Sunday , July 26 2026
Breaking News

पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधानांचा राजीनामा मागितला का?

Spread the love

 

चेंगराचेंगरीवर जारकीहोळीनी केला कर्नाटक सरकारचा बचाव

बंगळूर : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला. हे केंद्र सरकारचे अपयश नाही का? विरोधी पक्ष म्हणून आपण पंतप्रधानांचा राजीनामा मागितला होता का? असा भाजपवर हल्लाबोल करताना कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी रविवारी प्रश्न केला.
चिक्कमंगळूर येथील जिल्हा काँग्रेस समितीच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मागील राज्य सरकारांच्या काळात अनेक अनुचित घटना घडल्या आहेत. तथापि, काँग्रेसने त्यावेळी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला नव्हता. भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, सर्व पक्ष सत्ताधारी पक्षाच्या पाठीशी उभे होते,” असे ते म्हणाले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुर (आरसीबी) च्या आयपीएल विजयाच्या जल्लोषाचे व्यवस्थापन करण्यात अपयश आल्याने बंगळुरमध्ये चेंगराचेंगरी झाली हे मान्य करून, त्यासाठी राजीनाम्याची गरज नसल्याचे मंत्री म्हणाले.
या कार्यक्रमाबद्दलचे सर्व काही सध्या एक गूढ आहे. कार्यक्रमासाठी परवानगी कोणी मागितली किंवा कोणी नाकारली किंवा परवानगी दिली हे कोणालाही माहिती नाही. चौकशीत कोणाची चूक होती हे उघड होईल,” असे जारकीहोळी यांनी जोर देऊन सांगितले.
एका प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाले की, काँग्रेसचे हायकमांड संबंधितांकडून स्पष्टीकरण मागू शकतात किंवा त्यांना दिल्लीला बोलावू शकतात. “भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हायकमांड निर्देश देऊ शकतात किंवा सूचना देऊ शकतात.
जारकीहोळी यांनी स्पष्ट केले की सध्यातरी मुख्यमंत्री बदलला जाणार नाही. अडीच वर्षांनी मुख्यमंत्री बदलला जाईल असे कोणी म्हटले? सिद्धरामय्या स्वतःच पुढे राहतील,” असे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

महामार्गालगतच्या ढाबे, हॉटेल, विक्री केंद्रांवर ग्रामपंचायतींकडून शुल्क आकारणी

Spread the love  बंगळूर : ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत कार्यरत असलेल्या तात्पुरत्या ग्रॅनाइट-मार्बल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *