभागी होणार आहेत. सहभागी होणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांसह, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि बिहारचे …

Read More »

सहा चित्त्यांच्या मृत्यूनंतर सरकार जागे; ११ सदस्यीय समितीची स्थापना

  नवी दिल्ली : देशात चित्त्यांचा अधिवास तयार व्हावा, यासाठी केंद्र सरकारने जोरदार प्रयत्न चालविले असले तरी मागील काही काळात सहा चित्त्यांचा मृत्यू झाल्याने या मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. या पार्श्वभूमीवर सरकार आता खडबडून जागे झाले आहे. सदर मोहिमेचा आढावा घेण्यासह त्यावर नजर ठेवण्यासाठी सरकारने 11 सदस्यीय तज्ञ समितीची …

Read More »

भारतातून लूटून नेलेल्या टिपू सुलतानच्या तलवारीचा लंडनमध्ये विक्रमी 143 कोटींना लिलाव, ठरलेल्या किमतीपेक्षा सातपट रक्कम

  मुंबई : म्हैसुरचा वाघ अशी ख्याती असलेल्या टिपू सुलतानच्या तलवारीचा लंडनमध्ये लिलाव झाला असून त्याला आतापर्यंतची विक्रमी म्हणजे 143 कोटींची किंमत मिळाली आहे. लिलावातून मिळालेली रक्कम ही अपेक्षेपेक्षा सात पट अधिक असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. ही तलवार आतापर्यंत विकली जाणारी सर्वात महागडी भारतीय आणि इस्लामिक वस्तू बनली आहे. …

Read More »

तमिळनाडूत ४० ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी; डीएमके मंत्र्याच्या अडचणी वाढल्या

  तमिळनाडूतील डीएमके पक्षाचे नेते मंत्री सेंथिल बालाजी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी आयकर विभाग सातत्याने छापे टाकत आहे. दरम्यान आजही (दि.२६) प्राप्तिकर विभागाने मंत्री सेंथिल बालाजी यांच्याशी संबंधित ४० ठिकाणी छापे टाकले. यामध्ये संबंधित मंत्र्याच्या निवासस्थानावर, सरकारी कंत्राटदारांच्या निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहे. तमिळनाडूचे …

Read More »

नवीन संसद भवनाच्या उद्घाटन स्मरणार्थ ७५ रुपयांचे नाणे लाँच करणार

  अर्थ मंत्रालयाची मोठी घोषणा नवी दिल्ली : देशाच्या अर्थ मंत्रालयाने आज (दि.२६) मोठी घोषणा केली आहे. २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. या अविस्मरणीय क्षणाच्या स्मरणार्थ अर्थ मंत्रालयाकडून ७५ रुपयांचे नाणे लाँच केले जाणार आहे, असे मंत्रालयाने स्पष्ट केल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

कुनोमध्ये आणखी दोन चित्त्यांच्या पिलांचा मृत्यू, आतापर्यंत एकूण पाच चित्ते मृत्यूमुखी

  भोपाळ : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांच्या मृत्यूची मालिका थांबायचं नाव घेत नाही. ज्वाला नावाच्या मादी चित्त्याच्या आणखी दोन पिल्लांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर मरण पावलेल्या चित्त्यांची संख्या पाच झाली आहे. यामध्ये आफ्रिकेतून आणलेल्या दोन बिबट्यांचा समावेश आहे. चित्याच्या या पिल्लांचा मृत्यू अशक्तपणामुळे आणि वाढत्या …

Read More »

संसदेत राष्ट्रवादी ‘आप’च्या पाठीशी; अरविंद केजरीवाल यांनी घेतली शरद पवारांची भेट

  मुंबई : केंद्र सरकारने दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगसंदर्भात अध्यादेश आणला असून त्याविरोधात अरविंद केजरीवाल यांनी आता विरोधकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. अरविंद केजरीवाल, भगवंत मान आणि …

Read More »

अहंकारी, स्वार्थी माणूस देश चालवू शकत नाही ; ‘मातोश्री’वरुन केजरीवालांचा मोदींवर हल्ला

  मुंबई : “अध्यादेशाचा निर्णय अहंकारातून आला आहे. अहंकारी आणि स्वार्थी माणूस देश चालवू शकत नाही, दिल्लीच्या लढाईत उद्धव ठाकरेंची साथ मिळाली आहे,” अशा शब्दात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली. तर “जनतेला जागं करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईतील संयुक्त पत्रकार परिषदेत …

Read More »

प्रत्येक कार्यक्रमावर राजकारण करणे योग्य नाही : संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी

  नवी दिल्ली : नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बुधवारी विरोधी पक्षांना उद्देशून केली. प्रत्येक कार्यक्रमावर राजकारण करणे योग्य नाही, असा टोलाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 28 तारखेला नवीन संसद भवनाचे उद्घाटन …

Read More »