Friday , April 17 2026
Breaking News

धर्मस्थळ यात्रा हे भाजपचे एक ढोंग : सिध्दरामय्या

Spread the love

 

बंगळूर : धर्मस्थळात भाजप राजकारण करत आहे. धर्मस्थळाला भाजपने काढलेली यात्रा ही एक राजकीय यात्रा आहे. त्यातून त्यांना राजकीय फायदा होणार नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.
आपले मूळ गाव म्हैसूर येथील सिद्धरामनहुंडी येथे पत्रकारांशी बोलताना, धर्मस्थळ प्रकरणासंदर्भात एसआयटी स्थापन झाली असताना भाजपने यात्रा का काढली नाही, हा भाजपचा अहंकार नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला
त्यांनी भाजपच्या चामुंडी चलो यात्रेवरही भाष्य केले की, भाजप हिंदुत्वाला बळकटी देण्यासाठी या यात्रांचे नियोजन करत आहे. त्यांच्यामुळे हिंदुत्व बळकट होत नाहीये. मीही हिंदू आहे. मी माझ्या गावात राम मंदिर बांधले आहे.
खरे हिंदू खोटे बोलणारे आणि खोटा प्रचार करणारे नाहीत. ज्यांच्याकडे मानवता आहे, जे हिंदूं अमानुष वागतात ते खरे हिंदू नाहीत, असे ते म्हणाले.
भाजप प्रत्येक गोष्टीबद्दल खोटे बोलत आहे. ते दसऱ्याच्या मुद्द्यावरही राजकारण करत आहेत. त्यांना हवे असेल तर ते स्वतःच्या घराचा वापरही राजकारणासाठी करतील. सर्व हिंदू भाजपसोबत नाहीत, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले.
चामुंडी टेकडी हिंदूंची नाही या उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या विधानाला उत्तर देताना ते म्हणाले, “डी.के. शिवकुमार काय म्हणाले ते मला माहित नाही. चामुंडी टेकडी हिंदूंची मालमत्ता असू शकते. पण आता मुद्दा चामुंडी टेकडीचा नाही, तर दसरा सण सर्वांचा आहे.”
माझ्या गावी, मी ज्या शाळेमध्ये पाचवी ते सातवीपर्यंत शिक्षण घेतले, त्या शाळेसाठी मी एक नवीन इमारत बांधली आहे. या गावात आता प्राथमिक शाळा, हायस्कूल आणि पीयू कॉलेज आहे. विद्यार्थी नसल्याने मी पदवी महाविद्यालय बांधले नाही. गावाला आरोग्य सेवा मिळण्यासाठी मी सर्व व्यवस्थाही केल्या आहेत. गावाचे ऋण नेहमीच राहील. हे कधीही न संपणारे कर्ज आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.
मंत्री वेंकटेश यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आदिचुंचनगिरी मठातील ‘नऊ तत्त्वे’ विकसित भारताचा मार्ग

Spread the love  पंतप्रधान नरेंद्र मोदी; आदिचुंचनगिरी येथे श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन बंगळूर : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *