Monday , September 21 2026
Breaking News

कर्नाटक

सौंदलगा येथे येणाऱ्या प्रमुख वक्त्यावर बंदी घाला

  ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी; तहसीलदार कार्यालयाला निवेदन निपाणी (वार्ता) : सौंदलगा येथे होत असलेल्या हिंदू संमेलनासाठी प्रमुख वक्ते म्हणून मिलिंद एकबोटे हे उपस्थित राहणार आहेत. भीमा कोरेगाव दंगलीतील प्रमुख आरोपी असून त्यांची वक्तव्ये दलित हिंदू,- मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करणे, सामाजिक सलोखा बिघडवणे, संविधान विरोधी आणि जातीय दंगली …

Read More »

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना तीन वर्षे कारावास

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. भुरणकी गावातील दोन आरोपींना दोषी ठरवत पोक्सो न्यायालयाने कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. खानापूर तालुक्यातील नंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भुरणकी गावामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची …

Read More »

आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रकाच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा पलटवार; खुल्या चर्चेचे आव्हान

  बंगळूर : राज्य सरकारच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रक जाहीर करण्याची मागणी करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आर्थिक विषयातील अज्ञान, प्रशासनाचा अनुभवाचा अभाव आणि राजकीय हताशता याचेच हे लक्षण असल्याची टीका करत त्यांनी या विषयावर खुल्या चर्चेसाठी आपण तयार असल्याचे आव्हान दिले. …

Read More »

शिवकुमार स्वामी म्हणजे समाजाच्या आत्म्याला आकार देणारे संत

  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू; ११९ व्या जयंतीनिमित्त गुरुवंदना कार्यक्रम बंगळूर : शिवकुमार स्वामींसारखे संत समाज आणि राष्ट्राच्या आत्म्याला आकार देतात आणि त्यांच्या देहावसानानंतरही त्यांची आध्यात्मिक परंपरा देशाला सतत पोषण देत राहते, असे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी सांगितले. सिद्धगंगा मठाचे प्रमुख असलेले शिवकुमारस्वामी यांना ‘त्रिविध दासोही’ म्हणून ओळखले जात होते. अन्न, …

Read More »

ऊसतोड कामगारांची उचल फिटलीच नाही

  यंत्रापुढे हतबल; मुकादम, वाहन मालक आले अडचणीत निपाणी (वार्ता) : काही वर्षांपूर्वी उसाच्या फडात कोयत्याचा खणखणाट आणि मजुरांच्या मुलाबाळांचा किलबिलाट महिनोनमहिने ऐकू येत होता. पण काळ बदललि असून आता ऊसतोडणी यंत्रांचा (हार्वेस्टर) धडधडाट वाढला आहे. ज्या कामाला मजुरांची अख्खी टोळी तीन-चार दिवस लावायची, ते काम आता अवघ्या पाच तासांत …

Read More »

विविध ऑलंपियाड परीक्षेमध्ये मोहनलाल दोशी विद्यालयाचे यश

  निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गणित, इंग्लिश, हिंदी ऑलम्पियाड परीक्षेत यशसंपादन केले आहे. त्यामध्ये गणित विषयात सातवीतील यश राजाराम सावंत तर दहावी मधील रोशनी मोहन बोंगार्डे, श्रावणी गिरीश पोकले, श्रावणी संदीप पोतदार यांनी विशेष प्राविण्यासह सुवर्णपदक प्राप्त केले आहे. इंग्लिश विषयातून इयत्ता सातवीतील …

Read More »

ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत महागली नांगरणी

  एकरी १५००, तर १२०० रुपये रोटर : शेतकऱ्यांना आर्थिक फटका निपाणी (वार्ता) : ट्रॅक्टरद्वारे शेत मशागत महागली असून नांगरणीचा दर एकरी १५०० तर रोटाव्हेटरचा दर एकरी १२०० रुपयांवर पोचला आहे. लागवडीपासून ते मशागतीपर्यंत सर्वच खर्चात मोठी वाढ झाली आहे. मात्र शेतमालाचे दर अजूनही दहा वर्षांपूर्वीच्या पातळीवरच ठप्प असल्याने निपाणी …

Read More »

शासकीय कार्यालयासह बँकांमध्ये ‘मार्च एन्ड’ची लगीन घाई

  दिवसभर व्यवहार सुरूच; दुपारनंतर निवळली गर्दी निपाणी (वार्ता) : ‘मार्च एंडिंग’मुळे शहर आणि परिसरातील आर्थिक वर्ष अखेरची लगबग मंगळवारी (ता.३१) दिवसभर दिसून आली. त्यानिमित्ताने शासकीय कार्यालयात बिले मंजुरी, बँका, पतसंस्था आणि कृषी पतीन बँकेत कर्ज व्याज भरण्यासाठी ग्राहकांची वर्दळ वाढली होती. काही बँका तर रात्री उशिरापर्यंत उघड्या दिसत होत्या. …

Read More »

भिमापुरवाडीत गुरुवारपासून अखंड हरिनाम सप्ताहसह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

    निपाणी (वार्ता) : भीमापूरवाडी येथील श्रीराम मंदिरात चैत्र शुध्द पौर्णिमा गुरुवार (ता.२ एप्रिल) पासून पासून चैत्र वद्य चतुर्थी सोमवार ता.६) अखेर अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त चार दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. सोहळ्यात माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार-वडर, गळतगा पीकेपीएसचे …

Read More »

यशासाठी धैर्य आणि वक्तशीरपणा महत्त्वाचा

    किरण कमते : बागेवाडी महाविद्यालयात मार्गदर्शन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी स्पष्ट ध्येय ठेवून नियमित अभ्यासासह कठोर परिश्रम करणे महत्त्वाचे आहे. सहजासहजी यश मिळत नसून त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न वक्तशीरपणा आणि धैर्याची आवश्यकता आहे, असे असे मत २०२५ मध्ये होणाऱ्या भारताच्या सर्वोच्च नागरी सेवा परीक्षेत ५३ वा …

Read More »