Thursday , June 4 2026
Breaking News

विहिरीत पाय घसरुन पडल्याने सोसायटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील इदलहोंड येथील ३६ वर्षीय दिग्विजय मनोहर जाधव या तरुणाचा आपल्या शेतातील विहिरीत पाय घसरुन पडल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज गुरुवारी सकाळी उघडकीस आली. दिग्विजय जाधव हे गर्लगुंजी येथील पिसेदेव सोसायटी शाखेत लिपिक पदावर कार्यरत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, दिग्विजय जाधव आज सकाळी ६ वाजल्यापासून बेपत्ता होते. कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध केली असता, त्यांची दुचाकी त्यांच्या स्वतःच्या शेताजवळील रस्त्यालगत आढळून आली.

या घटनेची माहिती तात्काळ खानापूर येथील अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत दोन ते तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दिग्विजय यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.

दिग्विजय याच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगा, आई वडील व एक विवाहित मोठा भाऊ, तीन विवाहित बहिणी असा मोठा परिवार आहे.

या घटनेची नोंद खानापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे. पुढील तपास खानापूर पोलीस करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध गोहत्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध हिंदू संघटना, धार्मिक संस्था, सामाजिक संघटना तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *