Friday , December 19 2025
Breaking News

बेळगाव

शिवजयंती उत्सव दणक्यात होऊ द्या

बेळगाव : दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 4 मे रोजी शिवजयंती उत्सव साजरा करायचा असून त्यासंदर्भात नियोजनासाठी शिवजयंती चित्ररथ महामंडळाने मंगळवारी सायंकाळी धर्मवीर संभाजीराजे चौकातील जत्तीमठ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव होते. सुनील जाधव म्हणाले की, बेळगाव शहर परिसरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सवाला आदर्श …

Read More »

माऊंट एव्हरेस्ट शिखरावर पोहोचण्याचा आनंद शब्दांच्या पलीकडे

वेदांत सखी ग्रुपच्या महिला दिन कार्यक्रमात अनुजा रजपुत यांचे प्रतिपादन बेळगाव : आपल्या कुटुंबासाठी सर्व स्त्रिया कष्ट घेत असतात. कौटुंबिक कामाबरोबरच छंदही जोपासतात. इतरांपेक्षा काही वेगळे करण्याची भावना बरेच काही चांगले कार्य करून जात असते. अशाच इच्छेतून मी समुद्रसपाटीपासून 5864 मीटर उंचीच्या माऊंट एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले. शिखरावर पोहोचल्यानंतर झालेला आनंद …

Read More »

ग्राहकांचा विश्वास आणि पारदर्शकता हेच तनिष्कचे यश : संदीप कुलहळी यांची माहिती

बेळगाव : गेल्या सहा वर्ष बेळगावच्या चोखंदळ ग्राहकांनी तनिष्कच्या दागिन्यांना भरघोस प्रतिसाद दिला. ग्राहकांचा विश्वास आणि पारदर्शक व्यवहार हेच तनिष्कच्या यशाचे गमक असल्याची माहिती टाटा समूहाच्या कॅरेटलेन बोर्डाचे सदस्य संदीप कुलहळी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. संतोष चांडक संचालित टाटा सुमुहातील तनिष्कच्या बेळगाव खानापूर रोड टिळकवाडी कृष्णाई आर्केड येथील नव्या भव्य …

Read More »

बेळगावसह 3 ठिकाणी खत प्रकल्प : मंत्री मुरुगेश निराणी

बेळगाव : कर्नाटक राज्य सरकारने अंदाजे 7,000 कोटी रुपये खर्चून खत उद्योग सुरू करण्याची योजना आखली असून या प्रकल्पासाठी दावणगिरी, बेळगाव आणि मंगळूर या तीन शहरांची निवड करण्यात आली आहे, अवजड आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्री मुरुगेश निराणी यांनी ही माहिती दिली. मंगळूर येथे काल सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मंत्री …

Read More »

रणकुंडये खून प्रकरणी चार जणांना अटक

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील रणकुंडये खून प्रकरणाचा तिढा सोडवण्यात बेळगाव ग्रामीण पोलिसांना यश आले असून पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. शनिवारी मध्यरात्री रणकुंडये येथील नागेश पाटील (वय 31) या युवकाचे घरातून अपहरण करून धारधार शस्त्राने त्याच्यावर हल्ला करत निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या खून प्रकरणी आरोपी असलेला …

Read More »

विकासाच्या दृष्टिकोनातून बेळगाव जिल्ह्याचे विभाजन व्हावे : मंत्री उमेश कत्ती

बेळगाव : विकासाच्या दृष्टिकोनातून बेळगाव जिल्ह्याचे विभाजन होणे आवश्यक आहे, असे मत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी व्यक्त केले आहे. हुक्केरी येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. बेळगाव जिल्हा अठरा मतदारसंघांमध्ये विभागला गेला आहे. हा जिल्हा राज्यातील सर्वात मोठ्या जिल्ह्यांमध्ये गणला जात असून जिल्ह्याचा विकास खास गुंतला आहे. …

Read More »

ग्रामीण आमदारांकडून जखमी गवंडी कामगाराची विचारपूस

बेळगाव : कोळीकोप येथील गवंडी कामगार बाळु फकीरा नाईक हे कामावर असताना स्लॅब घालतेवेळी काँक्रीट मशीनवरून दुसऱ्या मजल्यावरून खाली पडले. यावेळी त्यांचा हात, पाय आणि कंबर मोडल्याने त्यांना उपचाराकरिता विजया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी बाळू नाईक यांच्यावर जवळपास महिनाभर उपचार झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. या घटनेची माहिती समजल्यावर …

Read More »

बेळगावच्या आयटी पार्क संदर्भात खास. कडाडी यांची केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांच्यासोबत चर्चा

बेळगाव : खासदार इराण्णा कडाडी यांनी आज सोमवारी केंद्रीय संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान खास. कडाडी यांनी बेळगावमधील नियोजित आयटी पार्कच्या जागेबाबत राजनाथ सिंह यांच्यासोबत चर्चा केली. बेळगावच्या आयटी पार्क संदर्भात वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक बोलावण्याची विनंती यावेळी खास. कडाडी यांनी केली. यावेळी …

Read More »

भास्कर राव यांचा आम आदमी पक्षात प्रवेश!

बेंगळुरू : दिल्ली, पंजाब विधानसभेची निवडणूक एकहाती जिंकल्यानंतर आम आदमी पार्टीनं आपला मोर्चा आता गुजरात, कर्नाटकाकडं वळवलाय. गुजरात आणि कर्नाटक विधानसभेची निवडणूक 2023 मध्ये होणार आहे. याच पार्श्वभूमीवर कर्नाटकचे माजी आयपीएस अधिकारी भास्कर राव यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत आप पक्षात प्रवेश केलाय. …

Read More »

शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांचे आधारस्तंभ हरपले!

कै. शंकरराव पाटील यांना विविध संघटनांच्यावतीने श्रद्धांजली बेळगाव : ‘शंकरराव पाटील यांच्या निधनाने बेळगावातल्या एका दानशूर व्यक्तीचा अंत झाला आहे. त्यांच्या निधनामुळे अनेक शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांचे आधारस्तंभ हरपले आहे’ , असे विचार अनेक मान्यवरांनी बोलताना व्यक्त केले. मराठा कॉलनी येथील रहिवाशी, मार्केट यार्डमधील अडत व्यापारी आणि मराठा मंडळ शिक्षण …

Read More »